शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आयटी पार्कजवळील रस्ते खुले करा - पालकमंत्री गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 02:29 IST

हिंजवडी आयटी पार्कच्या समस्या विशेषत: वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी सकाळी परिसराची पाहणी केली. म्हाळुंगे येथून दौरा सुरूकेला होता. आयटी पार्कशी संबंधित रस्ते लवकरात लवकर तयार करून वाहतुकीसाठी खुले करणे गरजेचे आहे. त्यामुळे हिंजवडीतील वाहतुकीचा ताण कमी होईल. आयटीयन्सचा प्रवासदेखील सुखकर होईल, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्कच्या समस्या विशेषत: वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी सकाळी परिसराची पाहणी केली. म्हाळुंगे येथून दौरा सुरूकेला होता. आयटी पार्कशी संबंधित रस्ते लवकरात लवकर तयार करून वाहतुकीसाठी खुले करणे गरजेचे आहे. त्यामुळे हिंजवडीतील वाहतुकीचा ताण कमी होईल. आयटीयन्सचा प्रवासदेखील सुखकर होईल, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. येथील वाहतूककोंडीबाबत ‘लोकमत’ने गेले दोन दिवस वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन पालकमंत्री बापट यांनी पाहणी केली.सकाळी म्हाळुंगे येथील मर्सिडिझ बेन्झ-शेडगे वस्ती, शेडगे वस्ती-कुमार बिल्डर, म्हाळुंगे पूल, म्हाळुंगे पूल ते साखरे वस्ती, तसेच हिंजवडी-माण-फेज ३ रस्त्याची पाहणी व नव्याने मुळा नदीवर हिंजवडी म्हाळुंगेला जोडणाºया पुलाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. तसेच माण-चांदे रस्त्याची देखील पाहणी त्यांनी या वेळी केली. आयटीयन्सना पार्किंगसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, यासाठी १२ हजार चौरस फूट बहुमजली इमारत बांधून त्यात आधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. पीएमआरडीएचे किरण गित्ते यांनी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत माहिती दिली. हिंजवडी ते बालेवाडी मेट्रोचा पहिला टप्पा असून, मार्च २०१९ पर्यंत हा टप्पा पूर्ण करण्यावर प्राधान्य देण्यात येत असून, पुढील भाग काही कारणामुळे लांबणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मेट्रो तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे ध्येय पूर्ण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, आझम पानसरे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते, नगरसेवक शत्रुघ्न काटे, तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील,आयटी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पै, कर्नल चरांजीत बागल, नवनाथ पारखी, राम वाकडकर, दादा मोहोळ, सुनील भरणे, श्याम हुलावळे उपस्थित होते.अभियंता दिनीच सुनावले खडे बोल!पालकमंत्री बापट म्हाळुंगे-हिंजवडी पुलाची पाहणी करत होते़ सदर पूल १४ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येणार आहे. मात्र, या पुलाचे काम सुरू असताना म्हाळुंगेच्या दिशेने जाणारा रस्ता आश्चर्यकारकरीत्या मोठ्या प्रमाणात वळवण्यात आल्याचे बापट यांच्या निदर्शनास आले. सदर बाबीची सखोल माहिती घेत असताना इंजिनिअर समाधानकारक उत्तर देत नसल्याने बापट यांनी त्यास चांगलेच धारेवर धरले. मी इंजिनिअर नसूनही माझ्या निदर्शनास आलेली ही मोठी चूक तुमच्या ध्यानी का आली नाही? अशा चुकांमुळेच अपघाताचे प्रमाण वाढेल असे, बापट या वेळी म्हणाले. या घटनेची चर्चा मात्र येथील ग्रामस्थ दिवसभर करत होते.

टॅग्स :Puneपुणे