शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

उद्योगनगरीतील प्रदूषित पवना नदीचे वॉटर ऑडिट कागदावरच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 13:32 IST

प्रशासनाची टाळाटाळ

ठळक मुद्देतातडीने कार्यवाही अन् उपाययोजनांची आवश्यकतावॉटर ऑडिट आणि नद्यांमधील राडारोडा टाकण्याबाबत उपाययोजना नाही होत ताथवडे येथे पवना नदीतील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू

विश्वास मोरे - पिंपरी : पवना नदीतील दूषित पाण्यामुळे शेकडो मासे आणि कासवांचा मृत्यू झाला़ या घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील नद्यांचे वॉटर ऑडिट करावे, अशी मागणी करूनही महापालिका प्रशासनाच्या वतीने कोणतेही ठोस कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येत आहे. वॉटर ऑडिट आणि नद्यांमधील राडारोडा टाकण्याबाबत उपाययोजना होत नाहीत.ताथवडे येथे पवना नदीतील दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाला आहे. सहा महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. तसेच नद्यांमध्ये राडारोडा टाकून नदीचे पात्र अरूंद केल्याने या वर्षी पुराचा फटकाही नदीकाठच्या भागातील नागरिकांना बसला होता. पिंपरी-चिंचवड शहरामधून मुळा ११ किलोमीटर, पवना २५ किलोमीटर आणि इंद्रायणी २१ किलोमीटर वाहते. महापालिकेने जलसंपदा विभागाकडून तीनही नद्यांचे सर्वेक्षण करून पूररेषेची आखणी करून घेतली आहे. या पूररेषेमध्ये होणारी अनधिकृत बांधकामे, नदीत टाकलेला राडारोड्यामुळे नदीचे पात्र अरूंद झाले आहे. जलप्रवाहाचा नैसर्गिक स्रोत बदलला आहे. या पूररेषेमधील बांधकामांवर कायदेशीर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे....पंचवीस वर्षांपूर्वी नदीपात्र मोकळे होते. तेथे शेत जमीन होती़ त्यावेळी जरी पूर आला तरी नागरीवस्तीला बाधा पोहचत नव्हती़ परंतु नंतरच्या कालखंडात मात्र नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले. त्यामुळे नद्यांना थोडा जरी पूर आला तरी नदीकाठचा नागरीवस्तीचा भाग पूरग्रस्त होतो. २प्रशासन यंत्रणा नेहमीप्रमाणे त्या वेळी तात्पुरती उपाययोजना करते. परंतु कायमस्वरूपी यावर आजपर्यंत तोडगा काढला गेला नाही. शहरातून एकेकाळी दोनशे अडीचशेहून अधिक ओढे-नाले होते. ओढे-नाले बुजवून त्यांच्यावर अतिक्रमण करून बांधकामे झाली आहेत.3 नाल्यांचेही काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरतच नाही ते सगळे नदीकडे सोडले जात आहे. 

४शहरातून वाहणाºया नदी व नाल्यांच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधी समवेत संयुक्तपणे एक दिवसीय चर्चासत्राची मागणी केली होती. पवना, इंद्रायणी व मुळा या नद्यांसाठी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यास तज्ज्ञ प्रकल्प सल्लागार एचसीपी या डिझाईन प्लनिंग अँड मॅनेजमेंट अहमदाबाद यांची जून २०१८ मध्ये नेमणूक केली आहे. त्यांनी नद्यांची पाहणी करून कन्सेप्ट मास्टर प्लॉन तयार केला आहे. ४पर्यावरण विभागाच्या ना हरकत मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, उपाययोजनांचा समावेश या प्रकल्पात आहे. चर्चासत्र आयोजित केले जाईल, असे आयुक्तांनी महापौर जाधव आणि राष्टÑवादीचे कलाटे यांना ६ आॅगस्ट २०१९ ला कळविले होते. त्यानंतर वॉटर आॅडिट आणि चर्चासत्र अजूनही झाले नसल्याचा आरोप राष्टÑवादी काँग्रेसने केला आहे.

महापौरांच्या पत्रावर नाही कार्यवाही ४पवना, इंद्रायणी व मुळा या नद्यांच्या पात्रातील अतिक्रमणावर कारवाई आणि मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात़ याबाबत महापौर राहुल जाधव आणि राष्टÑवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. नदी प्रदूषण आणि नद्यांच्या विषयांवर सविस्तर चर्चा करावी. तसेच नद्यांचे वॉटर आॅडिट करावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. .....नदी प्रदूषित होऊन जीवसृष्टी धोक्यात आली आहे. वॉटर आॅडिट आणि चर्चासत्राबाबत अजूनही प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. आयुक्तांना शहराच्या प्रश्नाबाबत गांभीर्य नाही. चारवेळा मागणी करूनही नदीप्रदूषणाबाबत प्रशासन असंवेदनशील असल्याचे दिसते. - मयूर कलाटे 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडriverनदी