शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

पावले आयटीआयकडे, पर्याय असूनही तरुणांना नोकरीची खात्री नसल्याने निवडला मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:41 IST

औद्योगिकीकरणात अत्याधुनिक यंत्रणेचा होत असलेला अवलंब आणि शासनाचे बदलत असलेले औद्योगिक धोरण यामुळे ४० वर्षांनंतर पुन्हा औद्योगिक तंत्र शिक्षणाला महत्त्व आले आहे.

पिंपरी : औद्योगिकीकरणात अत्याधुनिक यंत्रणेचा होत असलेला अवलंब आणि शासनाचे बदलत असलेले औद्योगिक धोरण यामुळे ४० वर्षांनंतर पुन्हा औद्योगिक तंत्र शिक्षणाला महत्त्व आले आहे. दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअर निवडीचे असंख्य पर्याय खुले असूनही नोकरीची शास्वती, पुरेसे वेतन मिळेल याची शाश्वती उरली नाही. त्यामुळे कमी खर्चात, कमी कालावधित स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा शाश्वत मार्ग म्हणून तरुणांचा कल पुन्हा औद्योगिक तंत्र शिक्षणाकडे (आयटीआय) वळला आहे.पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर, वाहन उद्योगांचे हब मानले जात होते. मात्र जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आणि शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे औद्योगिक क्षेत्राला सध्या उतरती कळा आली आहे. पुण्यात औंध येथे असलेले शासकीय औद्योगिक तंत्र प्रशिक्षण केंद्र कुशल कामगार घडविण्यात आघाडीवर होते. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमध्ये एक केंद्र उघडण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोरवाडी येथे मुलांसाठी तर कासारवाडी येथे महिलांसाठी दहा वर्षांपूर्वी स्वतंत्र आयटीआय सुरू केले आहे. शासनाचे बदलते धोरण, विविध करांचा बोजा, मूलभूत सुविधांची वाणवा यामुळे शहरातील अनेक उद्योग बाहेर गेले आहेत. औद्योगिक क्षेत्राला उतरती कळा आली आहे. शासनाने नवउद्योजक घडविण्यासाठी स्टार्टअप इंडिया तसेच कुशल कामगार घडविण्यासाठी स्किल इंडिया अशा योजना जाहीर केल्या आहेत. कमी खर्चात, अल्प कालावधित रोजगार मिळविण्याचा पर्याय म्हणून तरुणवर्ग आयटीआयचा विचार करू लागला आहे. स्वयंरोजगाराच्या उद्देशाने आयटीआय प्रशिक्षणाकडे तरुणांचा कल वाढला आहे.देशात आणि राज्यात ३५ ते ४० वर्षांपूर्वी औद्योगिकीकरणाची लाट आली. रोजगाराच्या संधी उपलब्ध होत गेल्या त्या काळात औद्योगिकतंत्र शिक्षणाला विशेष महत्त्व आले होते. वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांमध्ये, मोठ्या नामांकित कंपन्यांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना सहज नोकऱ्या मिळाल्या.अभियंते कंपन्यांकडे फिरवताहेत पाठकंपन्यांमध्ये नोकºया मिळत असल्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याकडे तरुणांचा कल वाढला होता. अभियांत्रिकीच्या महाविद्यालयांची संख्याही झपाट्याने वाढली होती. आयटीआयचे प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रम केलेल्या अभियंत्यांना कंपन्यामध्ये प्राधान्य दिले जात होते. परंतु त्यांना मिळणारे वेतन प्रशिक्षणार्थी कामगारांइतकेच असल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी अभियंत्यांनी एमबीए आणि अन्य व्यावसायिक शिक्षण घेऊन कार्पोरेट क्षेत्रात नोकºयांची संधी शोधली. अभियंतेही कंपन्यांकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा कंपन्यांना कुशल कामगारांची गरज भासू लागली आहे. औद्योगिक तंत्र शिक्षण प्रशिक्षण घेणाºयांच्या नोकरीची संधी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.>शासकीय आयटीआय ओसऔद्योगिक तंत्र शिक्षण संस्था (आयटीआय) शासनातर्फे चालविल्या जात असल्याने या संस्था फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्यात आल्या. औद्योगिक क्षेत्रात होणारे काळानुरूप बदल लक्षात घेऊन अभ्यासक्रमात आधुनिक बदल होणे अपेक्षित होते. सरकारी कारभार त्यामुळे असे बदल घडून आले नाहीत. तेथील अभ्यासक्रम कालबाह्य होत गेले. आयटीआय अभ्यासक्रम केलेल्यांपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले तरुण कंपन्यांना मिळू लागले, त्यामुळे आयटीआयवाले मागे पडले होते. शासकीय आयटीआयसुद्धा ओस पडल्या आहेत.