शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

कारण राजकारण : प्रशासकीय काळामध्ये अधिकारी झाले मुजोर

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: June 12, 2025 12:19 IST

- महापालिका निवडणुकांची प्रतीक्षा : पवना बंदिस्त जलवाहिनीचे भिजत घोंगडे कायम; नको त्या प्रकल्पांना महत्त्व, मूलभूत प्रकल्पांना मात्र बगल

पिंपरी : महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीनंतर पाच वर्षांचा कार्यकाल संपल्याने १२ मार्च २०२२ रोजी सभागृह बरखास्त झाले. दुसऱ्याच दिवसापासून प्रशासकीय राजवट सुरू झाली. गेली तीन वर्षे प्रशासक तथा आयुक्तांच्या माध्यमातून गाडा हाकला जात आहे. मात्र, महापालिकेत जाब विचारणारे नगरसेवक, पदाधिकारी नसल्याने अधिकारी मुजोर झाल्याचा आरोप होत आहे. पवना बंदिस्त जलवाहिनीसह अनेक प्रकल्पांचे भिजत घोंगडे कायम आहे.फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेची निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना महामारी, न्यायालयात याचिका, ओबीसी आरक्षण आदी कारणांमुळे निवडणुका वेळेत झाल्या नाहीत. परिणामी, महापालिका बरखास्त झाली. महापौर, इतर पदाधिकारी आणि नगरसेवक नसल्याने प्रशासकीय राजवटीत कामकाज आयुक्तांच्या आदेशानुसार चालू लागले. अधिकारी मनमानी कारभार करू लागले. नको त्या प्रकल्पांना महत्त्व देण्यात येऊ लागले आहे, तर मूलभूत प्रकल्पांना सोयीने बगल देऊ लागले आहेत.आमदार-खासदारांना घेण्याची वेळ बैठका महापालिका तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्यानंतर आयुक्त शेखर सिंह प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. माजी नगरसेवक, तसेच नागरिकांच्या तक्रारी व समस्यांकडे दुर्लक्ष होऊ लागले. नागरी समस्या सोडविण्यासाठी थेट निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत अधिकारी जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे खासदार आणि आमदारांना आपल्या पक्षाच्या माजी नगरसेवकांना घेऊन आयुक्तांसोबत बैठक घेण्याची, कामांसाठी पाठपुरावा करण्याची वेळ आली आहे.अर्थसंकल्पात प्रभागातील कामे समाविष्ट करण्यासाठी झगडावे लागत आहे. आयुक्त, अधिकारी दाद देत नसल्याने माजी नगरसेवक आणि माजी पदाधिकारी नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यासंदर्भात आपापल्या नेत्यांकडे तक्रारी करण्याचे प्रकारही घडत आहेत. पवना बंदिस्त जलवाहिनीचे काम ९५० कोटींवर?शहरास अतिरिक्त स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी पवना धरण ते निगडीपर्यंत बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचा घाट घालण्यात आला. मात्र, मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे तो ठप्प होऊन १३ वर्षे झाली आहेत. प्रकल्पावरील स्थगिती उठविल्यामुळे महापालिकेकडून फेरप्रस्ताव बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र, राज्य शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प रखडल्याने खर्च दुपटीवर गेला आहे. हे काम २००८ ला ३९७ कोटी २२ लाखांत करण्यात येणार होते. आता संबंधित ठेकेदारालाच नव्याने काम देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. दरवाढ झाल्याने हे काम आता ९५० कोटींपर्यंत पोहोचले आहे. प्रशासकीय राजवटीत खर्चिक कामांना प्राधान्यप्रशासकीय राजवटीत खर्चिक व मोठ्या कामांना प्राधान्य दिले. नगरसेवकांच्या काळात गटतटामुळे, अडकून पडलेल्या अनेक प्रकल्पांना प्रशासकीय राजवटीत हिरवा कंदील दाखविण्यात आला.

प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे नियोजनाचाही अभाव आहे. नागरिक व लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पालिकेने चुकीचा विकास आराखडा केला. -  अजित गव्हाणे, माजी अध्यक्ष, स्थायी समितीलोकप्रतिनिधींची काम करण्याची आणि प्रशासनाची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी महापालिकेत नसल्याने नागरिकांच्या समस्या 'जैसे थे'च आहेत. -  सचिन चिखले, माजी नगरसेवकनागरिक आमच्याकडे तक्रारी मांडतात. त्या सोडवणे क्रमप्राप्त आहे. मात्र, सध्या महापालिकेत नगरसेवक नसल्याने धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. त्यातून सामान्यांचे प्रश्न सोडविण्यास अडचणी येतात. - नामदेव ढाके, माजी सत्तारूढ पक्षनेतेनागरिकांचा आवाज मांडण्यासाठी आणि धोरणात्मक कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी काम करत असतात. मात्र, मागील नगरसेवक नसल्याने नागरिकांच्या समस्या सोडविल्याच जात नाहीत. गटारे तुंबणे, पाणीपुरवठा विस्कळीत होणे, हे त्याचेच लक्षण आहे.  -  सुलक्षणा धर-शिलवंत, माजी नगरसेविका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेElectionनिवडणूक 2024Muncipal Corporationनगर पालिका