शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पावसाचे पाणी दारात; नागरिकांचा जीव मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:13 IST

येथील मुंबई-पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या इंद्रायणी कॉलनीला मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे डोंगरउताराने येणारे पावसाचे पाणी कॉलनीतील

कामशेत : येथील मुंबई-पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या इंद्रायणी कॉलनीला मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे डोंगरउताराने येणारे पावसाचे पाणी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचत आहे. या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणती उपाययोजना नसल्याने हे पाणी अनेक घरांमध्ये शिरत आहे. तर काही घरांमध्ये झिरपत आहे. तसेच सांडपाण्याच्या समस्येने स्थानिक मेटाकुटीला आले आहेत.

मुंबई -पुणे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या इंद्रायणी कॉलनीत सांडपाण्याची समस्या गंभीर असून, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य सोय नसल्याने गटारांमध्येच सांडपाणी तुंबून परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते. या सांडपाण्यावर डासांची पैदास वाढली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. येथील काही घरांमध्ये गटारीचे तुंबलेल्या सांडपाण्याचा झिरपा होऊन ते पाणी नागरिकांच्या घरात निघत आहे. त्यातच दर वर्षी पावसाळ्यात डोंगराचे वाहणारे पाणी मोठ्या प्रमाणात या भागात येत असून, या पाण्याला पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्याने त्याचा निचरा होत नाही व येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. दोन ते तीन फूट पाणी रस्त्यावर साचल्याने रस्ता बंद होतो. चारचाकी, दुचाकी वाहने पाण्यात अडकतात. परिसरातील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रकार तर दर वर्षी होतात. अनेकदा रात्री उशिरा घरात पाणी शिरून बिछाना भिजत आहे. तर अनेक वस्तूंचे नुकसान होत आहे. घरातील मौल्यवान सामानाची नासधूस होत असल्याने येथील लोक त्रस्त झाले आहेत. घरात आलेले पाणी बाहेर काढण्यासाठी रात्र जागवण्याची वेळ अनेकांवर येत असल्याचे राजू अगरवाल यांनी सांगितले. पवनानगर फाटा येथे होणाऱ्या उड्डाणपुलाच्या सांडपाण्याच्या गटारीत हे पाणी जाऊन या वर्षी तरी ही समस्या सुटेल, अशी सर्वांची आशा होती. प्रत्यक्षात पाण्याच्या निचºयासाठी ठोस उपाययोजना झाली नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस