शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेताच फ्लॅटचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 17:28 IST

चिखलीतील ऐश्वर्यम हमारा येथे करसंकलन, मलनिस्सारण, उद्यानविषयक नियमांचे उल्लंघन

ठळक मुद्देमहापालिकेने साडेचार लाखांचा दंड ठोठावला

पिंपरी : गृहनिर्माण प्रकल्प उभारणीचे नियम आणि निकष यास फाटा देण्याचे काम चिखलीतील ऐश्वर्यम हमारा या प्रकल्पात झाले असूून बांधकाम परवानगी न घेताच नागरिकांना ताबा दिला आहे. त्यामुळे महापालिकेने साडेचार लाखांचा दंड ठोठावला आहे. येथील नागरिकांच्या मतानुसार सोसायटीत ८०  टक्के नागरिक रहायला आले असताना महापालिका प्रशासनाच्या वतीने आकारलेल्या दंडावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिका क्षेत्रात गृहनिर्माण प्रकल्प उभारणीचे नियम असतात. चिखलीतील ऐश्वर्यम हमारा या प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्प एक आणि प्रकल्प दोन असे विभाग आहेत. म्हाडासाठीची इमारत पूर्ण होऊन त्याचे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला आहे. मात्र, इतर ठिकाणी नियमांची पूर्तता केलेली नाही. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाचा दाखला घेण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्याव्या लागतात. मात्र, पाणीपुरवठा, उद्यान, भोगवटा धारक हस्तांतरण प्रमाणपत्र, ड्रेनेज प्रमाणपत्र नसल्याने या प्रकल्पास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. त्यामुळे पूर्णत्वाचा दाखला मिळू शकलेला नाही. पूर्णत्वाचा दाखला न घेता घरांचा ताबा दिल्यास आणि तेथे अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मोशीतील ऐश्वर्यंम या बांधकाम प्रकल्पाची बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेताच नागरिकांना घरांचे वाटप केले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनात अस्वस्थतेची भावना आहे. तसेच पूर्णत्वाचा दाखला घेण्यासाठी पाणी, वीज, जलनिस्सारण, आरोग्य, अग्निशमन दलाची एनओसी घेणे अपेक्षित असते. मात्र, या प्रकल्पासाठी अजूनही काही एनओसी घेतल्या नसल्याचे दिसून येत आहे.

बांधकाम परवानगी विभागाने साडेचार लाखांचा दंड ठोठावला 

पाणीपुरवठा, नगररचना, अग्निशमन, मलनिस्सारण, उद्यान आदी विभागाच्या परवानग्या घेणे अपेक्षीत असते. त्यामुळे या प्रकल्पातील काही भागात परवानगी न घेताच सदनिका ताब्यात दिल्या आहेत. त्यामुळे पूर्णत्वाचा दाखला घेताना विविध विभागांचा दंड बांधकामव्यावसायिकांस भरावा लागणार आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी विभागाने साडेचार लाखांचा दंड मारला आहे.

अपघात झाल्यास जबाबदार कोण?

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेताच सदनिकाधारकांना घरे ताब्यात देणे चुकीचे आहे. कारण पूर्णत्वाचा दाखला नसेल तर अपघात झाला. जीवितहानी  झाली तर कोणत्याही प्रकारचा विमा संरक्षण मिळत नाही. त्यामुळे येथे अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकbusinessव्यवसाय