शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

पिंपरी : रुग्णवाहिकेला मिळेना रस्ता; अपूर्ण बीआरटी, मेट्रोच्या कामांची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 4:45 AM

शहरातून जुन्या पुणे-मुंबईचा प्रशस्त रस्ता जातो, उड्डाणपूल, ग्रेड सेपे्रटर अशी दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा अशी शहराची ओळख आहे. मात्र, बीआरटी प्रकल्प वेळेत पूर्ण नाही, त्यातच मेट्रोच्या कामाची घाई केल्याने महामार्गावर निगडी ते दापोडीपर्यंतच्या मार्गावर अडथळ्यांची शर्यत पार करीत वाहनचालकांना मार्ग शोधावा लागतो. त्यात रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी घेऊन जाणा-या रुग्णवाहिकांनाही कोंडीचा फटका बसत आहे.

पिंपरी : शहरातून जुन्या पुणे-मुंबईचा प्रशस्त रस्ता जातो, उड्डाणपूल, ग्रेड सेपे्रटर अशी दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा अशी शहराची ओळख आहे. मात्र, बीआरटी प्रकल्प वेळेत पूर्ण नाही, त्यातच मेट्रोच्या कामाची घाई केल्याने महामार्गावर निगडी ते दापोडीपर्यंतच्या मार्गावर अडथळ्यांची शर्यत पार करीत वाहनचालकांना मार्ग शोधावा लागतो. त्यात रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी घेऊन जाणा-या रुग्णवाहिकांनाही कोंडीचा फटका बसत आहे.गेल्या दोन वर्षांपासून बीआरटी मार्ग लवकरच खुला होईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून दिले जात आहे. सांगवी, किवळे, रावेत हे मार्ग अपवाद वगळता बीआरटी मार्ग खुला होऊ शकला नाही. या उलट या बीआरटी मार्गावर नेहमीच नवनवे प्रयोग केले. पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. मात्र याच मार्गावर ठिकठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. बीआरटी मार्ग चिंचवड तसेच आकुर्डी या ठिकाणी खुला केला असल्याचे जाहीर केले आहे. मात्र या मार्गाने काही अंतर पुढे गेल्यास वाहनचालकाला पुन्हा नेहमीच्या रस्त्यावर यावे लागते. पुढे काही अंतरावर अडथळ्याला सामोरे जावे लागणार असा अंदाज बांधून अनेक वाहनचालक खुला करण्यात आलेल्या बीआरटी मार्गाचा वापर करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे बीआरटी मार्ग खुला केला असला तरी तो निरुपयोगी ठरू लागला आहे.मेट्रोचे काम सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी आहे़ मात्र आताच जागा अडवून ठेवण्यात आली आहे. बºयाच ठिकाणी मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेडस उभे केले आहेत. ते बॅरिकेडस नियमितच्या रस्त्यास अडथळा ठरू लागले आहेत. आहे तो रस्ता अरुंद झाल्याने वाहनांना या मार्गावरून जाताना कसरत करावी लागत आहे. वेळ आणि पैसा खर्च होईल असा हा मार्ग बनला असून, वारंवार अपघातही घडू लागले आहेत.महापालिका प्रशासन व महामेट्रोचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.उड्डाणपुलाचे काम अडथळ्याविना-कासारवाडी नाशिक फाटा येथे उद्योजक ज़े आऱ डी़ टाटा उड्डाणपुलाचे काम तीन वर्षांहून अधिक काळ सुरू होते. मात्र हे काम सुरू असताना वाहतुकीस कधीच अडथळा झाला नाही. त्याचबरोबर उड्डाणपुलाच्या कामामुळे कधी अपघातही घडून आला नाही. अपघात आणि वाहतुकीस अडथळा विरहित उड्डाणपुलाचे काम केले. बीआरटी आणि मेट्रोच्या कामामुळे मात्र नागरिक हैराण झाले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड