शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

आपली कर्तव्ये ओळखावीत - स्वामी स्वरूपानंद सरस्वती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 03:32 IST

प्रत्येक माणसाने आपली कर्तव्ये ओळखली पाहिजेत. परंतु माणसाला आपली कर्तव्ये लक्षात येत नाहीत, कारण माणूस इतरांच्या चुका काढण्यात आपले जीवन वाया घालवत आहे.

चिंचवड : प्रत्येक माणसाने आपली कर्तव्ये ओळखली पाहिजेत. परंतु माणसाला आपली कर्तव्ये लक्षात येत नाहीत, कारण माणूस इतरांच्या चुका काढण्यात आपले जीवन वाया घालवत आहे. आपले निरीक्षण करण्याऐवजी केवळ इतरांचेच निरीक्षण करण्यात आपले जीवन वाया जात असल्याचे मत स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी यांचा ४५६ वा संजीवन समाधी महोत्सव सोमवारी चिंचवड येथे श्री मोरया गोसावी समाधी मंदिर पटांगणावर (देऊळमळा) येथे उत्साहात सुरू झाला. समाधी सोहळ्याचे उद्घाटन परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.समाधी महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी खासदार श्रीरंग अप्पा बारणे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ देवमहाराज, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, गजानन चिंचवडे, उद्योगपती माऊली घोगरे, सहायक अधिकारी संदीप खोत आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी उद्घाटन सोहळ्यापूर्वी मोरया गोसावी मंदिरास भेट दिली.महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त ट्रस्टतर्फे तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे कार्यक्रमावेळी प्रकाशन करण्यात आले. या १२ दिवसांच्या समाधी महोत्सव सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, होम हवन, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, प्रवचन, भजन व मराठी सुगम संगीताचे कार्यक्रम होणार आहेत. सुप्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर, जितेंद्र अभ्यंकर, आनंद भाटे, तौफिक कुरेशी यांचे गायन व वादनाचे कार्यक्रम होणार आहेत.खासदार श्रीरंग बारणे यांनी समाधी सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार व नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनीही उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन डॉ. चारुदत्त देशपांडे यांनी तर प्रास्ताविक विश्वस्त विशाल देव यांनी केले, तर आभार विश्वस्त आनंद तांबे यांनी व्यक्त केले.विचाराच्या कक्षा : प्रेरणेतून श्रद्धा येतेस्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक गोष्टीबाबत प्रेरणा असते. त्याच प्रेरणेतून श्रद्धा येते. आपले जीवन घडविण्यामध्ये बºयाच लोकांचा सहभाग असतो, त्या सर्वांबद्दल असणारी आदराची भावनादेखील श्रद्धाच असते. ही श्रद्धा म्हणजेच परमेश्वराचे अस्तित्व आहे. संकुचित विचार करण्याची प्रवृत्ती मानवी विकासासाठी घातक आहे़ त्यामुळे विचारांच्या कक्षा विस्तृत करायला हव्यात. जी व्यक्ती केवळ भौतिक सुख आणि वासनेसाठी जगते अशा व्यक्तीमध्ये आणि पशुंमध्ये काहीही फरक नसतो. पशुंपेक्षा वेगळी शक्ती निसर्गाने आपल्याला दिली आहे. त्या विचारशक्तीने सद्विवेकाचा विचार करून जीवनाचे सार्थक करायला हवे.

टॅग्स :Puneपुणे