शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज

By admin | Updated: November 9, 2016 02:41 IST

यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रचंड कष्टाची आवश्यकता आहे़ त्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी असणे गरजेचे आहे़ अंतिम ध्येय गाठल्यानंतरही ज्यांचे पाय

चिंचवड : यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रचंड कष्टाची आवश्यकता आहे़ त्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी असणे गरजेचे आहे़ अंतिम ध्येय गाठल्यानंतरही ज्यांचे पाय जमिनीवर असतात़ अशांचा गौरव होतो़ त्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत काम करणे महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ़ प्ऱ चिं़ शेजवलकर यांनी व्यक्त केले़ महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या भारतरत्न जे़ आऱ डी़ टाटा उद्योग पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते़ अॉटो क्लस्टर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या वेळी कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून मनोहर पारळकर उपस्थित होते़ या प्रसंगी डायनामिक कंट्रोल भोसरीचे किशोर राऊत यांना भारतरत्न जे़ आऱ डी़ टाटा उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर उद्योजक एस़ जी़ शिरूरे यांना उद्योग विकासरत्न, दत्तात्रय कोठारे यांना कृषी उद्योग विभूषण, रवींद्र कल्याणकर, दयानंद कोटे यांना उद्योगभूषण आणि शोभा माने यांना उद्योगसखी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ डॉ़ शेजवलकर म्हणाले,‘‘ जगातील चांगली माणसे दुर्मिळ होत चालली आहेत़ मात्र आपण सुंदर जगाकडे जायला पाहिजे़ अमेरिका देशासारखी निवडणूक यंत्रणा राबविली पाहिजे, असे मत व्यक्त केले़ तसेच देशातील महिला अनेक क्षेत्रांत आघाडीवर आहेत़ त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे़ देशातील साक्षरता वाढली पाहिजे़’’ पुरस्कारप्राप्त उद्योजकांनी संवाद साधला. पुरस्कारप्राप्त उद्योजकांच्या यशात परिवाराचा, कुटुंबाचा मोठा वाटा आहे़ सामाजिक बांधिलकी जपत काम करणारे उद्योजक देशाची शान वाढवितात, असे मत मनोहर पारळकर यांनी व्यक्त केले़ प्रा़ दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले़ संघटनेचे अध्यक्ष बथवेल बलीद, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, जयवंत भोसले, हनुमंत देशमुख, राजेंद्र वाघ उपस्थित होते़(वार्ताहर)