शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा; अन्यथा महाराष्ट्र बंद, संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 14:41 IST

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आणखी इतर चार जणांनी महाराजांबाबत चुकीचे विधान केले. त्यांचे धाडस तरी कसे होते?

पिंपरी : बारा बलुतेदार आणि बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाणारा हा महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अवमान केला जात आहे. राज्यपालांनी एकदा नव्हे तर दोन वेळा असे केले. त्यामुळे वेळ आली आहे ॲक्शन घेण्याची, राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा, अन्यथा महाराष्ट्र बंद होईल, असा इशारा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा निषेध करीत विविध संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी बंदचे आवाहन करण्यात आले. त्याच्या समर्थनार्थ संभाजीराजे छत्रपती पिंपरी येथे आले होते. त्यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांनी राज्यपालांचा निषेध करत सरकारला इशारा दिला. 

संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्र हे इतर राज्यांना दिशा देणारे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. मात्र, महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांबाबत आपण चर्चा करत बसलो आहोत. त्यामुळे आपण एकत्र येऊन आपला आवाज दिल्लीपर्यंत पोचविण्याची गरज नाही का? म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये हे आंदोलन होत आहे. राज्यपाल कोशारी यांनी महाराजांचा दोनवेळा अवमान केला. त्यांची हिम्मत होतेच कशी, त्यानंतरही काही लोकं त्यांना सपोर्ट कशी करतात, हा मोठा प्रश्न आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आणखी इतर चार जणांनी महाराजांबाबत चुकीचे विधान केले. त्यांचे धाडस तरी कसे होते? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला

सांगण्यात आलं की, आपला निरोप आम्ही पोहचवला. काय निरोप पोहचवला तुम्ही, सांगा ना काय निरोप पोहचवला? ज्या-ज्या ठिकाणी निरोप पोहचवायचा आहे तेथे आम्ही निरोप पोहचवणार, कुठल्या ठिकाणी निरोप पोहचवायचा आहे ते सांगा, हे तर सांगा की काय निरोप पोहचवला? तुम्ही हा निरोप पोहचवला का की, महाराष्ट्रातून कोशारींची हकालपट्टी व्हायला पाहिजे, असा प्रश्न जाहीरपणे करून संभाजीराजे छत्रपती यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

प्रत्येक शहरातील आंदोलनात सहभागी होणार

राज्यपालांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आंदोलन होत राहणार आहे. प्रत्येक शहरातील आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहे. पिंपरी-चिंचवड हे उद्योगांचे शहर आहे. या शहरातून सुरू झालेल्या आंदोलनाचा हा प्रवास महाराष्ट्र ‘बंद’च्या दिशेने सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यपालांना लवकर महाराष्ट्राबाहेर पाठवा, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीPoliticsराजकारणbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज