शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

जनशक्तीला कोणीही हरवू शकत नाही

By admin | Updated: July 5, 2017 02:59 IST

आजपर्यंतच्या राजकारण्यांनी निवडणुका आल्या की अनधिकृत घरे अधिकृत करू, कोणाच्याही घराची वीट पडू देणार नाही, अशा

लोकमत न्यूज नेटवर्करावेत : आजपर्यंतच्या राजकारण्यांनी निवडणुका आल्या की अनधिकृत घरे अधिकृत करू, कोणाच्याही घराची वीट पडू देणार नाही, अशा प्रकारची केवळ आश्वासने दिले आहेत हेच राजकीय नेते आज चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन करीत आहेत़ त्यांच्या भूल थापांना बळी न पडता आपण सर्वांनी एकत्रित राहून हा लढा तीव्र केला पाहिजे. आजपर्यंतचा इतिहास पाहता जनशक्तीला कोणीही हरवू शकत नाही, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी रिंगरोड बाधित नागरिकांच्या घर बचाव संघर्ष समितीने काळेवाडी फाटा येथील बीआरटी मार्गावर आयोजित सभेत केले.ते पुढे म्हणाले की, झोडा आणि फोडा ही नीती हाणून पाडायची असेल तर संघटन मजबूत ठेवून या भुलभुलैय्याला उत्तर केवळ संघर्षातून देता येईल. या वेळी त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर सडकून टीका केली. महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद एचसीएमटीआरचा ६५टक्के जागेचा ताबा असून उर्वरित जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते पिंपळे गुरवपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईला घरे वाचवा संघर्ष समितीने तीव्र विरोध केला आहे. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, शस्ती कर आणि प्रस्तावित रिंगरोडमधून बाधित होणाऱ्या घरांना संरक्षण मिळावे यासाठी हा लढा कायमचा प्रश्न सुटेपर्यंत असाच चालू राहणार आहे, असा निर्धार या वेळी करण्यात आला.वाल्हेकरवाडीसह थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे गुरव आदी भागांतून प्रस्तावित असणाऱ्या रिंगरोडला विरोध करण्यासाठी तसेच रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे पाडण्यास विरोध असणारांची संयुक्त सभा काळेवाडी फाटा येथे आयोजित करण्यात आली होती.या वेळी हजारो महिला उपस्थित होत्या. या बैठकीत प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोध ठाम विरोध केला आहे. प्राधिकरण आणि पिंपरी पालिकेच्या चुकीचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास कशासाठी? असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे. ‘महिला शक्ती उतरी है, नयी रोशनी लायी है,’ हम सब एक है, फुल नाही चिंगारी है, घर आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, सर उठाके हल्लाबोल, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. या वेळी मानव कांबळे, मारुती भापकर, हिरामण बारणे, कॉम्रेड विलास सोनवणे, राहुल कलाटे, अमित गावडे, सचिन चिंचवडे, विजय पाटील, धनंजय येळेकर, ज्योती टिळेकर, रेखा भोळे, नंदा काकडे आदींसह परिसरातील हजारो महिला आणि नागरिक उपस्थित होते.अनधिकृत घरे अधिकृत होण्यासाठी निवडणुकीपूर्वी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता़ तेच आमदार आणि खासदार अनधिकृत बांधकामाचा विषय समोर घेऊन पुन्हा आपल्या मतावर निवडून आले. ते आज गप्प का? त्यांना या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील. रिंगरोडबाबत हे आता वेगळी भूमिका का घेत आहेत? आता आमदार म्हणतात, रिंगरोड बाधित कुटुंबाना पंतप्रधान आवास योजनेतून पाच ते सहा लाखांत घरे उपलब्ध करून दिले जातील. या वक्तव्याचा आम्ही निषेध करीत आहोत. आम्हाला योजनेची घरे नको आहेत तर आमची हक्काची घरे वाचली पाहिजे. जर इतर आरक्षणे बदलता येतात तर हे आरक्षणसुद्धा शासनास बदलण्यास आपण भाग पाडू़- मानव कांबळे