शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आपली कर्तव्ये ओळखावीत - स्वामी स्वरूपानंद सरस्वती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 03:32 IST

प्रत्येक माणसाने आपली कर्तव्ये ओळखली पाहिजेत. परंतु माणसाला आपली कर्तव्ये लक्षात येत नाहीत, कारण माणूस इतरांच्या चुका काढण्यात आपले जीवन वाया घालवत आहे.

चिंचवड : प्रत्येक माणसाने आपली कर्तव्ये ओळखली पाहिजेत. परंतु माणसाला आपली कर्तव्ये लक्षात येत नाहीत, कारण माणूस इतरांच्या चुका काढण्यात आपले जीवन वाया घालवत आहे. आपले निरीक्षण करण्याऐवजी केवळ इतरांचेच निरीक्षण करण्यात आपले जीवन वाया जात असल्याचे मत स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी यांचा ४५६ वा संजीवन समाधी महोत्सव सोमवारी चिंचवड येथे श्री मोरया गोसावी समाधी मंदिर पटांगणावर (देऊळमळा) येथे उत्साहात सुरू झाला. समाधी सोहळ्याचे उद्घाटन परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.समाधी महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी खासदार श्रीरंग अप्पा बारणे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ देवमहाराज, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, गजानन चिंचवडे, उद्योगपती माऊली घोगरे, सहायक अधिकारी संदीप खोत आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी उद्घाटन सोहळ्यापूर्वी मोरया गोसावी मंदिरास भेट दिली.महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त ट्रस्टतर्फे तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे कार्यक्रमावेळी प्रकाशन करण्यात आले. या १२ दिवसांच्या समाधी महोत्सव सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, होम हवन, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, प्रवचन, भजन व मराठी सुगम संगीताचे कार्यक्रम होणार आहेत. सुप्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर, जितेंद्र अभ्यंकर, आनंद भाटे, तौफिक कुरेशी यांचे गायन व वादनाचे कार्यक्रम होणार आहेत.खासदार श्रीरंग बारणे यांनी समाधी सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार व नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनीही उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन डॉ. चारुदत्त देशपांडे यांनी तर प्रास्ताविक विश्वस्त विशाल देव यांनी केले, तर आभार विश्वस्त आनंद तांबे यांनी व्यक्त केले.विचाराच्या कक्षा : प्रेरणेतून श्रद्धा येतेस्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक गोष्टीबाबत प्रेरणा असते. त्याच प्रेरणेतून श्रद्धा येते. आपले जीवन घडविण्यामध्ये बºयाच लोकांचा सहभाग असतो, त्या सर्वांबद्दल असणारी आदराची भावनादेखील श्रद्धाच असते. ही श्रद्धा म्हणजेच परमेश्वराचे अस्तित्व आहे. संकुचित विचार करण्याची प्रवृत्ती मानवी विकासासाठी घातक आहे़ त्यामुळे विचारांच्या कक्षा विस्तृत करायला हव्यात. जी व्यक्ती केवळ भौतिक सुख आणि वासनेसाठी जगते अशा व्यक्तीमध्ये आणि पशुंमध्ये काहीही फरक नसतो. पशुंपेक्षा वेगळी शक्ती निसर्गाने आपल्याला दिली आहे. त्या विचारशक्तीने सद्विवेकाचा विचार करून जीवनाचे सार्थक करायला हवे.

टॅग्स :Puneपुणे