शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; ३२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
3
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
4
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
5
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
6
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
7
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
8
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
9
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
10
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
11
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
13
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
14
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
15
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
16
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
17
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
18
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
19
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
20
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेताच फ्लॅटचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 17:28 IST

चिखलीतील ऐश्वर्यम हमारा येथे करसंकलन, मलनिस्सारण, उद्यानविषयक नियमांचे उल्लंघन

ठळक मुद्देमहापालिकेने साडेचार लाखांचा दंड ठोठावला

पिंपरी : गृहनिर्माण प्रकल्प उभारणीचे नियम आणि निकष यास फाटा देण्याचे काम चिखलीतील ऐश्वर्यम हमारा या प्रकल्पात झाले असूून बांधकाम परवानगी न घेताच नागरिकांना ताबा दिला आहे. त्यामुळे महापालिकेने साडेचार लाखांचा दंड ठोठावला आहे. येथील नागरिकांच्या मतानुसार सोसायटीत ८०  टक्के नागरिक रहायला आले असताना महापालिका प्रशासनाच्या वतीने आकारलेल्या दंडावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिका क्षेत्रात गृहनिर्माण प्रकल्प उभारणीचे नियम असतात. चिखलीतील ऐश्वर्यम हमारा या प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्प एक आणि प्रकल्प दोन असे विभाग आहेत. म्हाडासाठीची इमारत पूर्ण होऊन त्याचे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला आहे. मात्र, इतर ठिकाणी नियमांची पूर्तता केलेली नाही. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाचा दाखला घेण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्याव्या लागतात. मात्र, पाणीपुरवठा, उद्यान, भोगवटा धारक हस्तांतरण प्रमाणपत्र, ड्रेनेज प्रमाणपत्र नसल्याने या प्रकल्पास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. त्यामुळे पूर्णत्वाचा दाखला मिळू शकलेला नाही. पूर्णत्वाचा दाखला न घेता घरांचा ताबा दिल्यास आणि तेथे अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मोशीतील ऐश्वर्यंम या बांधकाम प्रकल्पाची बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेताच नागरिकांना घरांचे वाटप केले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनात अस्वस्थतेची भावना आहे. तसेच पूर्णत्वाचा दाखला घेण्यासाठी पाणी, वीज, जलनिस्सारण, आरोग्य, अग्निशमन दलाची एनओसी घेणे अपेक्षित असते. मात्र, या प्रकल्पासाठी अजूनही काही एनओसी घेतल्या नसल्याचे दिसून येत आहे.

बांधकाम परवानगी विभागाने साडेचार लाखांचा दंड ठोठावला 

पाणीपुरवठा, नगररचना, अग्निशमन, मलनिस्सारण, उद्यान आदी विभागाच्या परवानग्या घेणे अपेक्षीत असते. त्यामुळे या प्रकल्पातील काही भागात परवानगी न घेताच सदनिका ताब्यात दिल्या आहेत. त्यामुळे पूर्णत्वाचा दाखला घेताना विविध विभागांचा दंड बांधकामव्यावसायिकांस भरावा लागणार आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी विभागाने साडेचार लाखांचा दंड मारला आहे.

अपघात झाल्यास जबाबदार कोण?

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेताच सदनिकाधारकांना घरे ताब्यात देणे चुकीचे आहे. कारण पूर्णत्वाचा दाखला नसेल तर अपघात झाला. जीवितहानी  झाली तर कोणत्याही प्रकारचा विमा संरक्षण मिळत नाही. त्यामुळे येथे अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकbusinessव्यवसाय