शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दोरीवरून खुनाचा छडा, कामशेत पोलिसांची कामगिरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 04:49 IST

कामशेत पोलिसांनी मृताच्या गळ्यात अडकलेल्या दोरीच्या तुकड्यावरून खुनाचा छडा लावत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

कामशेत : कामशेत पोलिसांनी मृताच्या गळ्यात अडकलेल्या दोरीच्या तुकड्यावरून खुनाचा छडा लावत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.दहा डिसेंबरला मळवली ते कामशेत दरम्यान अप रेल्वे ट्रॅक किलोमीटर नं. १३८/१८ च्या खांबापासून २० फूट अंतरावर रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या हरिश्चंद्र पांडुरंग वाघमारे (वय ३५, रा. खालापूर, रायगड; सध्या रा. बोरज, मावळ) यांचा मृतदेह लोहमार्ग पोलिसांना आढळला होता. पोलिसांनी पंचनामा केलाअसता, हा खुनाचा प्रकार असल्याचे तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मयताला रेल्वे रुळावर टाकले असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरील गुन्हा कामशेत पोलीस ठाण्यात वर्ग झाला होता.या गुन्ह्याचा कोणताही पुरावा नसताना फक्त मृताच्या गळ्यात अडकलेल्या दोरीच्या तुकड्यावरून कामशेत पोलिसांनी खुनातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या.यात कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आय. एस. पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारीअजय दरेकर, राम कानगुडे, दत्ता शिंदे यांनी या तपास कामात अथक परिश्रम घेतले.मिळालेल्या माहितीनुसार, २१ दिवसांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याचे कोणतेही पुरावे नसताना फक्त मृताच्या गळ्यापाशी मिळालेल्या लहान दोरीच्या साहाय्याने या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींपर्यंत पोलिसांना पोहोचता आले. मृताच्या गळ्यापाशी शेतात काम करण्यासाठी वापरण्यात येणाºया खताच्या रिकाम्या पोत्यापासून बनवलेली दोरी मिळाली. अशा प्रकारच्या दोरी वळण्याचे काम कातकरी समाज करीत असल्याने, तसेच भाताचा पेंढा व भात झोडण्यासाठी वापरली जाते हे लक्षात येताच पवन मावळ व परिसरातील कातकरी वस्त्यांमध्ये तपासास प्रारंभ केला. कोणकोणती कुटुंबे अथवा इसम गायबअसल्याचा शोध घेत असता कडधे येथील कातकरी समाजाकडून पोलिसांना किरकोळ माहिती मिळाली. त्या आधारावर व एका माहीतगार कातकरी माणसाला हाताशी घेऊन पहिला आरोपी विठ्ठल रघुनाथ वाल्हेकर (वय २७) याला जवण - मावळ येथील डोंगरवाडी येथे त्याच्या मामाकडे असताना पकडले, तर दुसरा आरोपी रघुनाथ चंदू वाल्हेकर (वय ५५) याला विसापूर किल्ल्यालगत असलेल्या धालेवाडी येथून ताब्यात घेतले.हा तेथे अनेक दिवस लपून बसला होता. रानातील शिकारीवर आपली गुजराण करीत होता.तिसरा आरोपी कैलास ऊर्फ काळू रघुनाथ वाल्हेकर (रघुनाथचा लहान मुलगा) हा फरार असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.येण्या-जाण्यास मज्जाव केल्याने हत्यामृत हरिश्चंद्र पांडुरंग वाघमारे हे कामशेत हद्दीतील एक्सप्रेस हायवेजवळ सुरू असलेल्या एका पोल्ट्री फार्म बांधकामावर रखवालीचे काम करीत होते. आरोपी रघुनाथ, विठ्ठल व कैलास हे जवळील एका शेतावर कामाला येत होते. ते डोंगरवाडी-सावंतवाडी-बोरजच्या खिंडीतून डोंगर चढून रोज पायी येत जात होते. त्यांचा रस्ता बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणातून असल्याने हरिश्चंद्र वाघमारे याने त्यांना येण्या-जाण्यास मज्जाव केला. त्यातून वादावादी झाली. त्याचाच राग मनात धरून तिन्ही आरोपींनी ठरवून संगनमताने त्याचा शेतात कामासाठी वापरण्यात येणाºया वळलेल्या दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला.पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला पाठकुळी घेऊन एक्सप्रेस हायवे ओलांडण्यासाठी असलेल्या मोरीतून रेल्वे रुळावर आणून टाकले. यात मृताच्या रस्त्यावर पडलेली एक चप्पल, बॅटरी यांच्या आधारे व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खताच्या पोत्याच्या वळलेल्या दोरीमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यामध्ये ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांच्या मदतीने कामशेत पोलिसांनी सुमारे एक आठवड्यात माग काढत दोन आरोपींना पकडून येरवडा कारागृहात त्यांची रवानगी केली.

टॅग्स :Crimeगुन्हा