शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

उत्पादन घटूनही भाताचा भाव कमीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 01:18 IST

तालुक्यात या वर्षी सरासरी भात उत्पादन २३.५० क्विंटल आहे. तर मागील वर्षी सरासरी ३३.५० क्विंटल उत्पादन झाले

कामशेत : या वर्षी तालुक्यात सुमारे १२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली होती. पण सप्टेंबर महिन्यात दाणे भरण्याच्या काळात पावसाने खंड दिल्याने भात पिकाच्या उत्पादनात २० ते २५ टक्क्यांनी घट आली आहे. यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले होते. उत्पादन घट आल्याने या वर्षी शेतकºयांना भाताचा बाजार वाढण्याची अपेक्षा होती. मात्र या वर्षी अजूनही भाताचे दर स्थिर आहेत. त्यामुळे भात उत्पादक शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

तालुक्यात या वर्षी सरासरी भात उत्पादन २३.५० क्विंटल आहे. तर मागील वर्षी सरासरी ३३.५० क्विंटल उत्पादन झाले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. मागील वर्षी इंद्रायणी भातास २१०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल असा दर होता. तर या वर्षी २२०० ते २४०० प्रति क्विंटल इतका दर आहे. तसेच कोळंब जातीच्या भातास १७०० ते १८०० रुपये प्रति क्विंटलचा भाव होता. तर तो मागील वर्षी प्रमाणेच स्थिर आहे आणि आंबेमोहर भाताचा दरदेखील मागील वर्षीप्रमाणेच या वर्षी २५ ते ३० रुपये प्रति क्विंटल असा स्थिर आहे. या वर्षी उत्पादनात घट झाली असूनदेखील भाव स्थिर असल्याने शेतकºयांमध्ये व्यापाºयांच्या विषयी संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाची भात पिकास १७५० ते १७९० प्रति क्विंटल इतकी आधारभूत किंमत असल्याने व्यापाºयांना दरासंदर्भात शेतकºयांना काही बोलता येत नसल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, भात पिकाची प्रतवारी कशी करावी व त्याची गुणवत्ता कशी तपासली जावी या विषयी शासनाने व्यापाºयांना कोणत्याही प्रकारचे नियम व अटी लावत नसल्याने व्यापारी म्हणेल तीच गुणवत्ता शेतकºयांना मान्य करून आपले धान्य विकावे लागत असल्याची परिस्थिती सध्या तालुक्यात आहे. यामुळे भात पिकाचा दर्जा व गुणवत्ता ठरविण्याची एक नियामक पद्धत शासनाने अवलंबण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.1मावळात सरासरी ४ लाख २८ हजार ८०० क्विंटल इतके भाताचे उत्पादन होत असते. मावळात उत्पादित होणाºया भातास पुणे जिल्ह्यातील लोकांकडून प्रचंड मागणी आहे. त्यात इंद्रायणी तांदूळ लांबीला लहान असल्याने इतरत्र त्यास मागणी कमी आहे. तरीही मावळातील इंद्रायणी तांदूळ खूप प्रसिद्ध आहे.या वर्षी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यांत पाऊस कमी प्रमाणात पडल्याने भात पिकाच्या उत्पादनात घट झालेली आहे. यामुळे भाताचे दर वाढणे अपेक्षित होते. मात्र शेतकºयांची भात विकण्याची घाई यामुळे त्यांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याचाच फायदा तांदूळ व्यापारी व दलाल यांनी घेतला असल्याचे काही भात उत्पादक शेतकरी सांगत आहेत.मावळ तालुक्यातील भातपीक हे शेतकºयाचे प्रमुख पीक आहे. या पिकाची विक्री केल्यानंतरच हंगामी पिके घेण्यासाठी शेतकरी भांडवलाची निर्मिती करीत असतात. यामुळेच शेतकºयांना धान्य विकण्याची घाई असते. यावर्षी भात उत्पादन ७५ टक्के आहे. शिवाय पिकाचा दर्जाही उत्तम आहे. त्यामुळे भाताला मागणीही खूप आहे. तरीही भाताचे भाव स्थिर असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.सप्टेंबर महिन्यात पावसाने खंड दिल्याने भात उत्पादनात २० ते २५ टक्क्यांपर्यंत घट आल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र पाणी उपलब्ध असणाºया भात उत्पादक शेतक ºयाचे भात उत्पादन उत्तम झाले आहे. काही शेतकºयांनी वेगळे प्रयोग केल्याने त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.- देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFarmerशेतकरी