शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

गतिरोधकांमुळे मिळते अपघाताला निमंत्रण; झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नसल्याने वाहनचालकांची होतेय कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 01:50 IST

आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाºया वाकड-हिंजवडी, डांगे चौक रस्त्यावर अनेक गतिरोधकांची बिकट अवस्था आहे़ जिथे वाहनाला गतीच लागत नाही तरीही करण्यात आलेले गतिरोधक निव्वळ पांढरे हत्ती ठरत आहेत.

वाकड : आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाºया वाकड-हिंजवडी, डांगे चौक रस्त्यावर अनेक गतिरोधकांची बिकट अवस्था आहे़ जिथे वाहनाला गतीच लागत नाही तरीही करण्यात आलेले गतिरोधक निव्वळ पांढरे हत्ती ठरत आहेत़ अती रहदारीच्या या रस्त्यावर असलेल्या रस्त्यावरील गतिरोधकांवर झेब्रा क्रॉसिंग नसल्याने वाहने जंप अपघाताला निमंत्रण मिळत आहे.वाकड राजीव गांधी पुलावरून हिंजवडीकडे जाताना तीव्र उताराच्या वेगाला लगाम लावण्यासाठी पूल संपताच एक गतिरोधक करण्यात आला आहे़ हा गतिरोधक झेब्रा क्रोसिंग नसल्याने दुरून दृष्टी पथास येत नाही. त्यामुळे अनेक वाहने या ठिकाणी जोरात आदळतात़ अनेकदा या समस्येमुळे अपघातही झाले आहेत. मात्र वाहतूक पोलीस संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष अनेकांच्या जिवावर बेतत आहे.याच रस्त्यावरून थोडे पुढे गेल्यास रुंदीकरण झालेल्या रस्त्यावरून वाहनाचा वेग आणखीनच वाढतो. मात्र, या वेगाला आवरण्यासाठी बीआरटीने कोणतेही ठोस उपाय केलेले नाहीत. या रस्त्यावर असलेला एकमेव गतिरोधक म्हणजे अपघाताला पर्वणीच, हा गतिरोधक म्हणजे डांबराचा लांबसडक गोळा त्याला कसलेही रंगाचे गोंदण नसल्याने वाहने जोराने आदळतात. केवळ ग्रामस्थांच्या व काही जागरूक चालकांच्या तसेच वाहतूक पोलिसांच्या मागणीची प्रशासनाने काढलेली ही भाबडी समजूत वाटते. वाकड-हिंजवडीचा कायापालट झालेले असताना काही मोठे हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या सोयीसाठी कुठलाही परवाना न घेता वाहतूक नियमांचा विचार न करता मनमानी पद्धतीने गतिरोधक उभारण्याचे काम करण्याच्याही काही घटना या भागात घडल्या़ मात्र वाहतूक पोलिसांनी असे गतिरोधक हटविले.थेरगाव, वाकड, हिंजवडी या परिसरातील अंतर्गत रस्त्यावर अनेक लहान गतिरोधक करण्यात आले आहेत़ जिथे गरज नाही अशा ठिकाणी गतिरोधक करून मोठी डोखेदुखी झाली आहे़ गरज नसलेल्या ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त गतिरोधक झाल्याने विनाकारण त्रास होत आहे़ त्यावरून जाताना वाहन जोरदार आदळते त्याचा धक्काही शरीराला अपायकारक ठरत आहे.नियमांचे उल्लंघन : अद्याप पत्रव्यवहारच सुरूखरे तर वाहतूक नियमांच्या अधीन गतिरोधक उभारण्यासाठी वाहतूक पोलीस गरज असलेल्या ठिकाणचा नकाशा काढून कागदोपत्री त्याची गरज कशी आहे, हे दाखवून संबंधित महापालिका किंवा एमआयडीसी, ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करते. त्यानुसार साडेचार फूट रुंद आणि सहा इंच उंचीचा गतिरोधक उभारण्यातयेतो. मात्र, अनेक ठिकाणी या नियम डावलले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत.गतिरोधक करण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते़ आमच्या मागणीनुसार किंवा आमच्या पत्रव्यवहारानुसार गतिरोधक केला जातो़ मात्र, अलीकडे फायद्यासाठी अनेक जण बेकायदा गतिरोधक उभारतात, असे बेकायदेशीर गतिरोधक आम्ही स्वखर्चाने हटवितो़- दत्तात्रेय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग

टॅग्स :Accidentअपघात