शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

नदी स्वच्छता चळवळ व्हावी, जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:08 IST

रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने सुरू करण्यात आलेले ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ हे अभियान केवळ अभियान न राहता ही स्वच्छतेची चळवळ व्हायला हवी, असे मत खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या व महपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत यांनी व्यक्त केले.

पिंपरी : रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने सुरू करण्यात आलेले ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ हे अभियान केवळ अभियान न राहता ही स्वच्छतेची चळवळ व्हायला हवी, असे मत खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या व महपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत यांनी व्यक्त केले.रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाला तीन महिने पूर्ण झाली आहेत. रविवारी हे ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ अभियान रावेत बंधारा येथे राबविले. या मोहिमेत दूत अंजली भागवत यांनी सहभाग घेतला. या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.रावेत बंधारा येथील ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’अभियानात महापालिकेचे सहायक आयुक्त दिलीप गावडे, ब प्रभाग सहायक आयुक्त संदीप खोत, देश का सच्चा हिरो असे नरेंद्र मोदी यांनी गौरविलेले चंद्रकात कुलकर्णी, अमित गोरखे, हेमंत गावंडे, जलबिरादरीचे नरेंद्रभाई चुग, नगरसेविका करुणा चिंचवडे, रोटरीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, सचिव दीपक वाल्हेकर, मयूर वाल्हेकर, जगन्नाथ फडतरे, सोमनाथ हरपुडे आदी अभियानात सहभागी झाले. तसेच पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, पर्यावरण संवर्धन समिती, वृक्षवल्ली, सावरकर मित्र मंडळ, शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशन, एसकेएफ कंपनी एम्प्लॉयर्स ग्रुप, हरीष मोरे मित्र परिवार, संस्कार प्रतिष्ठान, लेवा शक्ती महिला बचत गट, अमित मोगातरो आदींनी सहभाग घेतला.अंजली भागवत म्हणाल्या, ‘सौंदर्याने नटलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचे सौंदर्य टिकवणे आपल्या हातात आहे. आपण समाजाचा घटक म्हणून, माझ्या स्वत:साठी हे पर्यावरण आहे असे समजून ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ अशा अभियानामध्ये सहभागी व्हायला हवे. प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर पर्यावरण स्वच्छतेची सुरुवात केली, तर पिंपरी-चिंचवड शहर देशात अग्रेसर राहील.’’>रावेत ते दापोडीपर्यंत काढणार जलपर्णीपाच ट्रक जलपर्णी बाहेर काढली. सोमनाथ मुसुडगे यांनी जलपर्णीच्या वाढीविषयी व निर्मूलनाविषयी माहिती सांगितली. सुनील कवडे यांनी लग्नाच्या तेविसाव्या वाढदिवसानिमित्त या स्वच्छता अभियानाला आर्थिक मदत केली. हेमंत गावांदे यांनी पाच हजार रुपये तर सचिन खोले यांनी एक हजार एक रुपयांची देणगी दिली. पुढील आठवडाभर रावेतपासून ते दापोडीपर्यंतची जलपर्णी काढण्यात येणार आहे. सोमवारी अभियानाच्या शंभराव्या दिवशी रावेत बंधारा येथे हे अभियान राबविण्यात येणार आहे.