शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

"सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही येत नसतो, जेंव्हा ती मिळते..."; राज ठाकरेंचा राज्यकर्त्यांना टोला

By विश्वास मोरे | Updated: August 19, 2023 17:32 IST

पत्रकारांवर जर हल्ले झाले तर राज ठाकरे तुमच्यासोबत कायम असेल, असे आश्वासन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी प्राधिकरण येथे शनिवारी व्यक्त केले...

पिंपरी : जर एखादा हल्ला आमच्यावर झाला, तर त्याचा राग आम्हालाही येतो. त्यामुळे हल्ले कुणावरही होऊ नयेत. दुसरीकडे अजित पवार सत्तेमध्ये गेले, त्याचा तुम्हाला राग आला पाहिजे. ज्या व्यक्तीवर पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, तोच व्यक्ती सत्तेत जातो. तो व्यक्ती सडेतोड खोटे बोलतो, त्याला जर लोक हसत असतील, त्यांची प्रचंड चीड येते. पत्रकारांवर जर हल्ले झाले तर राज ठाकरे तुमच्यासोबत कायम असेल, असे आश्वासन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी प्राधिकरण येथे शनिवारी व्यक्त केले.

निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्डच्या वतीने पत्रकार हल्ला विरोधी व कायदा परिषद व पत्रकार हक्कासाठी लढणाºया राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव समारंभ झाला. त्यात ठाकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी अविनाश चिलेकर होते. यावेळी लोकमतचे संपादक संजय आवटे, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, पुढारीचे संपादक सुनील माळी, सीविक मिररचे संपादक अविनाश थोरात उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते कमलेश सुतार, गोविंद वाकडे, अमित मोडक, संदीप महाजन, अश्विनी सातव-डोके, नितीन पाटील, आशिष देशमुख, महेश तिवारी यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.तुमचे लेखन, तुम्ही कोणाला आवडता ते पाहत बसू नका

पक्षप्रमुख राज ठाकरे म्हणाले, ‘‘तुम्ही लिहिता, व्यक्त होता त्यानंतर तुम्हाला ट्रोल केले जाते. पण, ते तुम्ही वाचता कशाला? माझं भाषण, मुलाखत एकदा झाली की झाली. शब्द गेले की कोणाला काही वाटेल ते वाटेल.पत्रकारांवर हल्ले होत आहेत, हे अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे. तुमचे लेखन, तुम्ही कोणाला आवडता ते पाहत बसू नका. मोबईल नावाचं खेळणे हातात, आल्याने अनेक निरुद्योगी व्यक्त व्हायला लागले आहेत. त्यांना घरात बसून करायचं काय असा प्रश्न पडतो. मग असे ट्रोल केले जाते. त्यांना इतिहास, बातमीचा विषय, पत्रकारिती काही माहिती नसते. ते फक्त व्यक्त होतात. राजकीय पक्षांनी पाळलेले लोकही आहेतच. त्या पाळलेल्या लोकांवर कशाला प्रतिक्रिया देता. दर महिन्याला ते लिहायचे पैसे मिळतात. त्यांचा कशाला विचार करता. जे महाराष्ट्र हिताचे असेल ते निर्भिडपणे लिहिणे, बोलणे महत्वाचे आहे.’’

तुम्ही काहीही विचारणार असाल, तर मी राज ठाकरे आहे-

वृत्तवाहिन्यांच्या स्पर्धेविषयी टीका करताना ठाकरे म्हणाले, ‘‘माजी पंतप्रधान अटल बिहारीवाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी व्हायची. पण, मते मिळत नव्हते. मात्र, हळूहळू काळ बदलून गर्दी मतांमध्ये येत आहे. कोणतेही चढउतार न पाहता, पत्रकार म्हणून काहीही विचारतात. तुम्ही असेच काहीही विचारणार असाल तर मी राज ठाकरे आहे.’’ असेही सुनावले. भाजपाचे नाव न घेता ठाकरे म्हणाले, ‘‘सत्ताधारी पराभूत होत असतात, पण विरोधक विजय होत नसतात.’’ ‘‘

राजकारणाची भाषा घसरली-

ठाकरे म्हणाले, ‘‘ग्रामीण महाराष्ट्रात पत्रकार परिषदा घेऊच नये, असे वाटते. कारण, त्यांच्याकडे प्रश्नच नसतात. सध्या याला काय वाटतं. त्याला काय वाटत, तेच चालू आहे. वृत्तवाहिन्यांवर तेच सुरू आहे. उत्तम काम करणारे अनेक पत्रकार आहेत. मात्र, राजकारणाची भाषा घसरली आहे. राजकारणातील अनेक नेते वाह्यातपणे बोलत आहेत. कारण, तुम्ही त्यांना दाखवतात. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो. सत्ता ज्या दिवशी हातात येते, त्याच दिवशी ती जायला लागते. ती टिकवायची किती, तेवढचं तुमच्या हातात असतं. विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो. सत्ताधारी पक्ष हारत असतो.’’

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड