शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

केरळसारख्या स्थितीचा शहरात धोका; प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 03:00 IST

नदीपात्रामध्ये राजरोस भराव टाकला जात असल्याने पात्र होतेय अरुंद

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नदीपात्रात राजरोसपणे टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे नदीपात्र अरुंद होत आहे. आगामी काळात रुंद नदीपात्रच न राहिल्यास पूरग्रस्त केरळसारखी परिस्थिती उद्धवते की काय, अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.शहरातून पवना, इंद्रायणी, मुळा नदी वाहते. यामध्ये पवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून इमारती उभ्या केल्या जात आहेत. सर्रासपणे पूररेषेच्या आत इमारती उभ्या राहत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी नदीपात्राची रुंदी कमी-कमी होत चालली आहे. पावसाळ्यात पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यास अनेक ठिकाणी नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरते.चिंचवडगाव, रावेत, काळेवाडी, पिंपरी या ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण केले जात आहे. पूररेषा केवळ नावापुरतीच उरली आहे. यापुढील काळात नदीतील पाणी जाण्यापुरते तरी पात्र शिल्लक राहते की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.केवळ पावसाळ्यात धरणातून पाण्याच्या विसर्गावेळीच नदीपात्रालगतच्या अतिक्रमण व घरांचा मुद्दा उपस्थित होतो. इतर वेळी मात्र राजरोसपणे भराव टाकून इमारती उभ्या राहत असताना त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जाते. यामुळे धोका अधिकच वाढत आहे. शहरात अनेक ठिकाणचे नाले बुजवून त्या ठिकाणी इमारती उभारल्या आहेत.पवनेची पाणीपातळी वाढलीशहरातून पवना, इंद्रायणी, मुळा या नद्या वाहतात. मावळ मुळशीत जोरदार पाऊस सुरू झाल्याने तसेच धरणांमधून पाणी सोडल्याने नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे पवना नदीतील रावेत, चिंचवड, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपरी, पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी या नदी काठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुळा नदीवरील वाकड, पिंपळे निलख, सांगवी तसेच इंद्रायणी नदीवरील तळवडे, चिखली भागात नदीत वाढ झाली आहे.राडारोडा नदीपात्रातकाळेवाडी नदीपात्रालगत ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी बुलडोझरच्या साहाय्याने मंगळवारी खोदाई करण्याचे काम सुरू होते. मात्र, खोदाईचा राडारोडा ट्रकमध्ये भरून न नेता नदीलगतच पसरवला जात होता. अशा गोष्टींमुळेच नदीपात्र अरुंद होत आहे.प्रदूषणात भरअनेक ठिकाणचे नाले बुजवून इमारती उभ्या केल्या आहेत, तर काही ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते. यामुळे नदी प्रदूषणात भर पडत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.सीमाभिंतीची मागणीअतिक्रमण रोखण्यासाठी सीमाभिंत उभारण्याची मागणी होत आहे. सीमाभिंत उभारल्यास अतिक्रमणाला आळा बसण्यास मदत होईल. यासह प्रशस्त नदीपात्र कायम राहील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड