शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विश्रांती कक्षाला टाळे, पिंपरी-चिंचवड एसटी आगार, आम्ही राहायचे कुठे? चालक-वाहकांचा प्रशासनाला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 02:44 IST

नेहरूनगर : महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला असून, तिसºया दिवशीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड आगारातील ३५० एसटी चालक-वाहकांना विश्रांती कक्षातून पोलीस बंदोबस्तासह बाहेर काढले. आता आम्ही राहायचे कुठे, असा सवाल चालक-वाहकांनी एसटी प्रशासनाला केला आहे.सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पदनिहाय वेतनश्रेणी मिळावी. ...

नेहरूनगर : महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला असून, तिसºया दिवशीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड आगारातील ३५० एसटी चालक-वाहकांना विश्रांती कक्षातून पोलीस बंदोबस्तासह बाहेर काढले. आता आम्ही राहायचे कुठे, असा सवाल चालक-वाहकांनी एसटी प्रशासनाला केला आहे.सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पदनिहाय वेतनश्रेणी मिळावी. इतर शासकीय कर्मचाºयांप्रमाणे एसटी कर्मचाºयांना सुविधा मिळाव्यात, कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द करावी. सन २००० पासून कनिष्ठ कामगारांना वेतनातील विसंगती दूर कराव्यात, १ एप्रिल २०१६ हंगामी वाढ सुरू करावी, जुलमी परिपत्रके व चालक कम वाहकाची संकल्पना त्वरित रद्द करावी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीस ५०० रुपये भरून मोफत पास द्यावा, या सर्व मागण्यांकरिता हा बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे.सरकारने मागण्या मान्य न केल्याने राज्यव्यापी बेमुदत संप तिसºया दिवशीही सुरूच राहिला. एसटी महामंडळाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर मुख्य आगारातील संपात सहभागी चालक-वाहकांच्या विश्रांती कक्षाला पुणे जिल्हा एसटी विभागीय कार्यालयाचे प्रमुख रविंद्र मोरे, आगार व्यवस्थापक अनिल भिसे यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या बंदोबस्तात टाळे ठोकण्यात आले. त्यामुळे उस्मानाबाद, लातूर, धुळे , बीड, सोलापूर, औरंगाबाद या जिल्ह्यांतील आगारातील ३५० चालक-वाहकांना गुरुवारी दुपारी १२च्या सुमारास सामानासह बाहेर काढल्यामुळे आगारात मोठा गोंधळ उडाला होता.या वेळी आम्ही तुमच्या सर्व मागण्या वरिष्ठांकडे पाठवू, असे मोरे व भिसे यांनी सांगितले. आगारात कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.शहरातील वल्लभनगर आगारामधील एकूण १३० एसटी बस तीन दिवसांपासून जागेवरच उभ्या असल्यामुळे गावाकडे जाण्यासाठी नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. संपामुळे अनेकांना नाइलाजास्तव खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, त्याकरिता त्यांना नेहमीच्या दरापेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागत असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. हा संप संपणार कधी, असा सवाल प्रवासी विचारत आहेत.अनेकांनी आरक्षण रद्द केल्यामुळे मोठा आर्थिक फटका आगाराला बसला असून, गुरुवारअखेर तीन दिवसांचे ४५ लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती भिसे यांनी दिली.शांततेने नोंदविला निषेधया वेळी अनेक चालक-वाहकांनी, विश्रांतीकक्षाला टाळे ठोकण्याचा लेखी आदेश दाखवा, आम्ही राहायचे कुठे, ऐन दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्हाला आगारामधील विश्रांती कक्षाबाहेर काढले, ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे चालक-वाहकांनी आगारप्रमुखांना सुनावले. अनेक चालक-वाहकांनी डोक्यावर आपले सामान घेऊन आगारात फेरी काढून याचा शांततेने निषेध देखील नोंदवला.आगारात तणावाचे वातावरणआगारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर पुणे जिल्हा एसटी विभागीय कार्यालयाचे प्रमुख रवींद्र मोरे, आगार व्यवस्थापक अनिल भिसे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, वल्लभनगर आगार एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण मोहिते, सचिव हरिभाऊ जाधव, काही चालक-वाहक यांच्यात एक बैठकदेखील झाली. या बैठकीमध्ये तासभर चर्चा झाली. या वेळी एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी त्यांच्या मागण्या मांडल्या.ग्रामीण भागातील प्रवाशांचे हालवडगाव मावळ : ऐन दिवाळीत एसटी कर्मचाºयांनी केलेल्या संपामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील एसटी प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत.एसटीअभावी प्रवाशांना तासन्तास खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांची वाट पाहावी लागत आहे. मावळ तालुक्यात ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटी हे एकमेव साधन असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. दिवाळीच्या सुटीत तालुक्यातील कामानिमित्त बाहेर असलेले नागरिक सुटीमध्ये आपापल्या गावी येत असतात. परंतु गावी जाण्यासाठी एसटी बस नसल्यामुळे प्रवाशांना ताटकळावे लागत आहे.मोर्वे, चावसर, तुंग, खांडी, कसूर यांसारख्या ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी एसटी हाच पर्याय आहे. वडगावपासून ही सर्व गावे ४० ते ५० किलोमीटरच्या अंतरावर आहेत. या गावांमध्ये जाण्यासाठी प्रामुख्याने एसटीचा वापर केला जातो. परंतु एसटी कर्मचाºयांनी संप केल्यामुळे या गावातील प्रवाशांची चांगलीच तारांबळ झाली आहे. याच परिसरातील नागरिक उदरनिर्वाहासाठी पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. ते दिवाळीच्या सुटीत आठ-दहा दिवसांसाठी गावी येत असतात.४आपल्या गावात जाण्यासाठी एसटी हा एकमेव मार्ग असल्याने आणि एसटी कर्मचाºयांनी संप केल्याने या भागातील नागरिकांनी गावी न येणेच पसंत केले आहे. एसटी बंदचा फटका कामशेत, तळेगाव दाभाडे,वडगाव, लोणावळा या महत्त्वाच्या बाजारपेठांवरदेखील पडला आहे. एसटी सेवा बंद असल्याने नागरिकांना घरातून बाहेर खरेदीसाठी येण्यास विलंब लागत असल्यामुळे बाजारपेठेत देखील ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे.अवैध प्रवासी वाहतूक करणाºयांची दिवाळीएसटी कर्मचाºयांनी संप पुकारल्यामुळे मावळ तालुक्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनचालकांची दिवाळी गोड झाली आहे. पवन मावळ, आंदर मावळ, नाणे मावळ या भागातील अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने भरगच्च भरून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाताना दिसत आहेत. नागरिकांनाही सणासुदीच्या दिवसांत लवकर घरी जाणे पसंत असल्यामुळे तेदेखील जोखीम पत्करून अशा वाहनात प्रवास करताना दिसत आहेत.

टॅग्स :ST Strikeएसटी संपpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड