शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

PCMC :माजी अध्यक्ष अन् पक्षनेत्यांमध्ये शाब्दिक चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:09 IST

महापालिका सर्वसाधारण सभेसाठी सत्ताधारी भाजपाकडून विषय मंजुरी किंवा नामंजुरीसाठी व्हिप बजावला जातो. दोन विषयांच्या संदर्भात आज व्हिप यावरून माजी स्थायी समिती व सत्तारूढ पक्षनेत्यांमध्ये जुंपली होती.

पिंपरी  - महापालिका सर्वसाधारण सभेसाठी सत्ताधारी भाजपाकडून विषय मंजुरी किंवा नामंजुरीसाठी व्हिप बजावला जातो. दोन विषयांच्या संदर्भात आज व्हिप यावरून माजी स्थायी समिती व सत्तारूढ पक्षनेत्यांमध्ये जुंपली होती.सर्वसाधारण सभेत विषय कोणते मंजूर करावेत किंवा नामंजूर करायचे. कोणते दप्तरी दाखल करायचे, कोणते फेटाळून लावायाचे याविषयी पक्षाचा व्हिप काढला जातो. आजच्या सभेत दोन विषयात व्हिपचा गोंधळ झाला. मंजूर करण्याचा विषय तहकूब आणि तहकूब विषय मंजूर करण्यात आला. यावर बोलताना स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे या महापौर राहुल जाधव आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर चिडल्या होत्या.आम्हाला ग्रहित धरू नका : सीमा सावळेमहापालिकेच्या मालमत्तांवर सौर यंत्र बसविण्याचा विषय होता. हा विषय चर्चा करून तहकूब ठेवायचा होता. मात्र, तो मंजूर केला. यावर सावळे म्हणाल्या,‘‘सभा कामकाजाविषयी सदस्यांना व्हिप दिला जातो. तो वारंवार बदलणे योग्य नाही. याची कल्पना द्यायला हवी होती. आम्हाला कोणी गृहित धरू नये. मुर्खात काढण्याचा प्रकार आहे. आम्ही काय वेडे आहोत. ही बाब चुकीची आहे. नगरसेवकांना विश्वासात घेऊन धोरण अवलंबले जावे.’’आयत्यावेळी घुसडले विषयमहापालिकेच्या तहकूब सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपाने आज आयत्यावेळी विषय घुसडले. त्यावर माजी महापौर मंगला कदम यांनी आक्षेप घेतला. कोणत्या नियमाच्या आधारे तहकूब सभेत विषय दाखल करून घेतले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महापालिकेची सप्टेंबर महिन्याची तहकूब सभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.सप्टेंबरच्या सभेत तातडीची बाब म्हणून पिंपरी विधानसभा मतदार संघातील दुबार मतदार, मृत मतदारांची नावे वगळण्याचा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर महापालिकेतील एका नगरसेवकाची नियुक्ती करण्याचा, असे तीन विषय आयत्यावेळी दाखल केले होते. कुत्र्यांच्या प्रश्नावरून गोंधळ झाल्याने सभा तहकूब झाली होती. तहकूब सभा आज झाली.विषयपत्रिकेवरील २४ आणि आयत्यावेळी दाखल करून घेतलेल्या दोन अशा २६ विषयांना मान्यता दिली. त्यानंतर आणखीन तीन विषयांना मान्यता देण्यास सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केली. याला माजी महापौर कदम यांनी आक्षेप घेतला. संबंधित विषय आयत्यावेळी घेतले, त्याची नगरसेवकांना माहिती दिली नाही. नगरसेवकांना अंधारात ठेवून विषय मंजूर करणे अत्यंत चुकीचे आहे. तहकूब सभेत विषय कसे दाखल करून घेतले जातात? असा प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या,‘‘सत्ताधारी आणि प्रशासन चुकीच्या पद्धतीने विषय घुसडून मंजूर करून घेतात. ही बाब नियमबाह्य आहे.’’विकासाला प्राधान्यसत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले,‘‘केंद्राकडून काही प्रकल्प राबविण्यात येतात. त्या विषयांची निकड किती आहे. यावरून विषयांचा प्राधान्यक्रम ठरविला जातो. शहराच्या विकासासाठी केंद्राचे काही प्रकल्प असतील तर त्याविषयी प्रशासनाकडून माहिती घेऊन विषयाचे नियोजन केले जाते. यात सदस्यांना माहिती न देण्याचा विषयच येत नाही.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या