शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
4
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
5
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
6
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
7
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
8
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
9
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
10
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
11
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
12
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
13
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
14
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
15
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
16
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
17
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
18
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
19
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
20
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे पाणी दारात; नागरिकांचा जीव मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:13 IST

येथील मुंबई-पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या इंद्रायणी कॉलनीला मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे डोंगरउताराने येणारे पावसाचे पाणी कॉलनीतील

कामशेत : येथील मुंबई-पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या इंद्रायणी कॉलनीला मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे डोंगरउताराने येणारे पावसाचे पाणी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचत आहे. या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणती उपाययोजना नसल्याने हे पाणी अनेक घरांमध्ये शिरत आहे. तर काही घरांमध्ये झिरपत आहे. तसेच सांडपाण्याच्या समस्येने स्थानिक मेटाकुटीला आले आहेत.

मुंबई -पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या इंद्रायणी कॉलनीत सांडपाण्याची समस्या गंभीर असून, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य सोय नसल्याने गटारांमध्येच सांडपाणी तुंबून परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते. या सांडपाण्यावर डासांची पैदास वाढली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. येथील काही घरांमध्ये गटारीचे तुंबलेल्या सांडपाण्याचा झिरपा होऊन ते पाणी नागरिकांच्या घरात निघत आहे. त्यातच दर वर्षी पावसाळ्यात डोंगराचे वाहणारे पाणी मोठ्या प्रमाणात या भागात येत असून, या पाण्याला पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्याने त्याचा निचरा होत नाही व येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. दोन ते तीन फूट पाणी रस्त्यावर साचल्याने रस्ता बंद होतो. चारचाकी, दुचाकी वाहने पाण्यात अडकतात. परिसरातील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रकार तर दर वर्षी होतात. अनेकदा रात्री उशिरा घरात पाणी शिरून बिछाना भिजत आहे. तर अनेक वस्तूंचे नुकसान होत आहे. घरातील मौल्यवान सामानाची नासधूस होत असल्याने येथील लोक त्रस्त झाले आहेत. घरात आलेले पाणी बाहेर काढण्यासाठी रात्र जागवण्याची वेळ अनेकांवर येत असल्याचे राजू अगरवाल यांनी सांगितले. पवनानगर फाटा येथे होणाऱ्या उड्डाणपुलाच्या सांडपाण्याच्या गटारीत हे पाणी जाऊन या वर्षी तरी ही समस्या सुटेल, अशी सर्वांची आशा होती. प्रत्यक्षात पाण्याच्या निचºयासाठी ठोस उपाययोजना झाली नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस