शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

"सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही येत नसतो, जेंव्हा ती मिळते..."; राज ठाकरेंचा राज्यकर्त्यांना टोला

By विश्वास मोरे | Updated: August 19, 2023 17:32 IST

पत्रकारांवर जर हल्ले झाले तर राज ठाकरे तुमच्यासोबत कायम असेल, असे आश्वासन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी प्राधिकरण येथे शनिवारी व्यक्त केले...

पिंपरी : जर एखादा हल्ला आमच्यावर झाला, तर त्याचा राग आम्हालाही येतो. त्यामुळे हल्ले कुणावरही होऊ नयेत. दुसरीकडे अजित पवार सत्तेमध्ये गेले, त्याचा तुम्हाला राग आला पाहिजे. ज्या व्यक्तीवर पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, तोच व्यक्ती सत्तेत जातो. तो व्यक्ती सडेतोड खोटे बोलतो, त्याला जर लोक हसत असतील, त्यांची प्रचंड चीड येते. पत्रकारांवर जर हल्ले झाले तर राज ठाकरे तुमच्यासोबत कायम असेल, असे आश्वासन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी प्राधिकरण येथे शनिवारी व्यक्त केले.

निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्डच्या वतीने पत्रकार हल्ला विरोधी व कायदा परिषद व पत्रकार हक्कासाठी लढणाºया राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव समारंभ झाला. त्यात ठाकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी अविनाश चिलेकर होते. यावेळी लोकमतचे संपादक संजय आवटे, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, पुढारीचे संपादक सुनील माळी, सीविक मिररचे संपादक अविनाश थोरात उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते कमलेश सुतार, गोविंद वाकडे, अमित मोडक, संदीप महाजन, अश्विनी सातव-डोके, नितीन पाटील, आशिष देशमुख, महेश तिवारी यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.तुमचे लेखन, तुम्ही कोणाला आवडता ते पाहत बसू नका

पक्षप्रमुख राज ठाकरे म्हणाले, ‘‘तुम्ही लिहिता, व्यक्त होता त्यानंतर तुम्हाला ट्रोल केले जाते. पण, ते तुम्ही वाचता कशाला? माझं भाषण, मुलाखत एकदा झाली की झाली. शब्द गेले की कोणाला काही वाटेल ते वाटेल.पत्रकारांवर हल्ले होत आहेत, हे अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे. तुमचे लेखन, तुम्ही कोणाला आवडता ते पाहत बसू नका. मोबईल नावाचं खेळणे हातात, आल्याने अनेक निरुद्योगी व्यक्त व्हायला लागले आहेत. त्यांना घरात बसून करायचं काय असा प्रश्न पडतो. मग असे ट्रोल केले जाते. त्यांना इतिहास, बातमीचा विषय, पत्रकारिती काही माहिती नसते. ते फक्त व्यक्त होतात. राजकीय पक्षांनी पाळलेले लोकही आहेतच. त्या पाळलेल्या लोकांवर कशाला प्रतिक्रिया देता. दर महिन्याला ते लिहायचे पैसे मिळतात. त्यांचा कशाला विचार करता. जे महाराष्ट्र हिताचे असेल ते निर्भिडपणे लिहिणे, बोलणे महत्वाचे आहे.’’

तुम्ही काहीही विचारणार असाल, तर मी राज ठाकरे आहे-

वृत्तवाहिन्यांच्या स्पर्धेविषयी टीका करताना ठाकरे म्हणाले, ‘‘माजी पंतप्रधान अटल बिहारीवाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी व्हायची. पण, मते मिळत नव्हते. मात्र, हळूहळू काळ बदलून गर्दी मतांमध्ये येत आहे. कोणतेही चढउतार न पाहता, पत्रकार म्हणून काहीही विचारतात. तुम्ही असेच काहीही विचारणार असाल तर मी राज ठाकरे आहे.’’ असेही सुनावले. भाजपाचे नाव न घेता ठाकरे म्हणाले, ‘‘सत्ताधारी पराभूत होत असतात, पण विरोधक विजय होत नसतात.’’ ‘‘

राजकारणाची भाषा घसरली-

ठाकरे म्हणाले, ‘‘ग्रामीण महाराष्ट्रात पत्रकार परिषदा घेऊच नये, असे वाटते. कारण, त्यांच्याकडे प्रश्नच नसतात. सध्या याला काय वाटतं. त्याला काय वाटत, तेच चालू आहे. वृत्तवाहिन्यांवर तेच सुरू आहे. उत्तम काम करणारे अनेक पत्रकार आहेत. मात्र, राजकारणाची भाषा घसरली आहे. राजकारणातील अनेक नेते वाह्यातपणे बोलत आहेत. कारण, तुम्ही त्यांना दाखवतात. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो. सत्ता ज्या दिवशी हातात येते, त्याच दिवशी ती जायला लागते. ती टिकवायची किती, तेवढचं तुमच्या हातात असतं. विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो. सत्ताधारी पक्ष हारत असतो.’’

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड