शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणास विरोध करणाऱ्यांना सुट्टी नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By विश्वास मोरे | Updated: April 7, 2024 14:57 IST

कोणाच्याही सभेला जायचं नाही कोणाचाही प्रचार करायचा नाही, मुलाबाळांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवा - जरांगे पाटील

पिंपरी: पुढील दोन महिने आपल्याकडे पोळा आहे. तो कसला सर्वांना माहित आहे. आरक्षणास विरोध करणाऱ्यांना आता सुट्टी नाही. पोळा सुरु झालाय भुलून जाऊ नका. कोणाच्याही सभेला जायचं नाही कोणाचाही प्रचार करायचा नाही. मुलाबाळांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवा. जो आपल्या मुलांचा तो तो आपला, असे परखड मत मराठा समाजाचे नेते मनोज रंगे पाटील यांनी रुपीनगर तळवडे येथे व्यक्त केले.

रुपीनगर तळवडे येथील मराठवाडा युवा मंच अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. रविवारी सकाळी साडे दहाला त मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. तळवडे कडून रुपीनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरून ज्योतिबानगरपर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. 

जरांगे पाटील म्हणाले,  आजचे व्यासपीठ हे वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे आज या व्यासपीठावर मी कोणत्या जाती धर्माचं बोलणार नाही. खरे तर, हा देहू आळंदीचा परिसर हा पवित्र परिसर आहे. या ठिकाणी मला बोलावलं त्याबद्दल सर्वांचे आभार. वारकरी संप्रदाय हा असा एकमेव सांप्रदाय आहे की त्या संप्रदायामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन वाटचाल करत असतात. त्यामुळे आज मी एका जातीचं बोलणार नाही. सर्वधर्मसमभावाचा मूलमंत्र वारकरी संप्रदायाने दिला आहे. वारकरी संप्रदायाचा आहे. मलाही वारकरी संप्रदायाचा अभिमान आहे तसेच  हिंदू धर्माचा गर्व आणि अभिमान आहे. गरिबांच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य आनंद आणण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सर्वांनी एकजूट राहू द्या. वारकरी संप्रदायातील सर्व महाराज किर्तन प्रवचनांमधून आपली भूमिका मांडत आहेत. पाठीशी आहेत. त्यामुळे आपण कोणालाही घाबरण्याचं कारण नाही समाजात एकजूट ठेवा.''

दुसऱ्या व्यासपीठावर बोलवा मग सांगतो कोण आडवा येते ते?

जरांगे पाटील म्हणाले, हे धार्मिक व्यासपीठ आहे. त्यामुळे या ठिकाणी मी इतर कोणतीही गोष्ट बोलणार नाही. इतर ठिकाणी मला बोलवा.मग मी आरक्षण काय आहे, कसे आहे, कोण कोण आडवं येत आहे आणि त्यांना कसं नीट करायचं हे सगळे सांगतो. मी अन्याय विरुद्ध लढत आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम या ठिकाणी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने काम करायचं आहे.

दोन महिने पोळा, नादी लागू नका

जरांगे पाटील निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणाले, पोळा सुरू झाला आहे. तुमच्याकडेही असेल दोन महिने कुणाच्याही नादी लागू नका. भूलून जाऊ नका, तुमच्या डोक्यात रक्तात एकच विषय असला पाहिजे तो म्हणजे आरक्षणाचा. एकजूट अशीच ठेवा कोणाच्याही सभेला जाऊ नका. कोणाचाही प्रचार करू नका, जो आरक्षणाच्या  बाजूने असेल तो आपला. इतरांचा विचार करण्याची गरज नाही.''

 

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलlok sabhaलोकसभाMaratha Reservationमराठा आरक्षणPoliticsराजकारणElectionनिवडणूक