शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा अभियान, तरीही महिला असुरक्षितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 02:20 IST

हिंजवडीत विनयभंगाच्या घटना; पोलीस आयुक्तांच्या बदलीनंतर उपक्रम बासनात

पिंपरी : पुणे शहर पोलिसांच्या माध्यमातून तत्कालीन पोलीस अयुक्त रश्मी शुक्ला यांच्या पुढाकाराने हिंजवडी, वाकड परिसरातील महिलांसाठी सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना, उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये वॉक विथ कमिशनर, बडी कॉप आणि प्रतिसाद अ‍ॅप आदी उपक़्रमांचा समावेश होता. तत्कालीन पोलीस आयुक्त शुक्ला यांची बदली झाली. अन् पुन्हा हिंजवडीत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.हिंजवडीत एका उच्चभ्रू वसाहतीत फेरफटका मारण्यासाठी बाहेर आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. तरुणाने फेरफटका मारणाऱ्या मुलीला मिठी मारली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणास अटक केली आहे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने राबविलेल्या उपाययोजनांमध्ये ‘बडी कॉप’ या उपक्रमाचे कौतुक झाले होते. बडी कॉप उपक्रमात आयटीपार्क परिसरात राहणाºया नोकरदार महिला आणि शिक्षण घेणाºया तरुणी यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले. नोकरदार महिला आणि तरुणींनी कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील तर बडी कॉपच्या माध्यमातून त्या समस्या व्यक्त कराव्यात. बडी कॉपमध्ये काही महिला पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून तातडीने अडचणीत असणाºया महिलांना मदत मिळू शकते. त्या समस्येवर तोडगा काढण्याची यंत्रणा कार्यान्वित केली होती.तळवडे सॉप्टवेअर पार्कमधील अभियंता तरुणी अंतरा दास हिचा खून झाला. त्यानंतर हिंजवडीतील आयटी कंपनीत काम करणाºया रसिला राजू ओपी या तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आला. या घटनेमुळे आयटी क्षेत्रात काम करणाºया महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. पुणे शहर पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन विविध उपाययोजना आखल्या गेल्या. थेट पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन अशा समस्या मांडण्यास तरुणी पुढे येऊ लागल्या. पोलीस महिला सुरक्षा अभियानाचा गवगवा झाला. महिला सुरक्षिततेच्या समस्या मात्र अद्यापही तशाच आहेत. नव्याने झालेल्या आयुक्तालयांतर्गत आता हिंजवडी पोलीस ठाण्याचा समावेश झाला आहे.आयुक्तालयांकडून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या जाणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेषत: हिंजवडी, वाकड या परिसरात नोकरदार महिला आणि शिक्षण घेणाºया तरुणी अशा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना अंमलात आणल्या जाव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. केवळ विनयभंग आणि बलात्काराच्या घटनाच नाहीत, तर सोनसाखळी चोरीच्या घटनांचे प्रमाण मोठे आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाWomenमहिला