शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रावेतला लग्नातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 16:27 IST

रावेत येथील एका लग्न समारंभात जेवण केल्यानंतर सुमारे चौदा जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार रविवारी घडला आहे. संबंधितांना उलट्याचा त्रास झाल्याने देहूरोड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविषबाधा झालेल्यांत चार महिला व तीन बालकांचा समावेशएका महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर

किवळे : रावेत येथील एका लग्न समारंभात जेवण केल्यानंतर सुमारे चौदा जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार रविवारी घडला आहे. संबंधितांना उलट्याचा त्रास झाल्याने देहूरोड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्यांत चार महिला व तीन बालकांचा समावेश आहे. यातील एका महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून इतरांची प्रकृती स्थिर आहे. रावेत येथील एका खासगी मंगल कार्यालयात रविवारी विवाह समारंभ होता. या सोहळ्यात दुपारी शेवटची पंगत झाली. या पंगतीत जेवण केलेल्या सुमारे चौदा जणांना डोकेदुखी, मळमळ, उलट्या-जुलाब आदी त्रास होऊ लागल्याने सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना देहूरोड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चौघांना उपारानंतर सोडून देण्यात आले. तर इतरांना दाखल करुन उपचार करण्यात येत आहेत. एका महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशीरापर्यंत रूग्ण दाखल होणे सुरूच होते.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाdehuroadदेहूरोडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड