शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा रोडरोमिओंना दणका, पोलिसी हिसका दाखवून हुल्लडबाजांना रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 02:19 IST

पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच नव्याने नियुक्तीवर आलेले पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी १५ रोडरोमिओंना ताब्यात घेऊन त्याचे पालकांना पोलीस ठाण्यावर बोलावून रोडरोमिओंना पोलिसी हिसका दाखवून कारवाई केल्याने हुल्लडबाजी कारणाऱ्यांना चांगलीच जरब बसली आहे.

तळेगाव स्टेशन - पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच नव्याने नियुक्तीवर आलेले पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी १५ रोडरोमिओंना ताब्यात घेऊन त्याचे पालकांना पोलीस ठाण्यावर बोलावून रोडरोमिओंना पोलिसी हिसका दाखवून कारवाई केल्याने हुल्लडबाजी कारणाऱ्यांना चांगलीच जरब बसली आहे.तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी आपल्या सहका-याबरोबर तळेगाव स्टेशन परिसरातील इंद्रायणी महाविद्यालय परिसर आणि राव कॉलनीतील गार्डन परिसरातील रोडरोमिओंना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यावर नेले. तसेच त्यांचे पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून कारवाई केली. या वेळी पालकांनी फारच गयावया केल्याने अखेर या रोडरोमिओंना समाज देऊन सोडून दिले.तळेगाव शहरातील शाळा, महाविद्यालये, क्लासेस, बागबगीचे आदी ठिकाणी अकारण हुल्लडबाजी कारणºया रोडरोमिओंवर कारवाई करण्याची धडक मोहीम तळेगावचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी हाती घेतली आहे. त्यात इंद्रायणी कॉलेज, परिसरातील आणि राव कॉलनी गार्डन जवळ पोलिसांनी अचानक छापे टाकून कारवाई केल्याने रोडरोमिओंची पळापळ झाली आहे.शहरात अल्पवयीन मुले-मुली बेफाम वाहने चालवीत असतात अशा मुला-मुलींवर तसेच त्यांचे पालकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक गिरीगोसावी यांनी सांगितले. याशिवाय विना परवाना गाडी चालविणे, टीबलसिट वाहन चालविणे यावरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक गिरीगोसावी यांनी सांगितले. या रोडरोमिओंवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी याचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे, सोनावणे, पोलीस नाईक महेश दौडकर, नितीन गार्डी, युवराज वाघमारे, प्रकाश वाबळे, सागर नामदार आदी सहभागी झाले होते.दरम्यान, या भाईगिरीच्या जाळ्यात जास्त प्रमाण अल्पवयीन मुलांचा असल्याचे दिसून येत आहे . शाळा ,महाविद्यालय परिसरात अशी भाईगिरी उदयास येत आहे . मिसरूड न फुटलेल्या अल्पवयीन मुलांमध्ये भाईगिरीची क्रेज मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागली आहे. या क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या फोडण्याचा नवीन फंडा या गुन्हेगारी विश्वात येऊ लागला आहे. अशा तोडफोड प्रकरणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग हि विशेष बाब आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांबाबत सजग राहण्याची गरज आहे, असे मत परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.मावळ तालुक्यात जमिनींना मोठा भाव आल्याने मुलांमध्ये वाढदिवस साजरे करण्याची क्रेझ वाढली आहे. त्यासाठी वारेमाप प्रमाण पैसा खर्च होत आहे. त्यामुळे गुन्हेगारीचेप्रमाणही वाढत चालले आहे. अनेकवेळा महाविद्यालयाच्या परिसरात लहान मोठी भांडणे होत आहेत. त्यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत आहे. वाढत्या गुन्हेगारीबाबत शहरवासीयांतून नाराजी व्यक्त होत आहे.१सध्या सोशल मीडियाचे जग झाले असून तरुणाई या जगात प्रमाणावर गुरफटली आहे . त्यातून वाढलेल्या स्पर्धा जीवघेण्या ठरत असल्याची अनेक उदाहरणे आहेत . फेसबुकचा गैरवापर वाढत्या गुन्हेगारीचे मूळ आहे. अलीकडच्या काळात आऊट डोअर फोटोग्राफीचा नवा ट्रेंड बाजारात सुरु झाला आहे. गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकण्याआधी फेसबुकवर दहशत निर्माण करण्यासाठी असे एडिट केलेले फोटो वापरले जातात.२ हातात कोयता, तलवार, बनावट पिस्तूल घेऊन फोटो काढले जातात. विलन लूक येण्यासाठीचा मेकअप देखील जातो व अशा फोटो फोटोखाली समाजात दहशत पसरेल अशी फिल्मी डायलॉग टाईप करून बिनधास्त अपलोड केले जातात. मग सुरु होतो लाईक, कमेंटचा खेळ. ज्याला जितक्या लाईक अन कमेंट तितकी त्याची दहशत असा सरळ तर्क काढला जातो. यातूनच फेसबुकवर ग्रुप तयार होतात. अन् त्यांच्यातील वैर वाढत जाते. अशा फेसबुक गुंडाना वेळीच आवर घातल्यास भविष्यात होणाºया गुन्हेगारी कारवायांना आवर घालणे शक्य आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्याPoliceपोलिस