शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील : एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 02:11 IST

मुंबई ते नागपूर दरम्यान बांधण्यात येणाºया समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांना तातडीने मोबदला दिला असल्याने जमिनीचे भूसंपादन गतीने झाले आहे.

देहूरोड  - मुंबई ते नागपूर दरम्यान बांधण्यात येणाºया समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांना तातडीने मोबदला दिला असल्याने जमिनीचे भूसंपादन गतीने झाले आहे. आवश्यक जमीन ताब्यात आली आहे. या महामार्गाचा शेतकºयांना फायदा होणार असून, शेतकºयांच्या आत्महत्या नक्कीच कमी होतील, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी देहूरोड येथे केले.मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील निगडी ते देहूरोड या सव्वासहा रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील एक किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलाच्या कामाचा लोकार्पण सोहळा शिंदे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी शिंदे बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट हे अध्यक्षस्थानी होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे, सीईओ अभिजित सानप, सदस्य विशाल खंडेलवाल, ललित बालघरे, अ‍ॅड़ अरुणा पिंजण, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, नगरसेवक सुनील शेळके, रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता प्रशांत औटी, मुख्य अभियंता दि. द़ उकिर्डे, कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी खासदार बारणे, आमदार भेगडे यांनी मनोगतात विविध मागण्या केल्या.शिंदे म्हणाले, ‘‘दुर्गम भागातील शेतकºयांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील रखडलेले ट्रामा सेंटर या महिनाअखेर सुरू करण्यात येणार आहे. खंडाळा-लोणावळा घाटातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी दहा किलोमीटर अंतराचा बोगदा बांधण्याच्या कामाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, संबंधित काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. दळणवळण यंत्रणा सक्षम असते, त्या भागातील विकास व प्रगती वेगात होत असल्याने चांगल्या प्रकारचे रस्ते देण्यासाठी महामंडळ कार्यरत आहे. द्रुतगती मार्गालगत सेवा रस्ता देता येत नाही. मात्र वीस किलोमीटर भागात शंभर फुटी रस्त्याचे सर्वेक्षण सुरू केले असून, पीएमआरडीच्या माध्यमातून रस्त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. संत तुकाराममहाराज पालखी मार्गावर निगडीपर्यंत भाविकांसाठी पादचारी मार्ग बांधणे प्रस्तावित आहे.नागरिक काँग्रेसला घरचा मार्ग दाखविणारकाँग्रेसवाल्यांना उभ्या आयुष्यात बाराशे कोटी कशाला म्हणतात हे माहिती नव्हते. आज ते परिवर्तन यात्रा काढू लागले. आता लोकं परिवर्तन करणार म्हणजे तुम्हाला घरचा मार्ग दाखविणार हे लक्षात ठेवा. केंद्र सरकारच्या माध्यमातून पालखी मार्ग प्रश्न मार्गी लागला आहे. राज्यातील सात कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी राज्य सरकारने निधी दिला आहे. आगामी काळात कॅन्टोन्मेंट बोर्ड बंद करून नगरपालिका अगर नगरपंचायत स्थापन करण्याची गरज आहे. सत्तर वर्षात जी कामे झाली नाहीत ती पाच वर्षांत झाली आहेत.- गिरीश बापट, पालकमंत्री

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेFarmerशेतकरी