शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

मुंबई-पुणे महामार्ग : थांबणाऱ्या वाहनांमुळे अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 03:08 IST

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर थांबणारी अवजड वाहने, अपघातग्रस्त वाहने, तसेच बंद पडलेल्या नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होऊन अनेकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने तसेच अपघातग्रस्त वाहने वेळेवर बाजूला न केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अपघातासही कारणीभूत ठरत आहेत.

कामशेत : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर थांबणारी अवजड वाहने, अपघातग्रस्त वाहने, तसेच बंद पडलेल्या नादुरुस्त वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होऊन अनेकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने तसेच अपघातग्रस्त वाहने वेळेवर बाजूला न केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अपघातासही कारणीभूत ठरत आहेत.जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर तसेच रस्त्याच्या बाजूला मोठी अवजड वाहने रांगेत उभी असतात. महामार्गाशेजारी असणा-या हॉटेल, ढाबा व इतरत्र थांबलेल्या या वाहनांची संख्या अधिक असते. या वाहनांमुळे महामार्गावरून धावणाºया इतर वाहनांसाठी रस्ता अरुंद होतो, रस्त्याचा अंदाज येत नाही. विशेषत: या थांबलेल्या वाहनांमुळे दुचाकीस्वारांसाठी मोठी अडचण निर्माण होत असून, अपघात होत आहेत. याकडे रस्ते महामंडळ व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महामार्गावर प्रवासादरम्यान आजपर्यंत अनेकांचे निष्कारण बळी गेले आहेत.महामार्गावर थांबलेल्या वाहनांवर दुसरे एखादे वाहन धडकून एखादा अपघात झाला की ही वाहने बाजूला केली जातात. तसेच नादुरुस्त वाहने भर रस्त्यावर उभी राहत असून येथे कोणत्याही प्रकारच्या सूचना अथवा फलक लावले जात नाहीत. वाहनाच्या मागील बाजूस एखाद्या झाडाची फांदी लटकावून ठेवली जाते. मात्र क्रेन अथवा इतर मार्गाने ते वाहन रस्त्यामधून बाजूला केले जात नाही.याचप्रमाणे महामार्गाच्या साईड पट्ट्यांवर उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे इतर वाहनचालकांना त्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. यातूनही अनेकदा किरकोळ अपघात घडत असतात. कामशेतमधील पवनानगर फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक सेवारस्त्याने वळविण्यात आली आहे. या सेवारस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी अनेक अवजड व इतर वाहने उभी असतात. अगोदरच अरुंद असलेला सेवारस्ता त्यामुळे आणखी अरुंद होत असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. यातूनच किरकोळ व मोठे अपघात नेहमीच घडत असून या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात नाही.

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेPuneपुणेnewsबातम्या