शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कार्ल्यातील एकवीरा कळस चोरीच्या निषेधार्थ महाआरती; महिना उलटूनही लागेना तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 13:09 IST

एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी होऊन महिना उलटला तरी चोरांचा शोध लागत नसल्याच्या निषेधार्थ कोळी, आगरी समाजाच्या वतीने एकवीरा देवीच्या मंदिरात महा आरती करण्यात आली. 

ठळक मुद्देपुढील महिनाभरात या चोरीचा छडा न लागल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन : अनंत तरे महाआरतीनंतर जमलेल्या नागरिकांनी गडावर नवीन विश्वस्तांनी लावलेले बोर्ड टाकले काढून

लोणावळा : वेहेरगाव गडावरील कुलस्वामीनी एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी होऊन महिना उलटला तरी चोरांचा शोध लागत नसल्याच्या निषेधार्थ कोळी, आगरी समाजाच्या वतीने एकवीरा देवीच्या मंदिरात महा आरती करण्यात आली. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत कोळी, आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील व श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे म्हणाले, पुढील महिनाभरात या चोरीचा छडा न लागल्यास महाराष्ट्रातील तमाम कोळी, आगरी व तत्सम समाज या घटनेच्या निषेधार्थ तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, या आंदोलनादरम्यान घडणार्‍या घटनांना मात्र त्या वेळी शासन व पोलीस प्रशासन जबाबदार असेल. आजची महाआरती हा समाजाचा आक्रोश असल्याचे जयेंद्र कुणे यांनी सांगितले.श्री एकवीरा देवीच्या मंदिराच्या कळस चोरी प्रकरणाला आज एक महिना उलटला आहे. या प्रकरणाचा अद्याप कोणताही तपास लागलेला नाही. या चोरीच्या तपासाबाबत पाठपुरावा करण्याऐवजी वेहेरगावातील काही तथाकथित पुढारी व काही गावगुंडानी या कळस चोरीला राजकीय स्वरूप देऊन देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे व इतर काही विश्वस्तांना बेकायदेशीरपणे हटविण्याचा खोडसाळपणा केला आहे. महाआरतीनंतर गडावर या खोडसाळ कृत्याचा निषेध व्यक्त करत जमलेल्या नागरिकांनी गडावर नवीन विश्वस्तांनी लावलेले बोर्ड काढून टाकले. महाआरतीला आगरी, कोळी समाजाचे अध्यक्ष राजाराम पाटील, योगेश कोळी, डी.एम. कोळी, जयेंद्र खुणे, जयवंती कोळी, किशोर भोईर, जयवंत पोकळे, संतोष चौधरी, छाया जाधव, अरविंद भोईर, मयूरेश कोटकर, शिरीष राजके, दत्ता भोईर, किसन फुलोरे आदींसह शेकडो कोळी, आगरी भाविक उपस्थित होते. सदर बेकायदेशीर ट्रस्ट स्थापन करणार्‍यांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी. तसेच एका महिन्याच्या आत कळस व कळस चोराचा तपास लावावा. अन्यथा पुढच्या महिन्यात लाखो भाविक, कोळी, आगरी, कोळी एकवीरा गडावर व परिसरात तीव्र आंदोलन करतील़ त्यास पोलीस व प्रशासन जबाबदार राहील, असे तरे यांनी नमूद केले.

टॅग्स :theftचोरीagitationआंदोलनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड