शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

मावळ लोकसभा निवडणूक : दलित आणि मुस्लिम मतदारांच्या कौलाबाबत उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 17:57 IST

क्षवेधी लढत ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार पिंपरीतून किती मते मिळवतील आणि त्याचा फायदा किंवा तोटा कोणाला होईल, अशा चर्चा रंगत आहेत

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडी, ‘बसपा’च्या मतांवरून ठरणार युती की आघाडीच्या विजयाचे गणितमावळ लोकसभा निवडणूक : दलित आणि मुस्लिम मतदारांच्या कौलाबाबत उत्सुकता

नारायण बडगुजर 

पिंपरी : लक्षवेधी लढत ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार पिंपरीतून किती मते मिळवतील आणि त्याचा फायदा किंवा तोटा कोणाला होईल, अशा चर्चा रंगत आहेत. मावळ लोकसभा निवडणुकीत ‘वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली होती. त्यामुळे ‘वंचित’चा उमेदवार किती मते घेणार यावरच शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या विजयाचे गणित ठरणार आहे. त्यामुळे कोणाला संसदेचा मार्ग सुकर होतो आणि कोणता उमेदवार त्यापासून वंचित राहील, हे २३ मे रोजी निकालातून स्पष्ट होणार आहे. 

शाहूनगर व संभाजीनगरचा काही भाग, निगडी प्राधिकरण, संत तुकारामनगर, वल्लभनगर असा विकसित परिसर आणि झोपडपट्टीबहूल भाग असा संमिश्र मतदारसंघ म्हणून पिंपरीची ओळख आहे. अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव असून, या मतदारसंघात सुमारे दोन लाख दलित आणि मुस्लिम मतदार आहेत. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. त्यामाध्यमातून राज्यभर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले. मावळ मतदारसंघातून राजाराम पाटील यांनी ‘वंचित’तर्फे निवडणूक लढविली. तसेच बहुजन समाज पार्टीतर्फे अ‍ॅड. संजय कानडे रिंगणात होते. लोकसभेच्या २००९ मधील निवडणुकीत राष्ट्रवादीचे आझम पानसरे आणि शिवसेनेचे गजानन बाबर यांच्यात लढत झाली होती. त्या वेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघात पानसरे यांना ५२ हजार ५०१ तर बाबर यांना ५७ हजार २८९ मते मिळाली होती. बाबर यांना ४ हजार ७८८ मताधिक्य होते. बसपाचे उमेदवार उमाकांत मिश्रा यांना ५ हजार ३३ मते मिळाली होती.  ‘वंचित’मुळे केवळ दलित व मुस्लिम नव्हे तर बहुजनांतील इतर घटकांनाही आकर्षित करण्यात आंबेडकर आणि ओवेसी यांना यश आल्याचे राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी निवडून येण्याइतका करिश्मा त्यांना साधता येणार नाही, अशीही टीप्पणी करण्यात येत आहे. अशीच परिस्थिती पिंपरी राखीव मतदारसंघात आहे. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नेमकी किती मते मिळविणार, त्यावर श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यांच्या विजयाचे गणित ठरणार आहे.

दलित व मुस्लिम ऐक्यामुळे झोपडपट्टीबहूल भागात प्रभाव२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे, शेकापचे लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर यांच्यात लढत झाली होती. त्या वेळी पिंपरी मतदारसंघातून बारणे यांना ९५ हजार ८८९, लक्ष्मण जगताप यांना ३८ हजार ३५९ तर राहुल नार्वेकर यांना २१ हजार ७१ मते मिळाली होती. तर बसपाचे टेक्सास गायकवाड यांना ६ हजार ८९७ मते मिळाली होती. २००९ आणि २०१४ मधील मतांची आकडेवारीवरून बसपाच्या मतदारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. मायावती यांचा बसपा हा उत्तर प्रदेशातील पक्ष आहे. असे असतानाही या पक्षाचा मतदार पिंपरीत आहे. मात्र यंदा महाराष्ट्राच्या मातीतील पक्ष म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित’चे गारुड दलित आणि मुस्लिम मतदारांवर आहे. ओवेसी आणि आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग येथे आहे. दलित आणि मुस्लिम ऐक्याची हाक या दोघांनी दिली आणि झोपडपट्टीबहूल भागात आपला प्रभाव निर्माण केला. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला. व्हीडिओ क्लिप तयार केल्या. चळवळीतील गाण्यांची त्यात भर घालण्यात आली. निळ्या निशाणाचे स्मरणही करून देण्यात आले. त्यामुळे मागास आणि झोपडपट्टीबहूल भागात ‘वंचित’ची चर्चा रंगली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmaval-pcमावळElectionनिवडणूकVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी