शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

अंदर मावळ चार दिवस अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 06:19 IST

मावळात गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भरमसाठ वीजबिल वेळेवर भरूनही ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

कामशेत - मावळात गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भरमसाठ वीजबिल वेळेवर भरूनही ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. वीजवितरण महामंडळाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून, या भागालाच दुजाभावाची वागणूक का दिली जाते, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. सध्या दहावीची परीक्षा सुरू असून अंदर मावळात मागील चार दिवसांपासून वीज नसल्याने विद्यार्थ्यांवर मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करण्याची वेळ आली आहे.मागील काही महिन्यांपासून नाणे, पवन, अंदर मावळासह कामशेत शहरात वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार वाढले असून, काही दुर्गम गावांमध्ये वीज गेल्यानंतर ती दोन दोन दिवस येत नाही. वीज महामंडळाने भारनियमन नसताना अघोषित भारनियमन सुरू केले आहे. यामुळे नागरिकांसह अनेक दुकानदार त्रस्त झाले आहेत. गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद केला जातो. त्या शिवाय आठवड्यातून अनेकदा वीज गायब होते. तेव्हा कोणते दुरुस्तीचे काम करीत असतात. असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.अंदर मावळात मागील चार दिवसांपासून वीज गेली असूनअद्याप पूर्ववत झाली नसल्याची तक्रार राजू खांडभोर, नारायण ठाकर, निवृत्ती वाडेकर, गुलाब गबाले, कुंडलिक लष्करे, कैलास खांडभोर, भरत लष्करे, दशरथ वाडेकर, छगन लष्करे, बळीराम वाडेकर आदींनी केली आहे. दहावीच्या परीक्षा सुरु असताना वीज गायब झाल्याने मोठा त्रास होत असून याविषयी महावितरण कार्यालयात तक्रार देऊन ही उपाययोजना होत नाहीत.परिस्थिती जैसे थे : आश्वासनांचा विसर१मावळातील वारंवार खंडित होणाºया वीजेचा प्रश्न ताबोडतोब मार्गी लावावा यासाठी काही महिन्यांपूर्वी नागरिकांनी महावितरण कार्यालयावर टाळे ठोको आंदोलन ही केले होते. त्या वेळी वीज महावितरणच्या अधिकाºयांनी पंधरा दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनांचा म्हणावा तसा फायदा झाला नाही.२वीज वितरण मंडळाची ‘जैसे थे’ अशीच स्थिती आहे. वेळेनंतर येणारी मोठ मोठी रकमेची विजेची बिले भरूनसुद्धा वीज ग्राहकाला वीजेविनाच राहावे लागत असल्याने मावळातील वीजग्राहक राजा संतापला आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करूनही योग्य दखल घेतली जात नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र