शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हाताला काम नाही, जगायचे कसे? कामगार उपायुक्तालयाबाहेर 'ताटली सत्याग्रह'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 19:20 IST

कोरोनाच्या टाळेबंदी काळात हातावर पोट असलेला कामगार कसा जगेल याचा विचार सरकारने केला नाही.

ठळक मुद्देबेरोजगार कामगारांना २५ हजार व्यवसाय निधी द्यावा यांसह विविध मागण्या

पिंपरी : लॉकडाउनमुळे (टाळेबंदी) हाताला काम नाही, खायला अन्न नाही. सांगा आम्ही जगायचे कसे असा सवाल उपस्थित करीत असंघटीत कामगारांनी मंगळवारी (दि. ६) कामगार उपायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

दगडखाण असंघटित कामगार विकास परिषदेचे अध्यक्ष ऍड. बी. एम. रेगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. टाळेबंदी काळात हातावर पोट असलेला कामगार कसा जगेल याचा विचार सरकारने केला नाही. दिल्ली सरकारने कामगारांच्या खात्यावर पाच हजार जमा केळवे. पंजाबने साडेचार आणि उत्तरप्रदेश सरकारने एक हजार रुपये दिले. कामगारांची उपासमार थांबवण्यासाठी वीस किलो गहू आणि १५ किलो तांदूळ दिले गेले. राज्य सरकारने तसे केले नाही. महाराष्ट्र सरकारला बांधकाम क्षेत्रातून कर आणि गौण खनिजातून रॉयल्टी मिळते. राज्यात इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कर वर्ग होतो. तर गौण खनिज रॉयल्टी जिल्हा खनिज विकास निधीकडे वर्ग होते. बांधकाम कामगार मंडळाचा निधी कामगार कल्याणकारी योजनांसाठी वापरण्यास हरकत नसल्याचा निर्णय केंद्र सरकारने दिला आहे. मात्र, हा निधी कामगारांसाठी खर्च केला जात नाही. कोविडच्या पार्श्वभूमीवर असा निधी खर्च केला जावा असे रेगे यांनी सांगितले.

----------------

इतर प्रमुख मागण्या

- कल्याणकारी मंडळाचे पाच वर्षांचे सभासदत्व दरवर्षी नूतनीकरण करण्याची अट रद्द करावी

- कोरोना बाधित कामगारांना मोफत उपचार करावे

- बेरोजगार कामगारांना २५ हजार व्यवसाय निधी द्यावा

- कामगारांच्या दहावी, बारावी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना २५ हजार ते दोन लाख रुपये निधी द्यावा

-----

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारbusinessव्यवसाय