शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अक्षतांमधून धान्य नासाडी, तांदूळ व ज्वारीऐवजी फुलांचा वापर होण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 3:47 AM

लग्न म्हटले की, कुणाच्याही तोंडून सहज निघते चला चार अक्षता टाकून येऊ. परंतु, या चार अक्षता पाहता पाहता चार किलो ते चाळीस किलोच्या घरात जातात, हे कुणाच्याच ध्यानी मनी येत नाही.

रहाटणी -  लग्न म्हटले की, कुणाच्याही तोंडून सहज निघते चला चार अक्षता टाकून येऊ. परंतु, या चार अक्षता पाहता पाहता चार किलो ते चाळीस किलोच्या घरात जातात, हे कुणाच्याच ध्यानी मनी येत नाही. आज वाढती महागाई व जाणवत असलेली अन्नाची टंचाई यामुळे सर्वसामान्यांना धान्य मिळणे कठीण झाले आहे. यामुळे येणा-या युवा पिढीवर याच चार अक्षतांचे दाणे वाचविण्याची वेळ आली आहे.या चार दाण्यातून कुणाच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होऊ शकते, हे समजून घेण्याची नितांत गरज आहे. लग्नात वरवधूच्या मस्तकावर अक्षता टाकण्याची पद्धत प्राचीन काळापासून सुरू आहे. यामागचे नेमके कारण कुणालाही माहीत नाही. पूर्वांपार चालत आलेली ही परंपरा आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि ज्वारी या धान्याची नासाडी होते, हे सर्वांना कळते. मात्र वळत नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.सध्याच्या धावपळीच्या व महागाईच्या जमान्यात अनेक कुटुंब असे आहेत की आहे त्या अन्नाचे काय करायचे तर काही कुटुंब असे आहेत की एका वेळच्या जेवणाच्या अन्नासाठी काय करायचे अशी परिस्थिती आहे़ मात्र आपल्याकडे रूढी परंपरेच्या नावाखाली शेकडो किलो अन्न वाया जात आहे. हेच अन्न एखाद्या गरजवंताच्या मुखात गेले तर तो त्या नवदांपत्यास आशीर्वादच देतील. जर आपल्या देशाचा विचार केला तर लग्नातील अक्षदांच्या नावाखाली वर्षाला हजारो किलो अन्न वाया जाते यात शंका नाही. खरे तर समाजातील विचारवंतांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे़ वाया जाण्यापेक्षा एखाद्याच्या मुखात गेले तर तो संतुष्ट तर होईल.धान्याची नासाडी थांबविण्याची अपेक्षादेशात अनेक कुटुंबाना एक वेळच्या जेवणासाठी वणवण भटकावेलागत आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार लग्न समारंभात ज्वारी किंवातांदूळ अक्षता म्हणून वापरले जाते़ मात्र हे सर्व धान्य वायाच जाते. याचा फायदा कोणालाही होत नाही. त्यामुळे धान्य वाया घालण्या पेक्षा लग्न समारंभात फुलांचा वापर केल्यास देशातील बºयाच धान्याची नासाडी होणार नाही़ व ते पुढे उपयोगी येईल, अशी अपेक्षा काही सामाजिक संघटना व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र