शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

सुरक्षा कठड्याच्या लोखंडी पाईपची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 06:58 IST

पिंपरी गावातून पिंपळे सौदागरकडे जाण्यासाठी पवना नदीवर पूल उभारण्यात आला आहे.

पिंपरी : पिंपरीगावाकडून पिंपळे सौदागरकडे जाणाऱ्या मार्गावर पवना नदीवर शंकरबुवा श्रीपती वाघेरे पूल आहे. या पुलाच्या संरक्षक कठड्याची दुरवस्था झाली आहे. कठड्याचे लोखंडी पाईप चोरीला गेले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. पाईप बसवून सुरक्षा कठड्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.पिंपरी गावातून पिंपळे सौदागरकडे जाण्यासाठी पवना नदीवर पूल उभारण्यात आला आहे. पूल अरुंद आहे. पिंपरी गावातून रहाटणी, पिंपळे सौदागर, जगताप डेअरी, वाकड, विशालनगर, वाकड, कस्पटे वस्ती, मानकर वस्ती, हिंजवडी आयटी पार्ककडे जाण्यासाठी या पुलाचा वापर होतो. पिंपरी कॅम्प, पिंपरी मार्केट, पुणे-मुंबई महामार्ग आदी भागांतून पिंपरी गावातून पिंपळे सौदागर आणि रहाटणीकडे जाण्यासाठी हा एकमेव सोयीचा पूल आहे. त्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते. पीएमपीएमएल बस, खासगी कंपन्यांच्या बस, स्कूल बस, कार आणि दुचाकींचा यात मोठा समावेश आहे. वाहनांची संख्या जास्त असून, पूल अरुंद आहे. त्यामुळे येथे सातत्याने वर्दळ असते.पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी पाईपचे संरक्षक कठडे उभारण्यात आले आहेत. या कठड्याचे पाईप चोरीला गेले आहेत. काही पाईप तुटले आहेत. त्यामुळे वाहने पुलावरून खाली जाण्याची शक्यता आहे. काही पाईप जीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांचीही तुटण्याची शक्यता आहे. भंगार व्यावसायिकांनी आणि काही चोरट्यांनी रात्री पाईपची चोरी केलेली आहे. उर्वरित पाईप चोरी करण्याच्या उद्देशाने तोडण्यात येत आहेत.कचºयामुळे दुर्गंधीपुलावरून नदीत निर्माल्य आणि कचरा टाकण्यात येत होता. त्याला आळा घालण्यासाठी महापालिकेने पुलावर संरक्षक जाळ्या लावल्या. तरीही काही वाहनचालक पुलावर वाहन थांबवून जाळीवरून नदीत निर्माल्य टाकतात. काही जणांकडून पुलाच्या संरक्षक कठड्यांलगत कचरा टाकण्यात येत आहे. हा कचरा महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांकडून उचलण्यात येत नाही. त्यामुळे कचरा येथे कुजून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. ‘मॉर्निंग वॉक’साठी येणाºया नागरिकांना आणि वाहनचालकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.पादचाºयांच्या सुरक्षेचा प्रश्नपूल मुळातच अरुंद आहे. त्यामुळे या पुलावर पदपथ नाही. त्यामुळे पादचाºयांना अरुंद पुलावरून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. ‘मॉर्निंग वॉक’ करणारे नागरिकही या पुलाचा वापर करतात. त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न येथे उपस्थित होतो. भरधाव वाहनांची पादचाºयांना धडक बसून येथे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे समांतर पूल उभारून त्यावर पादचाºयांसाठी पदपथाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.फलकाची दुरवस्था४पुलाच्या बाजूला फलक लावण्यात आला आहे. या फलकाचीही दुरवस्था झाली आहे. फलक गंजला असून, त्यावरील माहिती वाचणे अशक्य झाले आहे. याकडेही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. महापालिका अधिकाºयांनी याबाबत खबरदारी घेणे आवश्यक असतानाही याबाबत ते उदासीन असल्याचे दिसून येतात.समांतर पुलाचे काय?४अरुंद पुलामुळे वाहनांचा खोळंबा होऊन अपघाताचे प्रकार घडतात. त्यासाठी या पुलाला समांतर पूल उभारण्याची मागणी आहे. त्याबाबत महापालिकेकडे पाठपुरावाही करण्यात आला आहे. मात्र अद्यापही महापालिकेकडून त्याबाबत कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे समांतर पुलाचे काय झाले, असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :theftचोरी