शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

"हृदयात राम आणि हाताला काम", हे आपलं हिंदुत्व; आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 21, 2024 16:57 IST

आम्ही औरंगाबादचे संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशिव केले, पण कुठेही दंगली घडू दिल्या नाहीत.

पिंपरी : अयोध्येत २२ जानेवारीला मोठा दिवस आहे. श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. "हृदयात राम आणि हाताला काम" हे आपलं हिंदुत्व असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे.  शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाची महान्याय सभा पिंपरीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी राज्य संघटक एकनाथ पवार, मावळ लाेकसभा मतदार संघाचे संघटक संजाेग वाघेरे पाटील, पुणे जिल्हाप्रमुख ॲड. गाैतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटक संतोष वाळके, जिल्हा उपसंघटिका वैशाली मराठे, युवा सेना अधिकारी चेतन पवार, माजी नगरसेवक मीनल यादव आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. सत्तेत आलो की पहिल्याच बैठकीत आरक्षण मिळवून देऊ म्हणाले होते. रोजगार मिळवून देऊ म्हणाले, महागाई संपवू म्हणाले होते. पण आता काय सुरु तर सत्तर वर्षांपूर्वी त्यांनी काय केले होते? आता किती वर्षे तेच तेच उकरून काढणार आहेत. आम्ही औरंगाबादचे संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशिव केले, पण कुठेही दंगली घडू दिल्या नाहीत.  

खरे देशद्रोही कोण?

ठाकरे म्हणाले, चाळीस गद्दार जसे सुरतेला पळाले, तसेच सगळं त्यांच्या आवडत्या राज्यात जातेय, म्हणजे कुठे तर गुजरातला जातेय. आता तर वर्ल्ड कपची फायनल पण गुजरातला नेली. आता हीच फायनल मुंबईला झाली असती तर आपण नक्कीच जिंकलो असतो. मात्र फक्त स्वतःच्या प्रसिद्धी साठी हे सगळा खटाटोप सुरु आहे. वेदांता फॉक्सकॉन कंपनी आता गुजरात मध्ये ही होणार नाही. त्यांनी करार रद्द केला, कारण तिथे कंपनी उभारायला सात वर्षे लागणार होते, त्यामुळे त्यांनी देशातूनच हद्दपार व्हायचा निर्णय घेतला. म्हणजे गुजरातचे भले करण्याच्या नादात देशाचे नुकसान झाले. आता सांगा, मग खरे देशद्रोही कोण आहेत? असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

पेपरफुटी करणाऱ्यांना फाशी द्या..

ठाकरे म्हणाले, देशात फक्त महाराष्ट्रावर अन्याय केला जातोय. यासाठी नवे कलम आणले आहे. पण महाराष्ट्राने किती दिवस अन्याय सहन करायचा. आता तुम्ही पुन्हा या मिंदे सरकारला सत्तेत आणले तर ते आपले मंत्रालय ही गुजरातला पळवतील. तलाठी भरती घोटाळा पुढे आला. घोटाळा झाला ते झाला, २०० पैकी २१४ मार्क मिळाले. ज्याला एक खाते चालवता येत नाही त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवले, असा झालाय हा घोटाळा. आता पेपटफुटी करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देऊ, असा कायदा आणावा, असेही त्यांनी म्हटले.

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेRam Mandirराम मंदिरUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे