शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा; अन्यथा महाराष्ट्र बंद, संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 14:41 IST

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आणखी इतर चार जणांनी महाराजांबाबत चुकीचे विधान केले. त्यांचे धाडस तरी कसे होते?

पिंपरी : बारा बलुतेदार आणि बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाणारा हा महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अवमान केला जात आहे. राज्यपालांनी एकदा नव्हे तर दोन वेळा असे केले. त्यामुळे वेळ आली आहे ॲक्शन घेण्याची, राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा, अन्यथा महाराष्ट्र बंद होईल, असा इशारा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा निषेध करीत विविध संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी बंदचे आवाहन करण्यात आले. त्याच्या समर्थनार्थ संभाजीराजे छत्रपती पिंपरी येथे आले होते. त्यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांनी राज्यपालांचा निषेध करत सरकारला इशारा दिला. 

संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्र हे इतर राज्यांना दिशा देणारे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. मात्र, महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांबाबत आपण चर्चा करत बसलो आहोत. त्यामुळे आपण एकत्र येऊन आपला आवाज दिल्लीपर्यंत पोचविण्याची गरज नाही का? म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये हे आंदोलन होत आहे. राज्यपाल कोशारी यांनी महाराजांचा दोनवेळा अवमान केला. त्यांची हिम्मत होतेच कशी, त्यानंतरही काही लोकं त्यांना सपोर्ट कशी करतात, हा मोठा प्रश्न आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आणखी इतर चार जणांनी महाराजांबाबत चुकीचे विधान केले. त्यांचे धाडस तरी कसे होते? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला

सांगण्यात आलं की, आपला निरोप आम्ही पोहचवला. काय निरोप पोहचवला तुम्ही, सांगा ना काय निरोप पोहचवला? ज्या-ज्या ठिकाणी निरोप पोहचवायचा आहे तेथे आम्ही निरोप पोहचवणार, कुठल्या ठिकाणी निरोप पोहचवायचा आहे ते सांगा, हे तर सांगा की काय निरोप पोहचवला? तुम्ही हा निरोप पोहचवला का की, महाराष्ट्रातून कोशारींची हकालपट्टी व्हायला पाहिजे, असा प्रश्न जाहीरपणे करून संभाजीराजे छत्रपती यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

प्रत्येक शहरातील आंदोलनात सहभागी होणार

राज्यपालांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आंदोलन होत राहणार आहे. प्रत्येक शहरातील आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहे. पिंपरी-चिंचवड हे उद्योगांचे शहर आहे. या शहरातून सुरू झालेल्या आंदोलनाचा हा प्रवास महाराष्ट्र ‘बंद’च्या दिशेने सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यपालांना लवकर महाराष्ट्राबाहेर पाठवा, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीPoliticsराजकारणbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज