शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

मध्यावधी निवडणुकीचे पिलू आमचे नव्हेच!

By admin | Updated: July 27, 2015 03:51 IST

विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे मान्य केले होते.

पिंपरी : विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे मान्य केले होते. मध्यावधी होणार हे पिलू आम्ही सोडलेले नाही. हे सरकार किती दिवस एकत्रितपणे चालवायचे हा सेना-भाजपचा प्रश्न आहे. ते जातीयवादी आणि आम्ही फुले-शाहू-आंबेडकर विचाराचे आहोत. युती ही समविचारी लोकांची होते, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले. युतीतून शिवसेना बाहेर पडली, तर भाजपाला पाठिंबा देणार का? या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. त्या वेळी पुन्हा निवडणुका परवडणारे नसल्याने महाराष्ट्राच्या भल्यासाठी, विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याचे मान्य केले होते. मात्र, शिवसेनेबरोबर त्यांची युती झाली. मला वाटते, आघाडी ही समविचारी पक्षांची होत असते. त्यांचे आणि आमचे विचार वेगवेगळे आहेत. अच्छे दिनची जादू किती दिवस चालणार यावर युती टिकणार आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. असे जरी असले, तरी हा सर्व खेळ जनता पाहत आहे. मध्यावधीचे आम्ही कोणतेही पिलू सोडलेले नाही.’’केंद्राकडे पाठपुरावा करणारविकासकामांत आम्ही राजकारण करीत नाही. सत्तेत असताना सध्याच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचीही कामे केली आहेत, असे सांगून पवार म्हणाले, ‘‘पवनासुधार, मेट्रो, रिंगरोडसाठी पाठपुरावा करणार आहे. मुळा, मुठा, इंद्रायणी नद्यांचे पर्यावरण चांगले राहावे, तसेच पवनासुधारसाठी पर्यावरणमंत्री जावडेकरांना भेटणार आहे.’’ बंद जलवाहिनीबाबत न्यायालय निर्णयाचे पालन व्हावेपवार म्हणाले, ‘‘पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविताना विरोध झाला. योग्यप्रकारे या योजनेबाबत विचार आणि चर्चा न झाल्याने त्या विरोधात आंदोलन झाले. त्यात शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला. त्याचे निवडणुकीमध्ये राजकारणही केले. या संदर्भात उच्च न्यायालयात दावा सुरू होता. या विषयी न्यायालयाने ज्या सूचना केल्या आहेत. बारापैकी आठ महिने बंदिस्त जलवाहिनीद्वारे आणि उर्वरित चार महिने नदीतून पाणी उचलावे, असा निर्णय दिला आहे. त्याचे पालन व्हावे.’’मेनन फाशीत राजकारण आणू नयेअतिरेकी कारवायाबाबतचा देशद्रोहाचा गुन्हा सिद्ध झाला असेल आणि याकूब मेननविषयी उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असेल, तर त्याची अंमलबजावणी करायलाच हवी. त्यात कोणतेही राजकारण आणता कामा नये, असेही पवार म्हणाले. (वार्ताहर)