शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस वाहनांमुळे सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 03:21 IST

सांगवी आणि रावेतमधील समस्या; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; वाहन मालकांवर कारवाईची मागणी

सांगवी : सांगवी व परिसरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी बेवारस वाहने सोडून अथवा टाकून दिलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. या शहराचे व परिसराचे विद्रूपीकरण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.सांगवीत रस्त्याच्या कडेने आणि अडगळीच्या ठिकाणी वाहने बेवारस दिसून येतात. ही बेवारस वाहने पोलीस प्रशासनास दिसत का नाहीत, हा एक मोठा प्रश्न असून, सांगवीतील साई चौक, जुनी सांगवीतील अहल्याबाई होळकर घाट, काटेपुरम चौक, फेमस चौक, मुळा नदी रस्ता आदी परिसरात वाहने बेवारस दिसून येतात. नागरिक जुनी व वापरात नसलेली वाहने रस्त्याच्या कडेला दुतर्फा लावून अथवा सोडून देतात. भंगार स्वरूपातील ही वाहने वर्षानुवर्षे तशीच पडून असल्याने प्रदूषण होत आहे. काही ठिकाणी या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच परिसर विद्रूपीकरणात भर पडत आहे.अनेक ठिकाणी काही वाहनांना रस्त्याला बेवारस फेकून नागरिक निघून जातात. ही टाकून दिलेली वाहने कोणाची आहेत व चोरीची तर नाहीत ना, याबाबत तपास होणे आवश्यक आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून अशा बेवारस वाहनांच्या मालकांची माहिती उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे संबंधित वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन वाहनांची विल्हेवाट लावण्यास मदत होईल. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.बंद अवस्थेतील ट्रक ठरत आहे वाहतुकीस अडथळारावेत : येथील भोंडवे कॉर्नर या मुख्य चौकात मागील आठ ते दहा दिवसांपासून एक बेवारस ट्रक उभा असल्याने येथे सकाळ-संध्याकाळ वाहतुकीस अडथळा ठरत आहे. रावेत-आकुर्डी स्टेशन मार्गावर थांबणारी अवजड वाहने, तसेच नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. रस्त्याच्या कडेला अनेक दिवसांपासून उभा असलेला ट्रक वेळेवर बाजूला न केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातासही कारणीभूत ठरत आहे.रस्त्याकडेच्या बंद वाहनांमुळे इतर वाहनांसाठी रस्ता अरुंद होत आहे. इतर वाहनांचा अंदाज येत नाही. अंदाज येत नसल्याने वाहनचालकांना अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषत: या वाहनांमुळे दुचाकीस्वारांसाठी मोठी अडचण निर्माण होत असून, अपघात होत आहेत. याकडे वाहतूक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. भर चौकात बेवारस थांबलेल्या वाहनांवर दुसरे एखादे वाहन धडकून एखादा अपघात झाल्यावर हा ट्रक बाजूला काढणार का, असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.जॅमर लावूनही उपयोग नाहीगेल्या आठ-दहा दिवसांपासून बेवारस अवस्थेत भोंडवे कॉर्नर चौकात असलेल्या ट्रकच्या पुढील दोन्ही चाकांना वाहतूक विभागाने जॅमर लावले आहेत. परंतु आजपर्यंत या ट्रकचा मालक अथवा दुसरा कोणी फिरकलेला नाही. त्यामुळे जॅमर लावूनही उपयोग झाला नसल्याचे दिसून येते. येथे एकीकडे महावितरणाचा मोठा टॉवर तर दुसरीकडे बंद पडलेला ट्रक त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. यामधून वाहन चालविताना वाहनचालकांची दमछाक होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक