शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

पराभवाच्या भीतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी गल्लीबोळात रोड शो करतायत- उद्धव ठाकरे

By विश्वास मोरे | Published: May 09, 2024 8:41 AM

महाराष्ट्र हा मर्दांचा प्रांत आहे. महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल, असे इशारा शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगवी येथे बुधवारी दिला...

पिंपरी : आपल्याकडे साधारणपणे भुताची भीती असते, भाजपाला पराभवाच्या भुताची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे पंतप्रधान गल्लीबोळात रोड शो करत आहेत. जनतेने आणले का नाही रस्त्यावर? शिवसेनेची भडकलेली मशाल हुकूमशाही मोदी सरकारचे आसन जाळून भस्मसात करेल. महाराष्ट्र हा मर्दांचा प्रांत आहे. महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल, असे इशारा शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगवी येथे बुधवारी दिला.

सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी खासदार संजय सिंह, सुप्रिया सुळे, शिवसेनेचे संघटक सचिन अहिर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार,  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम,  शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले आदी उपस्थित होते.

हे  गजनी सरकार आहे! 

उद्धव ठाकरे यांनी तीस मिनिटांच्या भाषणामध्ये केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले, 'भाजपसमोर या निवडणुकीत कोणतेच मुद्दे नाहीत. सन २०१४, २०१९ नंतर आता कोणतेच मुद्दे नाहीत. म्हणून हिंदू मुस्लिम केले जात आहे. मोदींचे करायचे काय? आता हे लोकच म्हणताहेत तडीपार! मी नाही. तुम्ही दहा वर्षात कमावले काय?  एके दिवशी पंतप्रधानांनी मध्यरात्रीपासून नोटबंदी केली. आता चार जूननंतर इंडिया आघाडी सत्तेत येईल आणि महाराष्ट्र मोदी नावाच्या नाण्याची बंदी करेल. नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग होता, असे सर्वोच्च न्यायालयातील एका माजी न्यायाधीशांनी सांगितले आहे. खरे तर हे  गजनी सरकार आहे. कारण प्रत्येक वेळी वेगळे बोलतात. त्यांच्या आश्वासनाचे काय झालं, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. 

आता आम्हीही वाघनखे काढू शकतो-

अग्निविरांच्या माध्यमातून जवानांच्या भविष्यांशी खेळण्याचे धोरण तुम्ही केले. कंत्राटीकरण केले जात आहे. जवानांना सेवा करण्यासाठी पाच वर्षाची मुदत आणि तुम्ही पाचवर्षानंतर मुदतवाढ मागत आहात. ही जनता तुम्हाला चार जूननंतर कंत्राट मुक्त करेल. तुम्ही महाराष्ट्राला दहा वर्षात दिले काय? आमच्या पाठीवर वार केला. महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या शिवसेना मोडीत काढण्याचे काम केलं. आम्ही तुम्हाला साथ दिली, त्याची भरपाई अशी करता. आम्ही तुम्हाला आलिंगन दिले आणि तुम्ही पाठीवर वार केला. आता आम्हीही वाघनखे काढू शकतो आणि ही वाघनखे पुढे बसले आहेत. 

राम कृष्ण हरी,  पाठवा यांना घरी!

ठाकरे म्हणाले, संत तुकाराम महाराजांच्या कालखंडामध्ये मुंबाजी होते. त्यांनी गाथा बुडवली. आता गोमूत्रधारी मानसिकतेची लोक घटना बदलायला निघाले आहेत. राम कृष्ण हरी, पाठवा यांना घरी, पेटवा मशाली, जय भवानी जय शिवाजी. जय भवानीवरून यांच्यात पोटात गोळा आला आहे. मुबंईत गुजरातची कंपनी मुंबईमध्ये मराठी माणसांना प्रवेश नाही, अशी जाहिरात देते. ही कसली मानसिकता. आम्ही गुजराती बांधवांच्या विरोधात नाही, पण अशा मानसिकतेच्या विरोधात मराठी माणूस पेटून उठेल, शटर बंद केल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला जे शिवसेना नकली आहे असे म्हणतात, आम्ही त्यांना बेअकली आहे, असं म्हणतो निवडणूक आयोग हा घरगडी आहे. त्यांनी मिंधे चोरांच्या हाती धनुष्य दिला. त्याबद्दल माळ एक बातमी आली. त्यात मोदी आणि  शहा यांचे आभार मानतो, असे मिंधेनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यांनी तर धनुष्यबाण पळवल्याची कबुली दिली. आता आम्ही जनतेच्या न्यायालयात आलो आहोत, जनतेला गद्दारी मान्य नाही. शिवसेना हे नाव आम्ही कधीही बदलू देणार नाही.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmaval-pcमावळ