शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बेवारस वाहनांमुळे सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 03:21 IST

सांगवी आणि रावेतमधील समस्या; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; वाहन मालकांवर कारवाईची मागणी

सांगवी : सांगवी व परिसरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी बेवारस वाहने सोडून अथवा टाकून दिलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. या शहराचे व परिसराचे विद्रूपीकरण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.सांगवीत रस्त्याच्या कडेने आणि अडगळीच्या ठिकाणी वाहने बेवारस दिसून येतात. ही बेवारस वाहने पोलीस प्रशासनास दिसत का नाहीत, हा एक मोठा प्रश्न असून, सांगवीतील साई चौक, जुनी सांगवीतील अहल्याबाई होळकर घाट, काटेपुरम चौक, फेमस चौक, मुळा नदी रस्ता आदी परिसरात वाहने बेवारस दिसून येतात. नागरिक जुनी व वापरात नसलेली वाहने रस्त्याच्या कडेला दुतर्फा लावून अथवा सोडून देतात. भंगार स्वरूपातील ही वाहने वर्षानुवर्षे तशीच पडून असल्याने प्रदूषण होत आहे. काही ठिकाणी या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच परिसर विद्रूपीकरणात भर पडत आहे.अनेक ठिकाणी काही वाहनांना रस्त्याला बेवारस फेकून नागरिक निघून जातात. ही टाकून दिलेली वाहने कोणाची आहेत व चोरीची तर नाहीत ना, याबाबत तपास होणे आवश्यक आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून अशा बेवारस वाहनांच्या मालकांची माहिती उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे संबंधित वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन वाहनांची विल्हेवाट लावण्यास मदत होईल. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.बंद अवस्थेतील ट्रक ठरत आहे वाहतुकीस अडथळारावेत : येथील भोंडवे कॉर्नर या मुख्य चौकात मागील आठ ते दहा दिवसांपासून एक बेवारस ट्रक उभा असल्याने येथे सकाळ-संध्याकाळ वाहतुकीस अडथळा ठरत आहे. रावेत-आकुर्डी स्टेशन मार्गावर थांबणारी अवजड वाहने, तसेच नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. रस्त्याच्या कडेला अनेक दिवसांपासून उभा असलेला ट्रक वेळेवर बाजूला न केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातासही कारणीभूत ठरत आहे.रस्त्याकडेच्या बंद वाहनांमुळे इतर वाहनांसाठी रस्ता अरुंद होत आहे. इतर वाहनांचा अंदाज येत नाही. अंदाज येत नसल्याने वाहनचालकांना अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषत: या वाहनांमुळे दुचाकीस्वारांसाठी मोठी अडचण निर्माण होत असून, अपघात होत आहेत. याकडे वाहतूक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. भर चौकात बेवारस थांबलेल्या वाहनांवर दुसरे एखादे वाहन धडकून एखादा अपघात झाल्यावर हा ट्रक बाजूला काढणार का, असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.जॅमर लावूनही उपयोग नाहीगेल्या आठ-दहा दिवसांपासून बेवारस अवस्थेत भोंडवे कॉर्नर चौकात असलेल्या ट्रकच्या पुढील दोन्ही चाकांना वाहतूक विभागाने जॅमर लावले आहेत. परंतु आजपर्यंत या ट्रकचा मालक अथवा दुसरा कोणी फिरकलेला नाही. त्यामुळे जॅमर लावूनही उपयोग झाला नसल्याचे दिसून येते. येथे एकीकडे महावितरणाचा मोठा टॉवर तर दुसरीकडे बंद पडलेला ट्रक त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. यामधून वाहन चालविताना वाहनचालकांची दमछाक होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक