शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

‘पवना जलवाहिनी’वरून भाजपात राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:26 IST

शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पवना बंद पाईप लाईन प्रकल्प सुरू केला होता. परंतु भाजपाने हा प्रकल्प राजकारण करून बंद पाडला.

पिंपरी - शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पवना बंद पाईप लाईन प्रकल्प सुरू केला होता. परंतु भाजपाने हा प्रकल्प राजकारण करून बंद पाडला. भाजपाचे सरकार आल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन शहरातील नागरिकांना दिले होते. या प्रकल्पाबाबत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी भूमिका स्पष्ट करावी. राजकारण करून जनतेच्या भावनांशी खेळून दिशाभूल करू नये, अशी टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली.पवना जलवाहिनीवरून भाजपात दोन गट पडले आहेत. मावळात जलवाहिनी होऊ देणार नाही, अशी भूमिका बाळा भेगडे यांनी घेतली आहे. चर्चा करून पाणी आणू, अशी भूमिका पिंपरीतील भाजपा नेत्यांनी घेतली आहे. यावर राष्टÑवादीने टीका केली आहे. साने म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीने तीस वर्षांचे व्हीजन ठेवले होते. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर विकास प्रकल्पांना खिळ बसली. भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण होऊनही आजही हे प्रकल्प जैसे थे आहेत.लोकप्रतिनिधींमध्ये नाही समन्वयभाजपाकडे विकासाचे व्हीजन नाही, प्रकल्पांमध्ये मलिदा खाण्यावर यांचा डोळा आहे. कोणत्याच प्रकल्पावरती दोन्ही आमदारांचे एकमत होत नाही. पालकमंत्र्यांची वेगळीच भूमिका असते. तर मावळातील आमदार बाळा भेगडे यांची या प्रकल्पासाठीची भूमिका स्पष्ट आहे. शहरातील भाजपाची एक भूमिका व मावळातील भाजपाची दुसरी भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे तिन्ही आमदारांनी व पालकमंत्र्यांनी आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी. तिन्ही आमदारांनी व पालकमंत्र्यांनी समन्वय ठेवावा़ पवना जलवाहिनी पूर्ण होणार की नाही हे स्पष्ट करावे, असे दत्ता साने म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाPoliticsराजकारण