शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वाल्हेकरवाडीत सहा एकर ऊस जळून खाक; सुमारे आठ-दहा लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 13:55 IST

वाल्हेकरवाडी येथे शेतात आग लागल्याने तब्बल ६ एकरावर उभा असलेला ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

ठळक मुद्देदोन अग्निशामक विभागाचे बंब आणि नागरिकांनी मिळून विझवली आग जवळपास आठ ते दहा लाखांचे नुकसान, ऊसाच्या सुकलेल्या पाचोळ्यांमुळे वाढली आग

रावेत : वाल्हेकरवाडी येथे शेतात आग लागल्याने तब्बल ६ एकरावर उभा असलेला ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. शुक्रवारी (दि. २६) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन अग्निशामक विभागाचे बंब आणि नागरिकांनी मिळून लागलेली आग विझवली.

वाल्हेकरवाडी येथील सर्वे क्र. ४७मध्ये  असलेल्या हॉटेल रानमळाशेजारी असणाऱ्या भागातील सुरेश चिंचवडे यांचा अडीच एकर, बाळासाहेब चिंचवडे यांचा अडीच एकर, हनुमंत चिंचवडे यांचा एक एकर असा एकूण सहा एकरच्या आसपास ऊस जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. जोराचा वारा असल्याने लागलेली आग सर्वत्र पसरली. ऊसाला पाणी देण्यासाठी शेतात सर्वत्र पसरलेला ठिबक सिंचन आगीत जळून खाक झाल्याने जवळपास आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले. ऊसाच्या सुकलेल्या पाचोळ्यांमुळे ही आग क्षणातच वाढत गेली. शेजारी असलेल्या ऊसांमध्ये ही आग पसरत गेली. 

आगीच्या घटनेची माहिती मिळताच ब प्रभाग अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन चिंचवडे, संकेत चिंचवडे, शेखर चिंचवडे युथ फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, सचिन काळभोर आदी सह कार्यकर्त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. आगीचे स्वरूप पाहता ती वाढून इतरत्र पसरू नये या करिता सर्वांनी तत्काळ अग्निशामक यंत्रणा येईपर्यंत उपलब्ध असलेल्या पाण्यानी आग विजविण्याचा प्रयत्न केला.

अज्ञाताची अग्निशामक विभागाच्या गाडीवर दगडफेक शेतातील उसाला लागलेली आग विझवण्यासाठी तात्काळ पालिकेच्या अग्निशामक विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या आणि आग विझविण्यास सुरवात केली रस्ता अरुंद आणि कच्चा तसेच रस्त्याच्या वरती महावितरणच्या यंत्रणेची वीजवाहक लोबणाऱ्या  तारांचे जाळे यामुळे बंब फिरविणे जिकरीचे होत होते. एक बंब फिरवीत असताना मागील चाक मातीत रुतून फसला. त्यामुळे एकच बंब आग विझवीत होता. आग विजविण्यासाठी अग्निशामक दलास येण्यास उशीर झाल्याने, एक बंब फसल्याने आणि एकातील पाणी संपल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत असताना पाणी संपल्याने दुसरे पाणी आणण्यासाठी निघाल्यावर येथे जमलेल्या घोळक्यातील तीन ते चार अज्ञातांनी अग्निशामक गाडीवर दगड फेक केली.  त्यामुळे गाडीचे पुढील दोन्ही काच फुटल्या तणावाची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे पाहून अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ चिंचवड पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळविली लागलीच घटनास्थळी चिंचवड पोलीस स्टेशनचे जवळपास २० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पोहोचून परस्थिती नियंत्रणात आणली. नुकसानग्रस्त गाडीचा पंचनामा करून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत. बऱ्याच वेळाने पालिकेचे ४ अग्निशामक बंब घटनास्थळी आले, परंतु तोपर्यंत नागरिकांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली होती.

टॅग्स :ravetरावेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड