शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
5
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
6
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
7
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
8
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
9
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
10
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
11
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
12
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
13
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
14
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
15
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
16
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
17
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
18
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

एसटी महामंडळाच्या वायफाय सुविधेचा बोजवारा, लाखो रुपये खर्च करूनही मिळत नाही सेवा, प्रवाशांमध्ये नाराजी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 3:46 AM

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसमध्ये लाखो रुपये खर्च करून वायफाय सुविधा महाराष्ट्रभर सुरू केली. सध्या मात्र बसमधील ही सुविधा बारगळल्याने प्रवाशांच्या मनोरंजनावर विरजण पडल्याचे दिसून येत आहे.

पिंपळे गुरव : प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसमध्ये लाखो रुपये खर्च करून वायफाय सुविधा महाराष्ट्रभर सुरू केली. सध्या मात्र बसमधील ही सुविधा बारगळल्याने प्रवाशांच्या मनोरंजनावर विरजण पडल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्रात दिवस-रात्र हजारो बसमधून लाखो प्रवासी प्रवास करतात. शहरांसह ग्रामीण भागातील प्रवाशांना प्रवास करताना मोबाइलवर आनंद मिळावा म्हणून ही सुविधा सुरू केली. बसमध्ये वायफाय मशिन असून अडचण नसून खोळंबा या म्हणीप्रमाणे बुजगावणे म्हणून पाहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. राज्य महामार्गावर एसटी महामंडळाच्या हजारो बस धावतात.लांब पल्ल्यांच्या बसमध्ये प्रवाशांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने ही वायफाय सुविधा बसमध्ये सुरू करण्यात आली. बहुतांशबसमध्ये वायफाय मशिन आहे, पण त्या बंद अवस्थेत आहेत. याबाबत चालक व वाहकांना विचारले असता, या मशिन बसमध्ये बसविल्यापासून बंदच आहेत. वायफाय सुविधा सुरू झालीच नाही. प्रवाशांना हे मशिन फक्त शो पीस म्हणून पाहावे लागत आहे.एसटीमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध असेल या अपेक्षेने प्रवासी बसमधून प्रवास करतात. मात्र, ऐनवेळी वायफाय बंद असल्याचे समजताच प्रवाशांमध्ये निराशा पसरते. तरी एसटी प्रशासनाने याची दखल घेऊन एसटीमध्ये ही सुविधा विनाअडथळा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.एसटीचे घोषवाक्यठरतेय निरर्थकशासनाच्या वतीने अनेक योजना जाहीर केल्या जातात, मात्र प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत. लाभधारकांना प्रत्यक्ष त्या योजनेचा लाभ मिळतो किंवा नाही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक योजना बारगळल्याचे दिसून येत आहे. एसटीमध्ये प्रवास, करमणूक हमखास हे घोषवाक्य निरर्थक आहे. यामुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारामध्ये ५८ बस आहेत. त्या सर्व बसमध्ये वायफाय सुविधा सहा महिन्यांपासून सुरू आहे. एखाद्या बसमधील वायफाय मशिन बंद पडल्यानंतर कर्मचारी लगेच दुरुस्त करून घेतात. ही प्रवाशांसाठीची वायफाय सुविधा प्रभावीपणे राबविणार आहे.- अनिल भिसे,आगार व्यवस्थापक, वल्लभनगरशिवाजीनगर आगारातील तीन बस शालेय सहलीसाठी आणल्या होत्या. त्या तीनही बसमध्ये वायफाय सुविधा मशिन होत्या. मात्र या मशिन बंद अवस्थेत होत्या. ही सुविधा पूर्णत: फसवी असल्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होत आहे. पीएमपीप्रमाणे कर्तव्यदक्ष अधिकाºयांची नितांत आवश्यकता आहे.- बिपीन बनकर, शिक्षक, औंध