शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पिंपरी-चिंचवड: पाणी आरक्षण वाढीसाठी साकडे: जलसंपदामंत्री, पालकमंत्र्यांसोबत लवकरच घेणार बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 06:59 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याची सद्य:स्थिती भविष्यात पाण्याची गरज वाढत आहे. त्यामुळे शहराला ५०० एमएलडी पाणी आणण्यासाठी जलसंपदामंत्री आणि पालकमंत्र्यांना साकडे घातले आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याची सद्य:स्थिती भविष्यात पाण्याची गरज वाढत आहे. त्यामुळे शहराला ५०० एमएलडी पाणी आणण्यासाठी जलसंपदामंत्री आणि पालकमंत्र्यांना साकडे घातले आहे. पाण्याचे आरक्षण वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी मंत्र्यांसोबत तातडीची बैठक शुक्रवारी होणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सभागृहनेते एकनाथ पवार यांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीनियोजन विस्कळीत झाले आहे. परिणामी त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. याबाबत सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. ‘लोकमत’नेही प्रशाकीय गोंधळामुळे पाणीकोंडी झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल पक्षनेते एकनाथ पवार यांनी घेतली. आज पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली.पाणीपुरवठा योजना, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना होणारा पाणीपुरवठा, बेकायदेशीर नळजोड व पाणीपुरवठा विभागाकडील अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत बुधवारी अप्पूघर येथील सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्रामध्ये झालेल्या बैठकीस महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे, विशाल कांबळे आदी उपस्थित होते.या वेळी पवार यांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याबाबत सद्य:स्थितीचा आढावा घेतला. शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी भविष्यात वाढीव पाण्यासाठी आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाचीही विस्तृत माहिती दिली. तसेच, सद्य:स्थितीत चालू असलेली चोवीस पाणीपुरवठा योजना याबाबत माहिती दिली.भामा आसखेडला गती देणारभामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आणण्याची योजना रखडली आहे. ही पाणी योजना तातडीने झाल्यास पाणीप्रश्न सुटणार आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘भविष्यातील लोकसंख्या वाढीनुसार पिण्याच्या पाण्याचे नियोजन झाले, तर भविष्यात अडचण येणार नाही. राज्य शासन पातळीवर या योजनांसंदर्भात विविध परवानग्या आणि गती देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या योजनांना गती दिल्यास पाणीटंचाईवर उपाययोजना होऊ शकते. तसेच कपात केलेले पाण्याचे आरक्षण वाढविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. भविष्यात शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासंदर्भात नियोजन केले जाणार आहे.’’२४ तास पाणी योजनापाण्याचा योग्य वापर, पाण्याची गळती कमी करणे याकामी विविध कार्यक्रमांद्वारे नागरिकांमध्ये जागृती करण्याबाबत संबंधितांना पवार यांनी निर्देश दिले. सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी २४ तास पाणीपुरवठा योजना काय आहे, याची माहिती होण्यासाठी आॅटो क्लस्टर येथे शुक्रवारी कार्यशाळा आहे, असे एकनाथ पवार यांनी सांगितले.शहरात पाणीपुरवठा विस्कळीत1पिंपरी : पवना नदीतील रावेत येथील बंधाºयातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याचा उपसा कमी झाला आहे. शहरातील पाणी वितरणामध्ये अडचण निर्माण झाली असल्याचे पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभागाचे सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर यांनी सांगितले.2पिंपरी-चिंचवडसाठी पवना धरणातून पाण्याचा पुरवठा होतो. रावेत येथे जलउपसा केंद्रामार्फत पाणी उचलले जाते. सध्या शहरात कोणत्याही परिसरात पूर्ण दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे सर्वच प्रभागांत पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी सुरू आहेत. उपसा कमी झाल्याने पाणी नियोजन विस्कळीत होऊ शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. कमी प्रमाणात पाणी उपसले गेले तर शहरातील पिण्याच्या पाणी नियोजनावर परिणाम होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.3शहरात दिवसातून एकवेळा पाणीपुरवठा होतो. धरण शंभर टक्के भरले असतानाही पिण्याच्या पाण्याची बोंब सुरू झाली आहे. सत्तधारी आणि विरोधकांनी पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा सुरळीत होण्याऐवजी हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पवना नदीतील रावेत येथील बंधाºयातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याचा उपसा कमी झाला आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचा अंदाज पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड