शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सेवा रस्त्यावर पडले खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:31 IST

पवनानगर फाटा : उड्डाणपुलाच्या कामाचा परिणाम

कामशेत : जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर पवनानगर फाटा येथे सुरूअसलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी काही अंतरावर मार्ग बंद करून मुख्य मार्गावरील वाहने सेवारस्त्याने वळवण्यात आली आहेत. सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्याआधीच मार्ग वळवण्यात आल्याने वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. त्यात सेवारस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे व खडीचे साम्राज्य पसरले आहे.

या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यावर ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप आले आहे. महामार्गावर प्रवास करताना वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनपेक्षितपणे पुढे पाण्याने भरलेल्या खड्ड्यात वाहन आदळत आहे, तर खड्डे चुकवण्याच्या नादात अपघाताला आमंत्रण मिळत आहे. रस्त्याकडेला चिखलाचा राडारोडा झाला असून, स्थानिकांना येथून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही.मागील अनेक महिन्यांपासून सुरूअसलेल्या महामार्गावर पवनानगर फाटा येथील उड्डाणपुलाचे काम मे महिन्यात मुदत संपूनही पूर्ण झाले नाही. येथे पवनानगरकडून कामशेतमध्ये येणारे जाणारे नागरिक महामार्ग ओलांडताना अपघातात शेकडो लोकांनी प्राण गमावले. अनेकांना अपंगत्व आले. महामार्ग ओलांडणे नागरिकांच्या जिवावर बेतत असल्याने येथे उड्डाणपूल व्हावा, यासाठी अनेकदा रास्ता रोको व विविध आंदोलने झाली.त्यातूनच मागील वर्षी जानेवारी महिन्यात येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. यावेळी स्थानिक नागरिकांसह पवनानगर भागातील सर्व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपून तीन महिने पूर्ण होत आले, तरी पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने शिवाय सेवारस्त्यावर पडलेले खड्डे व पसरलेली खडी, सेवारस्त्यावर व कडेला झालेला चिखल, गटारीसाठी खोदलेले मोठे खड्डे आदी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. एक वेळ महामार्ग ओलांडणे परवडत होते पण या सेवारस्त्यावरून चालणे जीवघेणे झाले आहे. चिमुकल्यांना शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या महिला व पालक यांच्यात मोठी भीती निर्माण झाली आहे.दुचाकीस्वार झाले जायबंदीकामशेतमधील या उड्डाणपुलाच्या कामी नागरिकांची मोठी परवड होत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात सेवा रस्त्याच्या कडेला गटारीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमध्ये काही दुचाकीस्वार पडून अपघात झाले आहेत. शिवाय अवजड वाहनांचा अखंड प्रवास सुरू असून, प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे.

स्थानिक नागरिकांसह पवनानगर भागातील नागरिक व महामार्गावरील वाहनचालक यांना जीवघेणा प्रवास सुरू आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसांत उड्डाणपुलाच्या कामामध्ये झालेली दिरंगाई, नागरिकांची गैरसोय, कामाची क्वॉलिटी व सुरक्षा आदी समस्यांच्या विरोधात कामशेत विकास संघर्ष समिती यांच्यामार्फत मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची चर्चा कामशेत परिसरात सुरू आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad safetyरस्ते सुरक्षा