शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

पीएमपी बसमधून पुन्हा आॅईलगळती; दुचाकी घसरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:41 IST

अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी दाखविली समयसूचकता; प्रशासनाचे दुर्लक्ष

वाकड : सलग दुसऱ्या आठवड्यातही थेरगावातील डांगे चौक रस्त्यावर पीएमपी बसमधून आॅईलगळती झाल्याने निसरडा झालेला रस्ता एका सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी समयसूचकता दाखवीत अग्निशामक दलाच्या साह्याने स्वच्छ करून घेतल्याने येथील अनेक अपघात टळले. रस्त्यावर आॅईल सांडण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. पीएमपीच्या बसमधून आॅईलगळती होत आहे. त्यामुळे सुस्थिीतील पीएमपी बस या मार्गावर सोडण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.डांगे चौक बस थांबा ते चिंचवडगावदरम्यान पीएमपी बसमधून मोठ्या प्रमाणात आॅईलगळती झाली. आॅईल पसरून रस्ता निसरडा झाल्याने त्यावर घसरून अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. ही बाब थेरगाव सोशल फाउंडेशन (टीएसफ) सदस्य हेल्परायडर यांना समजताच त्यांनी अग्निशामक दलाला कळवून तातडीने घटनास्थळी २ वाहने बोलवून घेतले. तत्पूर्वी उपाययोजना वखबरदारी म्हणून फाउंडेशनचे सदस्य, बसचालक व वाहक यांच्या मदतीने बस बाजूला घेऊन सांडलेल्या आॅईलवर तत्परतेने माती टाकण्यात आली. वाहतूक दुसºया बाजूने वळवून होणारे अपघात रोखण्यात आले व त्यानंतर तो रस्ता पूर्णपणे स्वच्छ करून घेत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. नीलेश पिंगळे, शंतनू तेलंग, यश कुदळे, अनिल घोडेकर, सुशांत पांडे, पिंटू ननावरे, महेश येळवंडे, युवराज पाटील यांनी परिश्रम घेतले. या सहकार्याबद्दल वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.पीएमपीच्या जुन्या बसमुळे वाढले अपघातपीएमपीच्या ताफ्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहेत. अशा बस भर रस्त्यात बंद पडतात. त्याचा प्रवाशांना नाहक त्रास होतो. भर रस्त्यातील अशा बंद बसमुळे अपघाताचा धोकाही असतो. पीएमपी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. जुन्या बस सोडण्यात येऊ नयेत, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत आहे. मात्र असे असतानाही पीएमपी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढजुन्या पीएमपी बसमुळे शहरातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या बसमधून विषारी धूर सोडण्यात येतो. त्यामुळे वायू प्रदूषण होत आहे. तसेच यातील काही बसच्या इंजिनचा मोठ्या प्रमाणात आवाज येतो. त्यामुळे या बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांना आवाजाचाही त्रास सहन करावा लागतो. आवाजामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत आहे. त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे.पिंपरी-चिंचवडकरांना सापत्न वागणूकपिंपरी-चिंचवडकरांना पीएमपी प्रशासनाकडून सातत्याने सापत्न वागणूक देण्यात येत आहे. शहरातील अनेक मार्गांवर नवीन बसच्या फेºयांची मागणी असतानाही जुनाट आणि नादुरुस्त बस सोडण्यात येतात. काही ठरावीक मार्गांवर वर्षानुवर्षे अशा बस सोडण्यात येतात. त्यामुळे या मार्गांवरील प्रवाशांना सातत्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे.सर्व्हिस व्हॅन येते उशिरानेबस बंद पडल्यानंतर नजिकच्या आगारातून सर्व्हिस व्हॅन ताबडतोब येणे अपेक्षित असते. मात्र त्यातही दिरंगाई केली जाते. बहुतांश वेळा बस दोन दिवस बंद अवस्थेत भर रस्त्यात असते. तरीही त्याबाबत उदासीनता दाखविण्यात येते. यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे. मात्र प्रशासन त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. अशावेळी संबंधित बसचे चालक आणि वाहक यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो.बस आहेत की, बॉम्ब?पीएमपीच्या बसमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अनेक अपघातांचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या बस धावत असतानाच अचानक पेट घेतात. डिझेल तसेच सीएनजी बसचाही यात समावेश आहे. शॉर्टसर्किट होऊन किंवा अन्य कारणाने बसने पेट घेतल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पीएमपीच्या या बस आहेत की बॉम्ब, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.पर्यायी व्यवस्था करण्यातही दिरंगाईपीएमपी बस रस्त्यात बंद पडल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात येत नाही. त्यामुळे अशा बसमधील प्रवाशांना भर रस्त्यात ताटकळावे लागते. बहुतांशवेळा प्रवाशांना खासगी वाहनाने किंवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. अशावेळी या प्रवाशांना बसभाड्यासह रिक्षाचेही भाडे अदा करावे लागते. मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.कारभार सुधारण्यात उदासीनतापीएमपीचा कारभार सुधारण्याबाबत संबंधित प्रशासनाच्या आणि यंत्रणेच्या सर्वच पातळ्यांवर उदासीनता दिसून येते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच शासनाने निधी उपलब्ध करून देऊन आणि नवीन बस दाखल होऊनही जुन्या बसचा वापर करण्यात येत आहे. बसच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या उदासीनतेमुळेच पीएमपी खिळखिळी झाली आहे, असे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड