शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
3
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
4
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
5
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
6
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
7
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
8
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
9
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
10
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
11
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
12
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
14
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
15
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
16
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
17
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
18
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
19
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
20
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
Daily Top 2Weekly Top 5

अंदर मावळ चार दिवस अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 06:19 IST

मावळात गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भरमसाठ वीजबिल वेळेवर भरूनही ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

कामशेत - मावळात गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भरमसाठ वीजबिल वेळेवर भरूनही ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. वीजवितरण महामंडळाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून, या भागालाच दुजाभावाची वागणूक का दिली जाते, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. सध्या दहावीची परीक्षा सुरू असून अंदर मावळात मागील चार दिवसांपासून वीज नसल्याने विद्यार्थ्यांवर मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करण्याची वेळ आली आहे.मागील काही महिन्यांपासून नाणे, पवन, अंदर मावळासह कामशेत शहरात वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार वाढले असून, काही दुर्गम गावांमध्ये वीज गेल्यानंतर ती दोन दोन दिवस येत नाही. वीज महामंडळाने भारनियमन नसताना अघोषित भारनियमन सुरू केले आहे. यामुळे नागरिकांसह अनेक दुकानदार त्रस्त झाले आहेत. गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद केला जातो. त्या शिवाय आठवड्यातून अनेकदा वीज गायब होते. तेव्हा कोणते दुरुस्तीचे काम करीत असतात. असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.अंदर मावळात मागील चार दिवसांपासून वीज गेली असूनअद्याप पूर्ववत झाली नसल्याची तक्रार राजू खांडभोर, नारायण ठाकर, निवृत्ती वाडेकर, गुलाब गबाले, कुंडलिक लष्करे, कैलास खांडभोर, भरत लष्करे, दशरथ वाडेकर, छगन लष्करे, बळीराम वाडेकर आदींनी केली आहे. दहावीच्या परीक्षा सुरु असताना वीज गायब झाल्याने मोठा त्रास होत असून याविषयी महावितरण कार्यालयात तक्रार देऊन ही उपाययोजना होत नाहीत.परिस्थिती जैसे थे : आश्वासनांचा विसर१मावळातील वारंवार खंडित होणाºया वीजेचा प्रश्न ताबोडतोब मार्गी लावावा यासाठी काही महिन्यांपूर्वी नागरिकांनी महावितरण कार्यालयावर टाळे ठोको आंदोलन ही केले होते. त्या वेळी वीज महावितरणच्या अधिकाºयांनी पंधरा दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनांचा म्हणावा तसा फायदा झाला नाही.२वीज वितरण मंडळाची ‘जैसे थे’ अशीच स्थिती आहे. वेळेनंतर येणारी मोठ मोठी रकमेची विजेची बिले भरूनसुद्धा वीज ग्राहकाला वीजेविनाच राहावे लागत असल्याने मावळातील वीजग्राहक राजा संतापला आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करूनही योग्य दखल घेतली जात नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र