शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आराखड्यातही नाही रिंगरोडची नोंद, माहिती अधिकारात उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:30 IST

रिंगरोडबाधित घरबचाव संघर्ष समितीने माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळविलेल्या माहितीमध्ये धक्कादायक माहिती हाती लागली आहे.

रावेत : रिंगरोडबाधित घरबचाव संघर्ष समितीने माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळविलेल्या माहितीमध्ये धक्कादायक माहिती हाती लागली आहे. १९९५च्या विकास आराखड्याच्या नगररचना शासन राजपत्रित प्रतीमध्ये महापालिका आणि प्राधिकरण प्रशासनाकडे एचसीएमटीआर रिंगरोडचा समावेश अधोरेखित नाही.स्थानिक प्रशासनच नगररचना १९९५च्या विकास आराखडा नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. विकास आराखड्यात रिंग रोडचा समावेश नसताना त्याबाबतचा स्थानिक पातळीवर अट्टहास का, असा प्रश्न माहिती अधिकारामुळे उजेडात आला आहे.मागील सात महिने शहरातील गुरुद्वारा रोड, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळे गुरव, कासारवाडी परिसरातील हजारो रिंगरोडबाधित कुटुंबीय आपल्या हक्काच्या घरासाठी विविध माध्यमांतून आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी याबाबत प्राधिकरण आणि महापालिका या दोन्ही प्रशासनांकडे १९९५च्या विकास आराखड्याची नगररचना शासन राजपत्रित प्रत माहिती अधिकारान्वये मागवली होती.>विकास आराखड्यानुसार बाउंडेड आॅरेंज प्लॅननुसार महापालिका हद्दीतील भोसरी, पिंपरी वाघेरे, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकड या प्रमुख दहा उपनगरांचा समावेश आहे. यामध्ये अंतर्गत रस्ते, आरक्षणे याचा प्रामुख्याने समावेश आहे. यामध्ये पिंपळे सौदागरमधील १८ मीटरचे तीन रस्ते, भोसरीमधील १२ मीटर आणि ९ मीटरचे दोन रस्ते, पिंपरीतील १८, १५, १२, ९ मीटरचे १४ रस्ते, चिंचवड हद्दीतील मुंबई-पुणे रोड ते चापेकर चौक असा २० मीटर रोड, तसेच १८, १२ मीटरचे अन्य ४ रस्ते, आकुर्डी विभागातील खंडोबा माळ ते प्राधिकरण हद्द ९ आणि १२ मीटर रोड, तसेच अन्य ७ डी पी रोड, सांगवी विभागातील १८, १२, ६ मीटरचे ५ रस्ते, पिंपळे गुरवमधील १८ मीटरचा एक रस्ता, पिंपळे सौदागरमधील २० मीटरचा रस्ता आणि १२ मीटरचा ३ रस्ता, पिंपळे निलखमधील १२ मीटरचा रस्ता, वाकड हद्दीतील १२ आणि ९ मीटरचे दोन रस्ते यांचा स्पष्ट उल्लेख आढळतो. परंतु, आकुर्डी गुरुद्वारा परिसर, वाल्हेकरवाडी-बिजलीनगर, चिंचवड, थेरगाव, पिंपळे गुरव हद्दीतून जात असलेल्या प्रस्तावित ३० मीटर एचसीएमटीआर रिंगरोडचा स्पष्ट उल्लेख नाही.समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील म्हणाले की, प्राधिकरण आणि महापालिका या दोन्ही स्वायत्त संस्थांनी १९९५च्या विकास आराखड्याचा आधार कोणत्या नियमानुसार घेतला आहे, याचा खुलासा करावा. विकास आराखड्यात एचसीएमटीआर ३० मीटर रिंगरोडचा समावेश केलेला दिसून येत नाही. प्राधिकरण आणि पालिका या दोन्ही संस्थांनी माहिती अधिकारात दिलेल्या कागदपत्रांद्वारे सदरची महत्त्वपूर्ण बाब निदर्शनास आलेली आहे. विकास आराखड्याची मुदत २०१५ मध्ये संपुष्टात आलेली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे, तसेच लोकसंख्येमुळे फेरसर्वेक्षण होणे गरजेचे आहे.महापालिकेच्या नगररचना व विकास विभागाचे उपअभियंता तथा माहिती अधिकारी सुनील भगवानी यांनी पत्रास खुलासा देत २० पानी विकास आराखडा प्रत पाटील यांना टपालाद्वारे पाठवली आहे.त्यामध्ये २१ सप्टेंबर १९९५ रोजीचा शहर विकास आराखडा, तसेच ३० सप्टेंबर १९९९चा पुरवणी आराखडा प्रत अशा दोन्ही प्रती देण्यात आल्या आहेत.यामध्येही ३० मीटर एचसीएमटीआर रिंगरोडचा समावेश अधोरेखित नाही. याचा अर्थ स्थानिक प्रशासनच नगररचना विकास आराखडा नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. विकास आराखड्यात रिंगरोडचा समावेश नसताना, त्याबाबतचा स्थानिक पातळीवर अट्टहास का, असा मोठा प्रश्न ‘आरटीआय’मुळे उजेडात आला आहे.