शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

‘पवना जलवाहिनी’वरून भाजपात राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:26 AM

शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पवना बंद पाईप लाईन प्रकल्प सुरू केला होता. परंतु भाजपाने हा प्रकल्प राजकारण करून बंद पाडला.

पिंपरी - शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पवना बंद पाईप लाईन प्रकल्प सुरू केला होता. परंतु भाजपाने हा प्रकल्प राजकारण करून बंद पाडला. भाजपाचे सरकार आल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन शहरातील नागरिकांना दिले होते. या प्रकल्पाबाबत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी भूमिका स्पष्ट करावी. राजकारण करून जनतेच्या भावनांशी खेळून दिशाभूल करू नये, अशी टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली.पवना जलवाहिनीवरून भाजपात दोन गट पडले आहेत. मावळात जलवाहिनी होऊ देणार नाही, अशी भूमिका बाळा भेगडे यांनी घेतली आहे. चर्चा करून पाणी आणू, अशी भूमिका पिंपरीतील भाजपा नेत्यांनी घेतली आहे. यावर राष्टÑवादीने टीका केली आहे. साने म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीने तीस वर्षांचे व्हीजन ठेवले होते. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर विकास प्रकल्पांना खिळ बसली. भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण होऊनही आजही हे प्रकल्प जैसे थे आहेत.लोकप्रतिनिधींमध्ये नाही समन्वयभाजपाकडे विकासाचे व्हीजन नाही, प्रकल्पांमध्ये मलिदा खाण्यावर यांचा डोळा आहे. कोणत्याच प्रकल्पावरती दोन्ही आमदारांचे एकमत होत नाही. पालकमंत्र्यांची वेगळीच भूमिका असते. तर मावळातील आमदार बाळा भेगडे यांची या प्रकल्पासाठीची भूमिका स्पष्ट आहे. शहरातील भाजपाची एक भूमिका व मावळातील भाजपाची दुसरी भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे तिन्ही आमदारांनी व पालकमंत्र्यांनी आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी. तिन्ही आमदारांनी व पालकमंत्र्यांनी समन्वय ठेवावा़ पवना जलवाहिनी पूर्ण होणार की नाही हे स्पष्ट करावे, असे दत्ता साने म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाPoliticsराजकारण