शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाने दिलेला शब्द फिरविला, शास्ती करात नाही मिळणार माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 14:25 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीपूर्वी अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर शंभर टक्के रद्द करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.  

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीपूर्वी अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर शंभर टक्के रद्द करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.  अनधिकृत बांधकामांवरील शास्ती माफ करता येणार नाही, असे पत्रे राज्य शासनाने खासदार श्रीरंग बारणे यांना पाठविले आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीपूर्वी शास्तीकर रद्द करण्याचे गाजर मुख्यमंत्र्यांनी दाखविले होते. त्यावेळी पाचशे स्वेअर फुटापर्यंतच्या बांधकामांना शास्ती करात माफी देण्यात येईल, अशी टूम भाजपाने काढली होती. त्यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षांनी शंभर टक्के शास्ती कर माफ करावा, अशी मागणी केली होती. 

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना २००८ पासून लागू केलेला  शास्तीकर माफ करावा  अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना ३० मे  २०१७ रोजी भेटून केली. या भेटी दरम्यान शास्तीकर माफ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी  दिले होते. या पत्राच्या संदर्भ देऊन १९ आॅगस्ट २०१७ रोजी नगरविकास, विधी व न्याय संसदीय कार्य राज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी खासदार  बारणे यांना मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्राचा दाखला घेऊन कळवले आहे. मंत्री मंडळाने गठीत केलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीने शिफारीस केलेल्या निर्णयामुळे शास्तीकर माफ करता  येणार नाही, असे रणजित पाटील यांनी बारणे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व सामान्य गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांना शास्तीकर भरावा लागणार असून या शास्तीकारातून पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला ५२६  कोटी रुपये उत्पन्न अपेक्षीत असून आत्तापर्यंत १८ कोटी रुपये शास्तीकर वसूल झाला  आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण राज्य सरकारने स्विकारले आहे. या संदर्भातील अधिसूचनाही जारी झाली. त्यामुळे बांधकामे नियमित होणार आहेत. मग शास्ती वसूल करणे चुकीचे आहे. २००८ पासूनची अनधिकृत बांधकामांवरील शास्ती माफ करता येणार नाही असे शासनाने लेखी कळविले आहे. त्यामुळे हा राज्य शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून गरीब माणसाला उध्वस्त करणारा निर्णय आहे. निवडणुकी पूर्वी शास्तीकर पूर्णत:हा माफ केल्याची  केलेली घोषणा ही  जनतेची फसवणूक करणारी आहे.’’