शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

मध्यावधी निवडणुकीचे पिलू आमचे नव्हेच!

By admin | Updated: July 27, 2015 03:51 IST

विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे मान्य केले होते.

पिंपरी : विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे मान्य केले होते. मध्यावधी होणार हे पिलू आम्ही सोडलेले नाही. हे सरकार किती दिवस एकत्रितपणे चालवायचे हा सेना-भाजपचा प्रश्न आहे. ते जातीयवादी आणि आम्ही फुले-शाहू-आंबेडकर विचाराचे आहोत. युती ही समविचारी लोकांची होते, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले. युतीतून शिवसेना बाहेर पडली, तर भाजपाला पाठिंबा देणार का? या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. त्या वेळी पुन्हा निवडणुका परवडणारे नसल्याने महाराष्ट्राच्या भल्यासाठी, विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याचे मान्य केले होते. मात्र, शिवसेनेबरोबर त्यांची युती झाली. मला वाटते, आघाडी ही समविचारी पक्षांची होत असते. त्यांचे आणि आमचे विचार वेगवेगळे आहेत. अच्छे दिनची जादू किती दिवस चालणार यावर युती टिकणार आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. असे जरी असले, तरी हा सर्व खेळ जनता पाहत आहे. मध्यावधीचे आम्ही कोणतेही पिलू सोडलेले नाही.’’केंद्राकडे पाठपुरावा करणारविकासकामांत आम्ही राजकारण करीत नाही. सत्तेत असताना सध्याच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचीही कामे केली आहेत, असे सांगून पवार म्हणाले, ‘‘पवनासुधार, मेट्रो, रिंगरोडसाठी पाठपुरावा करणार आहे. मुळा, मुठा, इंद्रायणी नद्यांचे पर्यावरण चांगले राहावे, तसेच पवनासुधारसाठी पर्यावरणमंत्री जावडेकरांना भेटणार आहे.’’ बंद जलवाहिनीबाबत न्यायालय निर्णयाचे पालन व्हावेपवार म्हणाले, ‘‘पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविताना विरोध झाला. योग्यप्रकारे या योजनेबाबत विचार आणि चर्चा न झाल्याने त्या विरोधात आंदोलन झाले. त्यात शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला. त्याचे निवडणुकीमध्ये राजकारणही केले. या संदर्भात उच्च न्यायालयात दावा सुरू होता. या विषयी न्यायालयाने ज्या सूचना केल्या आहेत. बारापैकी आठ महिने बंदिस्त जलवाहिनीद्वारे आणि उर्वरित चार महिने नदीतून पाणी उचलावे, असा निर्णय दिला आहे. त्याचे पालन व्हावे.’’मेनन फाशीत राजकारण आणू नयेअतिरेकी कारवायाबाबतचा देशद्रोहाचा गुन्हा सिद्ध झाला असेल आणि याकूब मेननविषयी उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असेल, तर त्याची अंमलबजावणी करायलाच हवी. त्यात कोणतेही राजकारण आणता कामा नये, असेही पवार म्हणाले. (वार्ताहर)