शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महाविकास आघाडीमुळेच प्रकल्प राज्याबाहेर गेले; रामदास आठवले यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 20:09 IST

राज्यातील प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी शिंदे - फडणवीस सरकारला जबाबदार धरणे चुकीचे

पिंपरी : राज्यातील प्रकल्प गुजरातला जात आहेत. यासाठी शिंदे - फडणवीस सरकारला जबाबदार धरणे चुकीचे आहे. राज्याबाहेर प्रकल्प जाण्यासाठी महाविकास आघाडीने आधीच घेतलेले निर्णय कारणीभूत ठरत आहेत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली.

पिंपरीतील वल्लभनगर येथे आरपीआय (आठवले गट) महिला आघाडी कार्यकारिणीच्या बैठकीला रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “शिवसेनेमध्ये जे बंड झाले. त्या बंडाला उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत. त्यांनी भाजपची फसवणूक केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना खिळखिळी झाली आहे. त्यामुळे भाजप - आरपीआय युती मुंबई महापालिकेत विजय मिळवेल.”

विस्तारात आरपीआयला एक मंत्रिपद

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासाठी आरपीआयकडून एका मंत्रिपदाची मागणी आधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवाय महामंडळ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेत देखील वाटा मागण्यात आला असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

गुजरातमधील घटनेला अधिकारी जबाबदार

गुजरातमध्ये पूल तुटून झालेल्या दुर्घटनेला अधिकारी जबाबदार आहेत. पूल सक्षम आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची होती. फक्त सरकारला यात जबाबदार धरून चालणार नाही, असे आठवले म्हणाले.

...त्यांचे फिरले डोके

शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात गेलेल्या आमदारांना ५० खोके, असे म्हणून लक्ष्य केले जाते. ते चुकीचे आहे. असे म्हणत रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत कविता करत ‘जे म्हणतात घेतले ५० खोके त्यांचे फिरले डोके’ असा टोला लगावला. तसेच आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद मिटत नसेल तर आपण मध्यस्थी करू, असेदेखील आठवले म्हणाले.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत

राज्यात आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी आरपीआय भाजपसोबत युती करेल, असे संकेत आठवले यांनी दिले. जिथे आमची ताकद आहे तेथे जास्त जागा मागू तसेच काही जागांवर तडजोड केली जाईल, असे आठवले म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणGujaratगुजरातDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे