शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पीएमपी बसमधून पुन्हा आॅईलगळती; दुचाकी घसरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:41 IST

अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी दाखविली समयसूचकता; प्रशासनाचे दुर्लक्ष

वाकड : सलग दुसऱ्या आठवड्यातही थेरगावातील डांगे चौक रस्त्यावर पीएमपी बसमधून आॅईलगळती झाल्याने निसरडा झालेला रस्ता एका सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी समयसूचकता दाखवीत अग्निशामक दलाच्या साह्याने स्वच्छ करून घेतल्याने येथील अनेक अपघात टळले. रस्त्यावर आॅईल सांडण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. पीएमपीच्या बसमधून आॅईलगळती होत आहे. त्यामुळे सुस्थिीतील पीएमपी बस या मार्गावर सोडण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.डांगे चौक बस थांबा ते चिंचवडगावदरम्यान पीएमपी बसमधून मोठ्या प्रमाणात आॅईलगळती झाली. आॅईल पसरून रस्ता निसरडा झाल्याने त्यावर घसरून अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. ही बाब थेरगाव सोशल फाउंडेशन (टीएसफ) सदस्य हेल्परायडर यांना समजताच त्यांनी अग्निशामक दलाला कळवून तातडीने घटनास्थळी २ वाहने बोलवून घेतले. तत्पूर्वी उपाययोजना वखबरदारी म्हणून फाउंडेशनचे सदस्य, बसचालक व वाहक यांच्या मदतीने बस बाजूला घेऊन सांडलेल्या आॅईलवर तत्परतेने माती टाकण्यात आली. वाहतूक दुसºया बाजूने वळवून होणारे अपघात रोखण्यात आले व त्यानंतर तो रस्ता पूर्णपणे स्वच्छ करून घेत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. नीलेश पिंगळे, शंतनू तेलंग, यश कुदळे, अनिल घोडेकर, सुशांत पांडे, पिंटू ननावरे, महेश येळवंडे, युवराज पाटील यांनी परिश्रम घेतले. या सहकार्याबद्दल वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.पीएमपीच्या जुन्या बसमुळे वाढले अपघातपीएमपीच्या ताफ्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहेत. अशा बस भर रस्त्यात बंद पडतात. त्याचा प्रवाशांना नाहक त्रास होतो. भर रस्त्यातील अशा बंद बसमुळे अपघाताचा धोकाही असतो. पीएमपी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. जुन्या बस सोडण्यात येऊ नयेत, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत आहे. मात्र असे असतानाही पीएमपी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढजुन्या पीएमपी बसमुळे शहरातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या बसमधून विषारी धूर सोडण्यात येतो. त्यामुळे वायू प्रदूषण होत आहे. तसेच यातील काही बसच्या इंजिनचा मोठ्या प्रमाणात आवाज येतो. त्यामुळे या बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांना आवाजाचाही त्रास सहन करावा लागतो. आवाजामुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत आहे. त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे.पिंपरी-चिंचवडकरांना सापत्न वागणूकपिंपरी-चिंचवडकरांना पीएमपी प्रशासनाकडून सातत्याने सापत्न वागणूक देण्यात येत आहे. शहरातील अनेक मार्गांवर नवीन बसच्या फेºयांची मागणी असतानाही जुनाट आणि नादुरुस्त बस सोडण्यात येतात. काही ठरावीक मार्गांवर वर्षानुवर्षे अशा बस सोडण्यात येतात. त्यामुळे या मार्गांवरील प्रवाशांना सातत्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे.सर्व्हिस व्हॅन येते उशिरानेबस बंद पडल्यानंतर नजिकच्या आगारातून सर्व्हिस व्हॅन ताबडतोब येणे अपेक्षित असते. मात्र त्यातही दिरंगाई केली जाते. बहुतांश वेळा बस दोन दिवस बंद अवस्थेत भर रस्त्यात असते. तरीही त्याबाबत उदासीनता दाखविण्यात येते. यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे. मात्र प्रशासन त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. अशावेळी संबंधित बसचे चालक आणि वाहक यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो.बस आहेत की, बॉम्ब?पीएमपीच्या बसमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अनेक अपघातांचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या बस धावत असतानाच अचानक पेट घेतात. डिझेल तसेच सीएनजी बसचाही यात समावेश आहे. शॉर्टसर्किट होऊन किंवा अन्य कारणाने बसने पेट घेतल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पीएमपीच्या या बस आहेत की बॉम्ब, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.पर्यायी व्यवस्था करण्यातही दिरंगाईपीएमपी बस रस्त्यात बंद पडल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात येत नाही. त्यामुळे अशा बसमधील प्रवाशांना भर रस्त्यात ताटकळावे लागते. बहुतांशवेळा प्रवाशांना खासगी वाहनाने किंवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. अशावेळी या प्रवाशांना बसभाड्यासह रिक्षाचेही भाडे अदा करावे लागते. मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.कारभार सुधारण्यात उदासीनतापीएमपीचा कारभार सुधारण्याबाबत संबंधित प्रशासनाच्या आणि यंत्रणेच्या सर्वच पातळ्यांवर उदासीनता दिसून येते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच शासनाने निधी उपलब्ध करून देऊन आणि नवीन बस दाखल होऊनही जुन्या बसचा वापर करण्यात येत आहे. बसच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या उदासीनतेमुळेच पीएमपी खिळखिळी झाली आहे, असे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड