शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

महाविकास आघाडीमुळेच प्रकल्प राज्याबाहेर गेले; रामदास आठवले यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 20:09 IST

राज्यातील प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी शिंदे - फडणवीस सरकारला जबाबदार धरणे चुकीचे

पिंपरी : राज्यातील प्रकल्प गुजरातला जात आहेत. यासाठी शिंदे - फडणवीस सरकारला जबाबदार धरणे चुकीचे आहे. राज्याबाहेर प्रकल्प जाण्यासाठी महाविकास आघाडीने आधीच घेतलेले निर्णय कारणीभूत ठरत आहेत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली.

पिंपरीतील वल्लभनगर येथे आरपीआय (आठवले गट) महिला आघाडी कार्यकारिणीच्या बैठकीला रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “शिवसेनेमध्ये जे बंड झाले. त्या बंडाला उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत. त्यांनी भाजपची फसवणूक केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना खिळखिळी झाली आहे. त्यामुळे भाजप - आरपीआय युती मुंबई महापालिकेत विजय मिळवेल.”

विस्तारात आरपीआयला एक मंत्रिपद

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासाठी आरपीआयकडून एका मंत्रिपदाची मागणी आधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवाय महामंडळ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेत देखील वाटा मागण्यात आला असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

गुजरातमधील घटनेला अधिकारी जबाबदार

गुजरातमध्ये पूल तुटून झालेल्या दुर्घटनेला अधिकारी जबाबदार आहेत. पूल सक्षम आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची होती. फक्त सरकारला यात जबाबदार धरून चालणार नाही, असे आठवले म्हणाले.

...त्यांचे फिरले डोके

शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात गेलेल्या आमदारांना ५० खोके, असे म्हणून लक्ष्य केले जाते. ते चुकीचे आहे. असे म्हणत रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत कविता करत ‘जे म्हणतात घेतले ५० खोके त्यांचे फिरले डोके’ असा टोला लगावला. तसेच आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद मिटत नसेल तर आपण मध्यस्थी करू, असेदेखील आठवले म्हणाले.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत

राज्यात आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी आरपीआय भाजपसोबत युती करेल, असे संकेत आठवले यांनी दिले. जिथे आमची ताकद आहे तेथे जास्त जागा मागू तसेच काही जागांवर तडजोड केली जाईल, असे आठवले म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणGujaratगुजरातDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे