शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा अभियान, तरीही महिला असुरक्षितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 02:20 IST

हिंजवडीत विनयभंगाच्या घटना; पोलीस आयुक्तांच्या बदलीनंतर उपक्रम बासनात

पिंपरी : पुणे शहर पोलिसांच्या माध्यमातून तत्कालीन पोलीस अयुक्त रश्मी शुक्ला यांच्या पुढाकाराने हिंजवडी, वाकड परिसरातील महिलांसाठी सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना, उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये वॉक विथ कमिशनर, बडी कॉप आणि प्रतिसाद अ‍ॅप आदी उपक़्रमांचा समावेश होता. तत्कालीन पोलीस आयुक्त शुक्ला यांची बदली झाली. अन् पुन्हा हिंजवडीत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.हिंजवडीत एका उच्चभ्रू वसाहतीत फेरफटका मारण्यासाठी बाहेर आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. तरुणाने फेरफटका मारणाऱ्या मुलीला मिठी मारली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणास अटक केली आहे. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने राबविलेल्या उपाययोजनांमध्ये ‘बडी कॉप’ या उपक्रमाचे कौतुक झाले होते. बडी कॉप उपक्रमात आयटीपार्क परिसरात राहणाºया नोकरदार महिला आणि शिक्षण घेणाºया तरुणी यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले. नोकरदार महिला आणि तरुणींनी कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील तर बडी कॉपच्या माध्यमातून त्या समस्या व्यक्त कराव्यात. बडी कॉपमध्ये काही महिला पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून तातडीने अडचणीत असणाºया महिलांना मदत मिळू शकते. त्या समस्येवर तोडगा काढण्याची यंत्रणा कार्यान्वित केली होती.तळवडे सॉप्टवेअर पार्कमधील अभियंता तरुणी अंतरा दास हिचा खून झाला. त्यानंतर हिंजवडीतील आयटी कंपनीत काम करणाºया रसिला राजू ओपी या तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आला. या घटनेमुळे आयटी क्षेत्रात काम करणाºया महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. पुणे शहर पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन विविध उपाययोजना आखल्या गेल्या. थेट पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन अशा समस्या मांडण्यास तरुणी पुढे येऊ लागल्या. पोलीस महिला सुरक्षा अभियानाचा गवगवा झाला. महिला सुरक्षिततेच्या समस्या मात्र अद्यापही तशाच आहेत. नव्याने झालेल्या आयुक्तालयांतर्गत आता हिंजवडी पोलीस ठाण्याचा समावेश झाला आहे.आयुक्तालयांकडून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या जाणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेषत: हिंजवडी, वाकड या परिसरात नोकरदार महिला आणि शिक्षण घेणाºया तरुणी अशा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना अंमलात आणल्या जाव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. केवळ विनयभंग आणि बलात्काराच्या घटनाच नाहीत, तर सोनसाखळी चोरीच्या घटनांचे प्रमाण मोठे आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाWomenमहिला