शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मराठवाड्याचा विचार करण्याची गरज - संभाजी निलंगेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 01:36 IST

सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने मराठवाड्याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी पिंपळे गुरव येथे व्यक्त केले.

पिंपळे गुरव -  मागासलेल्या मराठवाड्यातील प्रत्येक गावातील तरुणांचा ओढा शहराकडे.., स्वातंत्र्य मिळाले तेही उशिरा.., कमी पाऊस म्हणून ओळख..., रोजगार कमी..., दुष्काळी भाग..., आदीबाबत सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने मराठवाड्याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी पिंपळे गुरव येथे व्यक्त केले. येथील निळूभाऊ नाट्यगृहात मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती व मराठवाडा जनविकास संघाने आयोजित केलेल्या ७०व्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कार्यक्रमामध्ये निलंगेकर बोलत होते.निलंगेकर म्हणाले, ‘‘राज्यात कोळसा, तेल, इंधनाच्या अनेक खाणी आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यात ज्ञानाची खाण आहे. त्यामुळे भविष्यात काही कमी पडणार नाही. मराठवाड्यातील मुलांचे यापुढे शहराकडे स्थलांतर होणारनाही. नैसर्गिक संकट येणार नाही. यासाठी दुष्काळमुक्त अभियान सुरु आहे. यासाठी मी काळजी घेणार आहे.’’क्रांतिकारक व केरळ पूरग्रस्तांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी आमदार महेश लांडगे, विभागीय आयुक्त दीपक मैसेकर, झोन चारचे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्नाऊ, लातूरचे माजी आमदार शिवाजी कवेकर, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले, हभप शिवानंदमहाराज, हभप तुकाराममहाराज, हभप वाघमहाराज, माजी उपमहापौर शैलजा मोरे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, सागर अंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, गोपाळ मळेकर, नगरसेविका उषा मुंढे, माधवी राजापुरे, शारदा सोनवणे आदी उपस्थित होत्या.भाऊसाहेब जाधव, गौतम पंडागळे, भूषण कदम, अण्णा जोगदंड, रमाकांत जाधव, शांतिलाल मुथ्था आदींना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ यासह समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैष्णवी भोसलेच्या भारुडास व कृष्णाई केळकर यांचा महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमास रसिकांनी दाद दिली. संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संपत गर्जे यांनी सूत्रसंचलन केले. शिवाजी धोंगडे यांनी आभार मानले.तोलून-मोलून बोलामलाही खूप बोलता येते. मात्र उत्साहाच्या भरात तोलून-मोलून बोलले पाहिजे अन्यथा जाहीर माफी मागावी लागते. परिणाम भोगावे लागतात. त्यासाठी मी जाहीर भाषणातच रसिकांची माफी मागतो. कार्यकर्त्यांनी जास्त बोलण्याऐवजी ‘जयहिंद जय महाराष्ट्र’ म्हणावे, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी कार्यकर्त्यांना दिली.

टॅग्स :Marathwadaमराठवाडाnewsबातम्या