शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सेवा रस्त्यावर पडले खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:31 IST

पवनानगर फाटा : उड्डाणपुलाच्या कामाचा परिणाम

कामशेत : जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर पवनानगर फाटा येथे सुरूअसलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी काही अंतरावर मार्ग बंद करून मुख्य मार्गावरील वाहने सेवारस्त्याने वळवण्यात आली आहेत. सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्याआधीच मार्ग वळवण्यात आल्याने वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. त्यात सेवारस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे व खडीचे साम्राज्य पसरले आहे.

या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यावर ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप आले आहे. महामार्गावर प्रवास करताना वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनपेक्षितपणे पुढे पाण्याने भरलेल्या खड्ड्यात वाहन आदळत आहे, तर खड्डे चुकवण्याच्या नादात अपघाताला आमंत्रण मिळत आहे. रस्त्याकडेला चिखलाचा राडारोडा झाला असून, स्थानिकांना येथून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही.मागील अनेक महिन्यांपासून सुरूअसलेल्या महामार्गावर पवनानगर फाटा येथील उड्डाणपुलाचे काम मे महिन्यात मुदत संपूनही पूर्ण झाले नाही. येथे पवनानगरकडून कामशेतमध्ये येणारे जाणारे नागरिक महामार्ग ओलांडताना अपघातात शेकडो लोकांनी प्राण गमावले. अनेकांना अपंगत्व आले. महामार्ग ओलांडणे नागरिकांच्या जिवावर बेतत असल्याने येथे उड्डाणपूल व्हावा, यासाठी अनेकदा रास्ता रोको व विविध आंदोलने झाली.त्यातूनच मागील वर्षी जानेवारी महिन्यात येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. यावेळी स्थानिक नागरिकांसह पवनानगर भागातील सर्व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपून तीन महिने पूर्ण होत आले, तरी पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने शिवाय सेवारस्त्यावर पडलेले खड्डे व पसरलेली खडी, सेवारस्त्यावर व कडेला झालेला चिखल, गटारीसाठी खोदलेले मोठे खड्डे आदी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. एक वेळ महामार्ग ओलांडणे परवडत होते पण या सेवारस्त्यावरून चालणे जीवघेणे झाले आहे. चिमुकल्यांना शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या महिला व पालक यांच्यात मोठी भीती निर्माण झाली आहे.दुचाकीस्वार झाले जायबंदीकामशेतमधील या उड्डाणपुलाच्या कामी नागरिकांची मोठी परवड होत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात सेवा रस्त्याच्या कडेला गटारीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमध्ये काही दुचाकीस्वार पडून अपघात झाले आहेत. शिवाय अवजड वाहनांचा अखंड प्रवास सुरू असून, प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे.

स्थानिक नागरिकांसह पवनानगर भागातील नागरिक व महामार्गावरील वाहनचालक यांना जीवघेणा प्रवास सुरू आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसांत उड्डाणपुलाच्या कामामध्ये झालेली दिरंगाई, नागरिकांची गैरसोय, कामाची क्वॉलिटी व सुरक्षा आदी समस्यांच्या विरोधात कामशेत विकास संघर्ष समिती यांच्यामार्फत मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची चर्चा कामशेत परिसरात सुरू आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad safetyरस्ते सुरक्षा