शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आरक्षणास विरोध करणाऱ्यांना सुट्टी नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By विश्वास मोरे | Updated: April 7, 2024 14:57 IST

कोणाच्याही सभेला जायचं नाही कोणाचाही प्रचार करायचा नाही, मुलाबाळांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवा - जरांगे पाटील

पिंपरी: पुढील दोन महिने आपल्याकडे पोळा आहे. तो कसला सर्वांना माहित आहे. आरक्षणास विरोध करणाऱ्यांना आता सुट्टी नाही. पोळा सुरु झालाय भुलून जाऊ नका. कोणाच्याही सभेला जायचं नाही कोणाचाही प्रचार करायचा नाही. मुलाबाळांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवा. जो आपल्या मुलांचा तो तो आपला, असे परखड मत मराठा समाजाचे नेते मनोज रंगे पाटील यांनी रुपीनगर तळवडे येथे व्यक्त केले.

रुपीनगर तळवडे येथील मराठवाडा युवा मंच अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. रविवारी सकाळी साडे दहाला त मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. तळवडे कडून रुपीनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरून ज्योतिबानगरपर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. 

जरांगे पाटील म्हणाले,  आजचे व्यासपीठ हे वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे आज या व्यासपीठावर मी कोणत्या जाती धर्माचं बोलणार नाही. खरे तर, हा देहू आळंदीचा परिसर हा पवित्र परिसर आहे. या ठिकाणी मला बोलावलं त्याबद्दल सर्वांचे आभार. वारकरी संप्रदाय हा असा एकमेव सांप्रदाय आहे की त्या संप्रदायामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन वाटचाल करत असतात. त्यामुळे आज मी एका जातीचं बोलणार नाही. सर्वधर्मसमभावाचा मूलमंत्र वारकरी संप्रदायाने दिला आहे. वारकरी संप्रदायाचा आहे. मलाही वारकरी संप्रदायाचा अभिमान आहे तसेच  हिंदू धर्माचा गर्व आणि अभिमान आहे. गरिबांच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य आनंद आणण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सर्वांनी एकजूट राहू द्या. वारकरी संप्रदायातील सर्व महाराज किर्तन प्रवचनांमधून आपली भूमिका मांडत आहेत. पाठीशी आहेत. त्यामुळे आपण कोणालाही घाबरण्याचं कारण नाही समाजात एकजूट ठेवा.''

दुसऱ्या व्यासपीठावर बोलवा मग सांगतो कोण आडवा येते ते?

जरांगे पाटील म्हणाले, हे धार्मिक व्यासपीठ आहे. त्यामुळे या ठिकाणी मी इतर कोणतीही गोष्ट बोलणार नाही. इतर ठिकाणी मला बोलवा.मग मी आरक्षण काय आहे, कसे आहे, कोण कोण आडवं येत आहे आणि त्यांना कसं नीट करायचं हे सगळे सांगतो. मी अन्याय विरुद्ध लढत आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम या ठिकाणी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने काम करायचं आहे.

दोन महिने पोळा, नादी लागू नका

जरांगे पाटील निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणाले, पोळा सुरू झाला आहे. तुमच्याकडेही असेल दोन महिने कुणाच्याही नादी लागू नका. भूलून जाऊ नका, तुमच्या डोक्यात रक्तात एकच विषय असला पाहिजे तो म्हणजे आरक्षणाचा. एकजूट अशीच ठेवा कोणाच्याही सभेला जाऊ नका. कोणाचाही प्रचार करू नका, जो आरक्षणाच्या  बाजूने असेल तो आपला. इतरांचा विचार करण्याची गरज नाही.''

 

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलlok sabhaलोकसभाMaratha Reservationमराठा आरक्षणPoliticsराजकारणElectionनिवडणूक