शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गतिरोधकांमुळे मिळते अपघाताला निमंत्रण; झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नसल्याने वाहनचालकांची होतेय कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 01:50 IST

आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाºया वाकड-हिंजवडी, डांगे चौक रस्त्यावर अनेक गतिरोधकांची बिकट अवस्था आहे़ जिथे वाहनाला गतीच लागत नाही तरीही करण्यात आलेले गतिरोधक निव्वळ पांढरे हत्ती ठरत आहेत.

वाकड : आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाºया वाकड-हिंजवडी, डांगे चौक रस्त्यावर अनेक गतिरोधकांची बिकट अवस्था आहे़ जिथे वाहनाला गतीच लागत नाही तरीही करण्यात आलेले गतिरोधक निव्वळ पांढरे हत्ती ठरत आहेत़ अती रहदारीच्या या रस्त्यावर असलेल्या रस्त्यावरील गतिरोधकांवर झेब्रा क्रॉसिंग नसल्याने वाहने जंप अपघाताला निमंत्रण मिळत आहे.वाकड राजीव गांधी पुलावरून हिंजवडीकडे जाताना तीव्र उताराच्या वेगाला लगाम लावण्यासाठी पूल संपताच एक गतिरोधक करण्यात आला आहे़ हा गतिरोधक झेब्रा क्रोसिंग नसल्याने दुरून दृष्टी पथास येत नाही. त्यामुळे अनेक वाहने या ठिकाणी जोरात आदळतात़ अनेकदा या समस्येमुळे अपघातही झाले आहेत. मात्र वाहतूक पोलीस संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष अनेकांच्या जिवावर बेतत आहे.याच रस्त्यावरून थोडे पुढे गेल्यास रुंदीकरण झालेल्या रस्त्यावरून वाहनाचा वेग आणखीनच वाढतो. मात्र, या वेगाला आवरण्यासाठी बीआरटीने कोणतेही ठोस उपाय केलेले नाहीत. या रस्त्यावर असलेला एकमेव गतिरोधक म्हणजे अपघाताला पर्वणीच, हा गतिरोधक म्हणजे डांबराचा लांबसडक गोळा त्याला कसलेही रंगाचे गोंदण नसल्याने वाहने जोराने आदळतात. केवळ ग्रामस्थांच्या व काही जागरूक चालकांच्या तसेच वाहतूक पोलिसांच्या मागणीची प्रशासनाने काढलेली ही भाबडी समजूत वाटते. वाकड-हिंजवडीचा कायापालट झालेले असताना काही मोठे हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या सोयीसाठी कुठलाही परवाना न घेता वाहतूक नियमांचा विचार न करता मनमानी पद्धतीने गतिरोधक उभारण्याचे काम करण्याच्याही काही घटना या भागात घडल्या़ मात्र वाहतूक पोलिसांनी असे गतिरोधक हटविले.थेरगाव, वाकड, हिंजवडी या परिसरातील अंतर्गत रस्त्यावर अनेक लहान गतिरोधक करण्यात आले आहेत़ जिथे गरज नाही अशा ठिकाणी गतिरोधक करून मोठी डोखेदुखी झाली आहे़ गरज नसलेल्या ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त गतिरोधक झाल्याने विनाकारण त्रास होत आहे़ त्यावरून जाताना वाहन जोरदार आदळते त्याचा धक्काही शरीराला अपायकारक ठरत आहे.नियमांचे उल्लंघन : अद्याप पत्रव्यवहारच सुरूखरे तर वाहतूक नियमांच्या अधीन गतिरोधक उभारण्यासाठी वाहतूक पोलीस गरज असलेल्या ठिकाणचा नकाशा काढून कागदोपत्री त्याची गरज कशी आहे, हे दाखवून संबंधित महापालिका किंवा एमआयडीसी, ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करते. त्यानुसार साडेचार फूट रुंद आणि सहा इंच उंचीचा गतिरोधक उभारण्यातयेतो. मात्र, अनेक ठिकाणी या नियम डावलले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत.गतिरोधक करण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते़ आमच्या मागणीनुसार किंवा आमच्या पत्रव्यवहारानुसार गतिरोधक केला जातो़ मात्र, अलीकडे फायद्यासाठी अनेक जण बेकायदा गतिरोधक उभारतात, असे बेकायदेशीर गतिरोधक आम्ही स्वखर्चाने हटवितो़- दत्तात्रेय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग

टॅग्स :Accidentअपघात