शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

महाविकास आघाडीमुळेच प्रकल्प राज्याबाहेर गेले; रामदास आठवले यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 20:09 IST

राज्यातील प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी शिंदे - फडणवीस सरकारला जबाबदार धरणे चुकीचे

पिंपरी : राज्यातील प्रकल्प गुजरातला जात आहेत. यासाठी शिंदे - फडणवीस सरकारला जबाबदार धरणे चुकीचे आहे. राज्याबाहेर प्रकल्प जाण्यासाठी महाविकास आघाडीने आधीच घेतलेले निर्णय कारणीभूत ठरत आहेत, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली.

पिंपरीतील वल्लभनगर येथे आरपीआय (आठवले गट) महिला आघाडी कार्यकारिणीच्या बैठकीला रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “शिवसेनेमध्ये जे बंड झाले. त्या बंडाला उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत. त्यांनी भाजपची फसवणूक केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना खिळखिळी झाली आहे. त्यामुळे भाजप - आरपीआय युती मुंबई महापालिकेत विजय मिळवेल.”

विस्तारात आरपीआयला एक मंत्रिपद

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासाठी आरपीआयकडून एका मंत्रिपदाची मागणी आधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवाय महामंडळ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेत देखील वाटा मागण्यात आला असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

गुजरातमधील घटनेला अधिकारी जबाबदार

गुजरातमध्ये पूल तुटून झालेल्या दुर्घटनेला अधिकारी जबाबदार आहेत. पूल सक्षम आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची होती. फक्त सरकारला यात जबाबदार धरून चालणार नाही, असे आठवले म्हणाले.

...त्यांचे फिरले डोके

शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात गेलेल्या आमदारांना ५० खोके, असे म्हणून लक्ष्य केले जाते. ते चुकीचे आहे. असे म्हणत रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत कविता करत ‘जे म्हणतात घेतले ५० खोके त्यांचे फिरले डोके’ असा टोला लगावला. तसेच आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद मिटत नसेल तर आपण मध्यस्थी करू, असेदेखील आठवले म्हणाले.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत

राज्यात आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी आरपीआय भाजपसोबत युती करेल, असे संकेत आठवले यांनी दिले. जिथे आमची ताकद आहे तेथे जास्त जागा मागू तसेच काही जागांवर तडजोड केली जाईल, असे आठवले म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणGujaratगुजरातDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे