शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मराठवाड्याचा विचार करण्याची गरज - संभाजी निलंगेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 01:36 IST

सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने मराठवाड्याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी पिंपळे गुरव येथे व्यक्त केले.

पिंपळे गुरव -  मागासलेल्या मराठवाड्यातील प्रत्येक गावातील तरुणांचा ओढा शहराकडे.., स्वातंत्र्य मिळाले तेही उशिरा.., कमी पाऊस म्हणून ओळख..., रोजगार कमी..., दुष्काळी भाग..., आदीबाबत सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने मराठवाड्याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी पिंपळे गुरव येथे व्यक्त केले. येथील निळूभाऊ नाट्यगृहात मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती व मराठवाडा जनविकास संघाने आयोजित केलेल्या ७०व्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कार्यक्रमामध्ये निलंगेकर बोलत होते.निलंगेकर म्हणाले, ‘‘राज्यात कोळसा, तेल, इंधनाच्या अनेक खाणी आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यात ज्ञानाची खाण आहे. त्यामुळे भविष्यात काही कमी पडणार नाही. मराठवाड्यातील मुलांचे यापुढे शहराकडे स्थलांतर होणारनाही. नैसर्गिक संकट येणार नाही. यासाठी दुष्काळमुक्त अभियान सुरु आहे. यासाठी मी काळजी घेणार आहे.’’क्रांतिकारक व केरळ पूरग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी आमदार महेश लांडगे, विभागीय आयुक्त दीपक मैसेकर, झोन चारचे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्नाऊ, लातूरचे माजी आमदार शिवाजी कवेकर, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले, हभप शिवानंदमहाराज, हभप तुकाराममहाराज, हभप वाघमहाराज, माजी उपमहापौर शैलजा मोरे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, सागर अंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, गोपाळ मळेकर, नगरसेविका उषा मुंढे, माधवी राजापुरे, शारदा सोनवणे आदी उपस्थित होत्या.भाऊसाहेब जाधव, गौतम पंडागळे, भूषण कदम, अण्णा जोगदंड, रमाकांत जाधव, शांतिलाल मुथ्था आदींना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ यासह समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैष्णवी भोसलेच्या भारुडास व कृष्णाई केळकर यांचा महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमास रसिकांनी दाद दिली. संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संपत गर्जे यांनी सूत्रसंचलन केले. शिवाजी धोंगडे यांनी आभार मानले.तोलून-मोलून बोलामलाही खूप बोलता येते. मात्र उत्साहाच्या भरात तोलून-मोलून बोलले पाहिजे अन्यथा जाहीर माफी मागावी लागते. परिणाम भोगावे लागतात. त्यासाठी मी जाहीर भाषणातच रसिकांची माफी मागतो. कार्यकर्त्यांनी जास्त बोलण्याऐवजी ‘जयहिंद जय महाराष्ट्र’ म्हणावे, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी कार्यकर्त्यांना दिली.

टॅग्स :Marathwadaमराठवाडाnewsबातम्या