शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Pimpri Chinchwad: सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्यास दंड करा; नदी प्रदूषण रोखण्यासाठी निधी

By विश्वास मोरे | Updated: December 26, 2023 17:58 IST

पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्या उगमस्थानापासून संगमापर्यंत प्रदूषित होत असल्याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविला...

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील पवना, मुळा आणि इंद्रायणी प्रदूषणाबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर आमदार उमा खापरे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. त्यानंतर मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत ग्रामीण भागात प्रदूषण रोखण्यासाठी गावांना निधी द्यावा, एमआयडीसीनेही उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या. सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना दंड करा, नदी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासन निधी देण्याबाबत सकारात्मक आहे. मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बैठकीत सांगितले.

पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्या उगमस्थानापासून संगमापर्यंत प्रदूषित होत असल्याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविला. त्यानंतर आमदार खापरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली. त्यावेळी केसरकर यांनी उत्तर दिले होते. त्यानंतर म्हाळुंगे येथे बैठक झाली. आयुक्त शेखर सिंह, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसचिव डॉ. अविनाश ढाकणे, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार उपस्थित होते.

इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण केले. नदीच्या हद्दीतील सर्व नाल्यांचे सांडपाणी इंटरसेप्टर लाइनद्वारे नजीकच्या मैला शुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करण्यासाठी संकलित होते, असे शेखर सिंह यांनी सांगितले.

नगरपरिषदा, ग्रामपंचायतींनी एकत्रित काम करावे

मुख्य अभियंता अशोक भालकर यांनी इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत अहवालाचे सादरीकरण केले. प्रदूषण कमी करण्यासाठी उगमापासून कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर केसरकर यांनी सर्व नगरपंचायती, नगरपरिषदा व ग्रामपंचायतींनी एकत्रित काम करण्याबाबत सूचना दिल्या.

मोठ्या गृहनिर्माण संस्थांवर कारवाई करा

केसरकर म्हणाले, दूषित पाणी नदीत जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे नवे प्रकल्प उभारताना जुने प्रकल्पही सुरूच राहतील याकडे लक्ष द्यावे. नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या गृहनिर्माण संस्थांचे सांडपाणी एकत्र करून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करावा. प्रक्रिया होत नसल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करावी.

समन्वयाने उपाययोजना करा

उमा खापरे म्हणाल्या, पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी प्रदूषित होत असल्याबाबत अधिवेशनात आवाज उठवला होता. पुरावेही दिले होते. त्याची दखल घेतली. विविध विभागांनी समन्वयाने उपाययोजना करून नदीत जाणारे दूषित पाणी रोखण्याचे उपाय योजावेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका