शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

PCMC :माजी अध्यक्ष अन् पक्षनेत्यांमध्ये शाब्दिक चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:09 IST

महापालिका सर्वसाधारण सभेसाठी सत्ताधारी भाजपाकडून विषय मंजुरी किंवा नामंजुरीसाठी व्हिप बजावला जातो. दोन विषयांच्या संदर्भात आज व्हिप यावरून माजी स्थायी समिती व सत्तारूढ पक्षनेत्यांमध्ये जुंपली होती.

पिंपरी  - महापालिका सर्वसाधारण सभेसाठी सत्ताधारी भाजपाकडून विषय मंजुरी किंवा नामंजुरीसाठी व्हिप बजावला जातो. दोन विषयांच्या संदर्भात आज व्हिप यावरून माजी स्थायी समिती व सत्तारूढ पक्षनेत्यांमध्ये जुंपली होती.सर्वसाधारण सभेत विषय कोणते मंजूर करावेत किंवा नामंजूर करायचे. कोणते दप्तरी दाखल करायचे, कोणते फेटाळून लावायाचे याविषयी पक्षाचा व्हिप काढला जातो. आजच्या सभेत दोन विषयात व्हिपचा गोंधळ झाला. मंजूर करण्याचा विषय तहकूब आणि तहकूब विषय मंजूर करण्यात आला. यावर बोलताना स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे या महापौर राहुल जाधव आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर चिडल्या होत्या.आम्हाला ग्रहित धरू नका : सीमा सावळेमहापालिकेच्या मालमत्तांवर सौर यंत्र बसविण्याचा विषय होता. हा विषय चर्चा करून तहकूब ठेवायचा होता. मात्र, तो मंजूर केला. यावर सावळे म्हणाल्या,‘‘सभा कामकाजाविषयी सदस्यांना व्हिप दिला जातो. तो वारंवार बदलणे योग्य नाही. याची कल्पना द्यायला हवी होती. आम्हाला कोणी गृहित धरू नये. मुर्खात काढण्याचा प्रकार आहे. आम्ही काय वेडे आहोत. ही बाब चुकीची आहे. नगरसेवकांना विश्वासात घेऊन धोरण अवलंबले जावे.’’आयत्यावेळी घुसडले विषयमहापालिकेच्या तहकूब सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपाने आज आयत्यावेळी विषय घुसडले. त्यावर माजी महापौर मंगला कदम यांनी आक्षेप घेतला. कोणत्या नियमाच्या आधारे तहकूब सभेत विषय दाखल करून घेतले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महापालिकेची सप्टेंबर महिन्याची तहकूब सभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.सप्टेंबरच्या सभेत तातडीची बाब म्हणून पिंपरी विधानसभा मतदार संघातील दुबार मतदार, मृत मतदारांची नावे वगळण्याचा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर महापालिकेतील एका नगरसेवकाची नियुक्ती करण्याचा, असे तीन विषय आयत्यावेळी दाखल केले होते. कुत्र्यांच्या प्रश्नावरून गोंधळ झाल्याने सभा तहकूब झाली होती. तहकूब सभा आज झाली.विषयपत्रिकेवरील २४ आणि आयत्यावेळी दाखल करून घेतलेल्या दोन अशा २६ विषयांना मान्यता दिली. त्यानंतर आणखीन तीन विषयांना मान्यता देण्यास सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केली. याला माजी महापौर कदम यांनी आक्षेप घेतला. संबंधित विषय आयत्यावेळी घेतले, त्याची नगरसेवकांना माहिती दिली नाही. नगरसेवकांना अंधारात ठेवून विषय मंजूर करणे अत्यंत चुकीचे आहे. तहकूब सभेत विषय कसे दाखल करून घेतले जातात? असा प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या,‘‘सत्ताधारी आणि प्रशासन चुकीच्या पद्धतीने विषय घुसडून मंजूर करून घेतात. ही बाब नियमबाह्य आहे.’’विकासाला प्राधान्यसत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले,‘‘केंद्राकडून काही प्रकल्प राबविण्यात येतात. त्या विषयांची निकड किती आहे. यावरून विषयांचा प्राधान्यक्रम ठरविला जातो. शहराच्या विकासासाठी केंद्राचे काही प्रकल्प असतील तर त्याविषयी प्रशासनाकडून माहिती घेऊन विषयाचे नियोजन केले जाते. यात सदस्यांना माहिती न देण्याचा विषयच येत नाही.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या