शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसराला स्वतंत्र टाउनशिप जाहीर करण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 01:09 IST

ज्या उद्योगांमुळे पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिकनगरी म्हणून ओळख निर्माण झाली, या उद्योगांना पायभूत सुविधा पुरविण्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेसह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे.

पिंपरी : ज्या उद्योगांमुळे पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिकनगरी म्हणून ओळख निर्माण झाली, या उद्योगांना पायभूत सुविधा पुरविण्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेसह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेला सर्वाधिक महसूल औद्योगिक क्षेत्रातून मिळत असताना त्यापैकी दहा टक्के रक्कमही महापालिका औद्योगिक क्षेत्रासाठी खर्च करीत नाही. त्यामुळे औद्योगिक परिसराला पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासह उद्योजकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसराला स्वतंत्र टाउनशिप जाहीर करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर केली.पिंपरी-चिंचवड शहरातील लघुउद्योजकांना निर्माण होणाºया समस्या, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासह महापालिका, महावितरण यासह शासनाकडून पुरविल्या जाणाºया सुविधा आदी विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली.यामध्ये लघुउद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींसह सदस्यांनी सहभाग नोंदविला. या वेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, एस. जे. सातव, नवनाथ वायाळ, अनुप मोदी, एस. एस. कोलते, प्रणीता कोलते, सुनील जाधव, शरद काळे, विकास नाईकरे, प्रदीप गायकवाड, अशोक पाटील, संजय तिरकाळे, विजय भिलावडे, प्रमोद रारे, एच. एस. इंगळे, संजय वावळे, राजेशा महाडिक, एस. व्ही़ सराट, विनोद मित्तल, एस. जी. शिंदे, अनिल कांकरिया, एस. एस. पिसाळ या उद्योजकांनी विविध विषयांवर मत मांडले.औद्योगिक कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे कसलीही यंत्रणा नाही. यासाठी कचरा उचलण्यासह कचरा विलगीकरण केंद्र उभारावेत. औद्योगिक क्षेत्रात मलनिस्सारण यंत्रणा नसतानाही महापालिका मिळकतकरात ४ टक्के मलनिस्सारण कर आकारते. या सुविधेची मागणी केल्यास महापालिका एमआयडीसीकडे बोट दाखविते. यासाठी भुयारी गटार योजना राबविण्यासह मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारून त्यांना एमआयडीसीमधील सर्व नाले जोडावेत, त्यामुळे नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी या वेळी करण्यात आली.निवासी भागातील उद्योगांचे औद्योगिक भागात पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेकडून टी २०१ पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला. मात्र, हा प्रकल्प २५ वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पात गाळे मिळण्यासाठी दहा वर्षांपूर्वी १४५ उद्योजकांनी बुकिंग रक्कमही भरली असतानाही अद्याप गाळे मिळालेले नाहीत. हे गाळे तातडीने मिळावेत.एमआयडीसीच्या जागेवरील अनधिकृत झोपडपट्टी हटवून ही जागा लघुउद्योगांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.आद्योगिक परिसरातील अनेक वीजवाहक तारा ४५ वर्षे जुन्या झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे नवीन वीजवाहक तारा बसविण्यासह डीपी बॉक्सही नवीन बसवावेत, अशी मागणी होत आहे. यासह इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज दर २५ ते ३५ टक्के अधिक असून, ही वीजदर वाढ तातडीने रद्द करावी.दरम्यान, औद्योगिक परिसरात पायाभूत सुविधा पुरविण्यासह उद्योजकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी औद्योगिक परिसराला स्वतंत्र टाउनशिप जाहीर केल्यास उद्योजकांसाठी अधिक सोयीचे होईल. तसेच या परिसराचा अधिक विकास होईल, असा मुद्दा या वेळी उद्योजकांनी उपस्थित केला.स्वयंघोषित माथाडी संघटनापिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात अनेक स्वयंघोषित अनधिकृत माथाडी कामगार संघटना कार्यरत असून, या संघटना कंपनी मालकांना जमावाने येऊन पैशांसाठी धमकावितात. त्यांच्या माणसांना कामावर ठेवण्यासाठी दबाव आणतात. वास्तविकता उद्योग क्षेत्रात मोठ्या अवजड सामग्रीसाठी क्रेनसारखी मोठी साधने वापरली जातात त्याठिकाणी माथाडी कामगाराची आवश्यकता नसते. परंतु माथाडी कामगार कायद्यात कंपनी (फॅक्टर) शब्द असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन या संघटना उद्योगांना त्रास देतात. यासाठी माथाडी कामगार कायद्यातील फॅक्टरी हा शब्द वगळून उद्योजकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.शास्तीबाबत तोडगा काढण्याची मागणीमहापालिकेने औद्योगिक परिसरातील २००८ नंतरच्या मिळकतींना शास्ती कर लावला आहे. या कराबाबत महापालिकेने योग्य तो तोडगा तातडीने काढावा. यासह औद्योगिक परिसरात अग्निशमन केंद्र नाही. यासाठी पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात एमआयडीसीने स्वत:चे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारावे, असाही मुद्दा या वेळी मांडण्यात आला. एमआयडीसी परिसरात चोरट्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून, उद्योजकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या परिसरात चोºयांचे प्रमाण वाढले असून, चोरट्यांच्या टोळ्या सुरक्षारक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून कंपनीमधील माल चोरतात. पोलीस ठाण्यात तक्रारी करूनही चोर सापडत नाही व मुद्देमालही परत मिळत नाही. रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणाºया कामगाराला लुटण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करूनही चोºयांचे प्रमाण कमी झालेले नाही. यासाठी औद्योगिक परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी या वेळी उद्योजकांकडून करण्यात आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड