शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जनशक्तीला कोणीही हरवू शकत नाही

By admin | Updated: July 5, 2017 02:59 IST

आजपर्यंतच्या राजकारण्यांनी निवडणुका आल्या की अनधिकृत घरे अधिकृत करू, कोणाच्याही घराची वीट पडू देणार नाही, अशा

लोकमत न्यूज नेटवर्करावेत : आजपर्यंतच्या राजकारण्यांनी निवडणुका आल्या की अनधिकृत घरे अधिकृत करू, कोणाच्याही घराची वीट पडू देणार नाही, अशा प्रकारची केवळ आश्वासने दिले आहेत हेच राजकीय नेते आज चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन करीत आहेत़ त्यांच्या भूल थापांना बळी न पडता आपण सर्वांनी एकत्रित राहून हा लढा तीव्र केला पाहिजे. आजपर्यंतचा इतिहास पाहता जनशक्तीला कोणीही हरवू शकत नाही, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी रिंगरोड बाधित नागरिकांच्या घर बचाव संघर्ष समितीने काळेवाडी फाटा येथील बीआरटी मार्गावर आयोजित सभेत केले.ते पुढे म्हणाले की, झोडा आणि फोडा ही नीती हाणून पाडायची असेल तर संघटन मजबूत ठेवून या भुलभुलैय्याला उत्तर केवळ संघर्षातून देता येईल. या वेळी त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर सडकून टीका केली. महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद एचसीएमटीआरचा ६५टक्के जागेचा ताबा असून उर्वरित जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते पिंपळे गुरवपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईला घरे वाचवा संघर्ष समितीने तीव्र विरोध केला आहे. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, शस्ती कर आणि प्रस्तावित रिंगरोडमधून बाधित होणाऱ्या घरांना संरक्षण मिळावे यासाठी हा लढा कायमचा प्रश्न सुटेपर्यंत असाच चालू राहणार आहे, असा निर्धार या वेळी करण्यात आला.वाल्हेकरवाडीसह थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे गुरव आदी भागांतून प्रस्तावित असणाऱ्या रिंगरोडला विरोध करण्यासाठी तसेच रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे पाडण्यास विरोध असणारांची संयुक्त सभा काळेवाडी फाटा येथे आयोजित करण्यात आली होती.या वेळी हजारो महिला उपस्थित होत्या. या बैठकीत प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोध ठाम विरोध केला आहे. प्राधिकरण आणि पिंपरी पालिकेच्या चुकीचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास कशासाठी? असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे. ‘महिला शक्ती उतरी है, नयी रोशनी लायी है,’ हम सब एक है, फुल नाही चिंगारी है, घर आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, सर उठाके हल्लाबोल, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. या वेळी मानव कांबळे, मारुती भापकर, हिरामण बारणे, कॉम्रेड विलास सोनवणे, राहुल कलाटे, अमित गावडे, सचिन चिंचवडे, विजय पाटील, धनंजय येळेकर, ज्योती टिळेकर, रेखा भोळे, नंदा काकडे आदींसह परिसरातील हजारो महिला आणि नागरिक उपस्थित होते.अनधिकृत घरे अधिकृत होण्यासाठी निवडणुकीपूर्वी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता़ तेच आमदार आणि खासदार अनधिकृत बांधकामाचा विषय समोर घेऊन पुन्हा आपल्या मतावर निवडून आले. ते आज गप्प का? त्यांना या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील. रिंगरोडबाबत हे आता वेगळी भूमिका का घेत आहेत? आता आमदार म्हणतात, रिंगरोड बाधित कुटुंबाना पंतप्रधान आवास योजनेतून पाच ते सहा लाखांत घरे उपलब्ध करून दिले जातील. या वक्तव्याचा आम्ही निषेध करीत आहोत. आम्हाला योजनेची घरे नको आहेत तर आमची हक्काची घरे वाचली पाहिजे. जर इतर आरक्षणे बदलता येतात तर हे आरक्षणसुद्धा शासनास बदलण्यास आपण भाग पाडू़- मानव कांबळे