शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

नदी स्वच्छता चळवळ व्हावी, जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:08 IST

रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने सुरू करण्यात आलेले ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ हे अभियान केवळ अभियान न राहता ही स्वच्छतेची चळवळ व्हायला हवी, असे मत खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या व महपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत यांनी व्यक्त केले.

पिंपरी : रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने सुरू करण्यात आलेले ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ हे अभियान केवळ अभियान न राहता ही स्वच्छतेची चळवळ व्हायला हवी, असे मत खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या व महपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत यांनी व्यक्त केले.रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाला तीन महिने पूर्ण झाली आहेत. रविवारी हे ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ अभियान रावेत बंधारा येथे राबविले. या मोहिमेत दूत अंजली भागवत यांनी सहभाग घेतला. या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.रावेत बंधारा येथील ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’अभियानात महापालिकेचे सहायक आयुक्त दिलीप गावडे, ब प्रभाग सहायक आयुक्त संदीप खोत, देश का सच्चा हिरो असे नरेंद्र मोदी यांनी गौरविलेले चंद्रकात कुलकर्णी, अमित गोरखे, हेमंत गावंडे, जलबिरादरीचे नरेंद्रभाई चुग, नगरसेविका करुणा चिंचवडे, रोटरीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, सचिव दीपक वाल्हेकर, मयूर वाल्हेकर, जगन्नाथ फडतरे, सोमनाथ हरपुडे आदी अभियानात सहभागी झाले. तसेच पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, पर्यावरण संवर्धन समिती, वृक्षवल्ली, सावरकर मित्र मंडळ, शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशन, एसकेएफ कंपनी एम्प्लॉयर्स ग्रुप, हरीष मोरे मित्र परिवार, संस्कार प्रतिष्ठान, लेवा शक्ती महिला बचत गट, अमित मोगातरो आदींनी सहभाग घेतला.अंजली भागवत म्हणाल्या, ‘सौंदर्याने नटलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचे सौंदर्य टिकवणे आपल्या हातात आहे. आपण समाजाचा घटक म्हणून, माझ्या स्वत:साठी हे पर्यावरण आहे असे समजून ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ अशा अभियानामध्ये सहभागी व्हायला हवे. प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर पर्यावरण स्वच्छतेची सुरुवात केली, तर पिंपरी-चिंचवड शहर देशात अग्रेसर राहील.’’>रावेत ते दापोडीपर्यंत काढणार जलपर्णीपाच ट्रक जलपर्णी बाहेर काढली. सोमनाथ मुसुडगे यांनी जलपर्णीच्या वाढीविषयी व निर्मूलनाविषयी माहिती सांगितली. सुनील कवडे यांनी लग्नाच्या तेविसाव्या वाढदिवसानिमित्त या स्वच्छता अभियानाला आर्थिक मदत केली. हेमंत गावांदे यांनी पाच हजार रुपये तर सचिन खोले यांनी एक हजार एक रुपयांची देणगी दिली. पुढील आठवडाभर रावेतपासून ते दापोडीपर्यंतची जलपर्णी काढण्यात येणार आहे. सोमवारी अभियानाच्या शंभराव्या दिवशी रावेत बंधारा येथे हे अभियान राबविण्यात येणार आहे.