शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही येत नसतो, जेंव्हा ती मिळते..."; राज ठाकरेंचा राज्यकर्त्यांना टोला

By विश्वास मोरे | Updated: August 19, 2023 17:32 IST

पत्रकारांवर जर हल्ले झाले तर राज ठाकरे तुमच्यासोबत कायम असेल, असे आश्वासन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी प्राधिकरण येथे शनिवारी व्यक्त केले...

पिंपरी : जर एखादा हल्ला आमच्यावर झाला, तर त्याचा राग आम्हालाही येतो. त्यामुळे हल्ले कुणावरही होऊ नयेत. दुसरीकडे अजित पवार सत्तेमध्ये गेले, त्याचा तुम्हाला राग आला पाहिजे. ज्या व्यक्तीवर पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, तोच व्यक्ती सत्तेत जातो. तो व्यक्ती सडेतोड खोटे बोलतो, त्याला जर लोक हसत असतील, त्यांची प्रचंड चीड येते. पत्रकारांवर जर हल्ले झाले तर राज ठाकरे तुमच्यासोबत कायम असेल, असे आश्वासन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी प्राधिकरण येथे शनिवारी व्यक्त केले.

निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्डच्या वतीने पत्रकार हल्ला विरोधी व कायदा परिषद व पत्रकार हक्कासाठी लढणाºया राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव समारंभ झाला. त्यात ठाकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी अविनाश चिलेकर होते. यावेळी लोकमतचे संपादक संजय आवटे, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, पुढारीचे संपादक सुनील माळी, सीविक मिररचे संपादक अविनाश थोरात उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते कमलेश सुतार, गोविंद वाकडे, अमित मोडक, संदीप महाजन, अश्विनी सातव-डोके, नितीन पाटील, आशिष देशमुख, महेश तिवारी यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.तुमचे लेखन, तुम्ही कोणाला आवडता ते पाहत बसू नका

पक्षप्रमुख राज ठाकरे म्हणाले, ‘‘तुम्ही लिहिता, व्यक्त होता त्यानंतर तुम्हाला ट्रोल केले जाते. पण, ते तुम्ही वाचता कशाला? माझं भाषण, मुलाखत एकदा झाली की झाली. शब्द गेले की कोणाला काही वाटेल ते वाटेल.पत्रकारांवर हल्ले होत आहेत, हे अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे. तुमचे लेखन, तुम्ही कोणाला आवडता ते पाहत बसू नका. मोबईल नावाचं खेळणे हातात, आल्याने अनेक निरुद्योगी व्यक्त व्हायला लागले आहेत. त्यांना घरात बसून करायचं काय असा प्रश्न पडतो. मग असे ट्रोल केले जाते. त्यांना इतिहास, बातमीचा विषय, पत्रकारिती काही माहिती नसते. ते फक्त व्यक्त होतात. राजकीय पक्षांनी पाळलेले लोकही आहेतच. त्या पाळलेल्या लोकांवर कशाला प्रतिक्रिया देता. दर महिन्याला ते लिहायचे पैसे मिळतात. त्यांचा कशाला विचार करता. जे महाराष्ट्र हिताचे असेल ते निर्भिडपणे लिहिणे, बोलणे महत्वाचे आहे.’’

तुम्ही काहीही विचारणार असाल, तर मी राज ठाकरे आहे-

वृत्तवाहिन्यांच्या स्पर्धेविषयी टीका करताना ठाकरे म्हणाले, ‘‘माजी पंतप्रधान अटल बिहारीवाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी व्हायची. पण, मते मिळत नव्हते. मात्र, हळूहळू काळ बदलून गर्दी मतांमध्ये येत आहे. कोणतेही चढउतार न पाहता, पत्रकार म्हणून काहीही विचारतात. तुम्ही असेच काहीही विचारणार असाल तर मी राज ठाकरे आहे.’’ असेही सुनावले. भाजपाचे नाव न घेता ठाकरे म्हणाले, ‘‘सत्ताधारी पराभूत होत असतात, पण विरोधक विजय होत नसतात.’’ ‘‘

राजकारणाची भाषा घसरली-

ठाकरे म्हणाले, ‘‘ग्रामीण महाराष्ट्रात पत्रकार परिषदा घेऊच नये, असे वाटते. कारण, त्यांच्याकडे प्रश्नच नसतात. सध्या याला काय वाटतं. त्याला काय वाटत, तेच चालू आहे. वृत्तवाहिन्यांवर तेच सुरू आहे. उत्तम काम करणारे अनेक पत्रकार आहेत. मात्र, राजकारणाची भाषा घसरली आहे. राजकारणातील अनेक नेते वाह्यातपणे बोलत आहेत. कारण, तुम्ही त्यांना दाखवतात. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो. सत्ता ज्या दिवशी हातात येते, त्याच दिवशी ती जायला लागते. ती टिकवायची किती, तेवढचं तुमच्या हातात असतं. विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो. सत्ताधारी पक्ष हारत असतो.’’

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड