शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीतील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 03:04 IST

तीर्थक्षेत्र आळंदीतील स्थानमाहात्म्य जोपासत येथील पुरातन जलकुंडांचे जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याच्या मोहिमेला रविवारी सुरुवात करण्यात आली. या मोहिमेंतर्गत आळंदीतील भागीरथी कुंड, कोटी कुंड, रामकुंड आदी सुमारे ५१ पुरातन जलस्रोत कुंडांची स्वच्छता करण्यात येणार आहे.

आळंदी - तीर्थक्षेत्र आळंदीतील स्थानमाहात्म्य जोपासत येथील पुरातन जलकुंडांचे जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याच्या मोहिमेला रविवारी सुरुवात करण्यात आली. या मोहिमेंतर्गत आळंदीतील भागीरथी कुंड, कोटी कुंड, रामकुंड आदी सुमारे ५१ पुरातन जलस्रोत कुंडांची स्वच्छता करण्यात येणार आहे. याबरोबरच इंद्रायणी नदीपात्रातील कचरा काढून इंद्रायणी नदी परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे येथील सर्वच जलस्रोत मोकळा श्वास घेणार आहेत.या स्वच्छता मोहिमेस उपनगराध्यक्ष सागर भोसले यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. तसेच पुणे येथील गायत्री परिवाराच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या परिवाराचे शैलेंद्र पटेल यांनी इंद्रायणी नदीलगत असलेल्या रामकुंडासमोर जुने जलस्रोत तसेच त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी यंत्रणा विकसित करून भाविकांना शुद्ध तीर्थ पिण्यास सोयीचे व्हावे यासाठी संकल्प केला. या प्रसंगी आळंदीतील सामाजिक कार्यकर्ते सुरेश दौंडकर, सखाराम गवळी, दत्तात्रय काळे आदी उपस्थित होते.गोपाळपुरातील पुरातन कुंड रस्तारुंदीकरण बाधित होऊ नये यासाठी परिसर स्वच्छ करून पुरातन कुंड परिसर मोकळा करण्यात आले. येथील झुडपे, वाढलेले गवत तसेच पालापाचोळा हटविण्यात आला. या वेळी उपनगराध्यक्ष सागर भोसले यांनी पुरातन वास्तू व कुंड हे तीर्थक्षेत्र आळंदीची जुनी ओळख असल्याने त्यांचे जतन केले जाईल असे सांगितले.देहूनंतर आळंदीत नदीची स्वच्छता करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. या कार्याचा भाग म्हणून आळंदीतील इंद्रायणी नदीची तसेच पुरातन कुंडांची स्वच्छता सेवकांनी उत्साहात केली. या स्वच्छता मोहिमेत युवक तरुणाचा तसेच महिला सदस्यांचा प्रतिसाद मिळाला.तीन वर्षांपासून नदी स्वच्छता मोहीमगेल्या ३ वर्षांपासून देहू येथील इंद्रायणी नदीसह देहूतील नदीघाटाची स्वच्छता गायत्री परिवाराच्या वतीने राबविली जात आहे. याच मोहिमेत आता देहूप्रमाणे आळंदीला जोडण्यात येत असल्याचे पुणे गायत्री परिवाराचे आशिष यांनी सांगितले. दर महिन्यातील शेवटच्या रविवारी देहू आणि आळंदीत रोटेशन पद्धतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची देहूप्रमाणे आळंदीत उत्साहात सुरुवात झाली. देहूत रानजाई प्रकल्पाचे सोमनाथ आबा यांचे मार्गदर्शन झाल्याचे आशिष यांनी सांगितले.नदीपात्राने घेतला मोकळा श्वासआळंदी येथील स्वच्छता मोहिमेत नदीपात्रातील कचरा, कपडे, प्लॅस्टिक बाटल्या, पिशव्या, जीर्ण फोटो फ्रेम्स, काचा, फुलांचे निर्माल्य आदी दाताळ्यांचा वापर करून बाहेर काढण्यात आले. या मोहिमेत सुमारे एक हजार किलोवर कचरा नदीपात्रातून बाहेर काढून नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे घंटागाड्यातून देण्यात आले.

टॅग्स :Waterपाणी