शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाने दिलेला शब्द फिरविला, शास्ती करात नाही मिळणार माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 14:25 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीपूर्वी अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर शंभर टक्के रद्द करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.  

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीपूर्वी अनधिकृत बांधकामांवरील शास्ती कर शंभर टक्के रद्द करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.  अनधिकृत बांधकामांवरील शास्ती माफ करता येणार नाही, असे पत्रे राज्य शासनाने खासदार श्रीरंग बारणे यांना पाठविले आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीपूर्वी शास्तीकर रद्द करण्याचे गाजर मुख्यमंत्र्यांनी दाखविले होते. त्यावेळी पाचशे स्वेअर फुटापर्यंतच्या बांधकामांना शास्ती करात माफी देण्यात येईल, अशी टूम भाजपाने काढली होती. त्यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षांनी शंभर टक्के शास्ती कर माफ करावा, अशी मागणी केली होती. 

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना २००८ पासून लागू केलेला  शास्तीकर माफ करावा  अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना ३० मे  २०१७ रोजी भेटून केली. या भेटी दरम्यान शास्तीकर माफ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी  दिले होते. या पत्राच्या संदर्भ देऊन १९ आॅगस्ट २०१७ रोजी नगरविकास, विधी व न्याय संसदीय कार्य राज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी खासदार  बारणे यांना मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्राचा दाखला घेऊन कळवले आहे. मंत्री मंडळाने गठीत केलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीने शिफारीस केलेल्या निर्णयामुळे शास्तीकर माफ करता  येणार नाही, असे रणजित पाटील यांनी बारणे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व सामान्य गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांना शास्तीकर भरावा लागणार असून या शास्तीकारातून पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला ५२६  कोटी रुपये उत्पन्न अपेक्षीत असून आत्तापर्यंत १८ कोटी रुपये शास्तीकर वसूल झाला  आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण राज्य सरकारने स्विकारले आहे. या संदर्भातील अधिसूचनाही जारी झाली. त्यामुळे बांधकामे नियमित होणार आहेत. मग शास्ती वसूल करणे चुकीचे आहे. २००८ पासूनची अनधिकृत बांधकामांवरील शास्ती माफ करता येणार नाही असे शासनाने लेखी कळविले आहे. त्यामुळे हा राज्य शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून गरीब माणसाला उध्वस्त करणारा निर्णय आहे. निवडणुकी पूर्वी शास्तीकर पूर्णत:हा माफ केल्याची  केलेली घोषणा ही  जनतेची फसवणूक करणारी आहे.’’