शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पावसाचे पाणी दारात; नागरिकांचा जीव मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:13 IST

येथील मुंबई-पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या इंद्रायणी कॉलनीला मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे डोंगरउताराने येणारे पावसाचे पाणी कॉलनीतील

कामशेत : येथील मुंबई-पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या इंद्रायणी कॉलनीला मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे डोंगरउताराने येणारे पावसाचे पाणी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचत आहे. या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणती उपाययोजना नसल्याने हे पाणी अनेक घरांमध्ये शिरत आहे. तर काही घरांमध्ये झिरपत आहे. तसेच सांडपाण्याच्या समस्येने स्थानिक मेटाकुटीला आले आहेत.

मुंबई -पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या इंद्रायणी कॉलनीत सांडपाण्याची समस्या गंभीर असून, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य सोय नसल्याने गटारांमध्येच सांडपाणी तुंबून परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते. या सांडपाण्यावर डासांची पैदास वाढली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. येथील काही घरांमध्ये गटारीचे तुंबलेल्या सांडपाण्याचा झिरपा होऊन ते पाणी नागरिकांच्या घरात निघत आहे. त्यातच दर वर्षी पावसाळ्यात डोंगराचे वाहणारे पाणी मोठ्या प्रमाणात या भागात येत असून, या पाण्याला पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्याने त्याचा निचरा होत नाही व येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. दोन ते तीन फूट पाणी रस्त्यावर साचल्याने रस्ता बंद होतो. चारचाकी, दुचाकी वाहने पाण्यात अडकतात. परिसरातील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रकार तर दर वर्षी होतात. अनेकदा रात्री उशिरा घरात पाणी शिरून बिछाना भिजत आहे. तर अनेक वस्तूंचे नुकसान होत आहे. घरातील मौल्यवान सामानाची नासधूस होत असल्याने येथील लोक त्रस्त झाले आहेत. घरात आलेले पाणी बाहेर काढण्यासाठी रात्र जागवण्याची वेळ अनेकांवर येत असल्याचे राजू अगरवाल यांनी सांगितले. पवनानगर फाटा येथे होणाऱ्या उड्डाणपुलाच्या सांडपाण्याच्या गटारीत हे पाणी जाऊन या वर्षी तरी ही समस्या सुटेल, अशी सर्वांची आशा होती. प्रत्यक्षात पाण्याच्या निचºयासाठी ठोस उपाययोजना झाली नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस