शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

गतिरोधकांमुळे मिळते अपघाताला निमंत्रण; झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नसल्याने वाहनचालकांची होतेय कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 01:50 IST

आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाºया वाकड-हिंजवडी, डांगे चौक रस्त्यावर अनेक गतिरोधकांची बिकट अवस्था आहे़ जिथे वाहनाला गतीच लागत नाही तरीही करण्यात आलेले गतिरोधक निव्वळ पांढरे हत्ती ठरत आहेत.

वाकड : आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाºया वाकड-हिंजवडी, डांगे चौक रस्त्यावर अनेक गतिरोधकांची बिकट अवस्था आहे़ जिथे वाहनाला गतीच लागत नाही तरीही करण्यात आलेले गतिरोधक निव्वळ पांढरे हत्ती ठरत आहेत़ अती रहदारीच्या या रस्त्यावर असलेल्या रस्त्यावरील गतिरोधकांवर झेब्रा क्रॉसिंग नसल्याने वाहने जंप अपघाताला निमंत्रण मिळत आहे.वाकड राजीव गांधी पुलावरून हिंजवडीकडे जाताना तीव्र उताराच्या वेगाला लगाम लावण्यासाठी पूल संपताच एक गतिरोधक करण्यात आला आहे़ हा गतिरोधक झेब्रा क्रोसिंग नसल्याने दुरून दृष्टी पथास येत नाही. त्यामुळे अनेक वाहने या ठिकाणी जोरात आदळतात़ अनेकदा या समस्येमुळे अपघातही झाले आहेत. मात्र वाहतूक पोलीस संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष अनेकांच्या जिवावर बेतत आहे.याच रस्त्यावरून थोडे पुढे गेल्यास रुंदीकरण झालेल्या रस्त्यावरून वाहनाचा वेग आणखीनच वाढतो. मात्र, या वेगाला आवरण्यासाठी बीआरटीने कोणतेही ठोस उपाय केलेले नाहीत. या रस्त्यावर असलेला एकमेव गतिरोधक म्हणजे अपघाताला पर्वणीच, हा गतिरोधक म्हणजे डांबराचा लांबसडक गोळा त्याला कसलेही रंगाचे गोंदण नसल्याने वाहने जोराने आदळतात. केवळ ग्रामस्थांच्या व काही जागरूक चालकांच्या तसेच वाहतूक पोलिसांच्या मागणीची प्रशासनाने काढलेली ही भाबडी समजूत वाटते. वाकड-हिंजवडीचा कायापालट झालेले असताना काही मोठे हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या सोयीसाठी कुठलाही परवाना न घेता वाहतूक नियमांचा विचार न करता मनमानी पद्धतीने गतिरोधक उभारण्याचे काम करण्याच्याही काही घटना या भागात घडल्या़ मात्र वाहतूक पोलिसांनी असे गतिरोधक हटविले.थेरगाव, वाकड, हिंजवडी या परिसरातील अंतर्गत रस्त्यावर अनेक लहान गतिरोधक करण्यात आले आहेत़ जिथे गरज नाही अशा ठिकाणी गतिरोधक करून मोठी डोखेदुखी झाली आहे़ गरज नसलेल्या ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त गतिरोधक झाल्याने विनाकारण त्रास होत आहे़ त्यावरून जाताना वाहन जोरदार आदळते त्याचा धक्काही शरीराला अपायकारक ठरत आहे.नियमांचे उल्लंघन : अद्याप पत्रव्यवहारच सुरूखरे तर वाहतूक नियमांच्या अधीन गतिरोधक उभारण्यासाठी वाहतूक पोलीस गरज असलेल्या ठिकाणचा नकाशा काढून कागदोपत्री त्याची गरज कशी आहे, हे दाखवून संबंधित महापालिका किंवा एमआयडीसी, ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करते. त्यानुसार साडेचार फूट रुंद आणि सहा इंच उंचीचा गतिरोधक उभारण्यातयेतो. मात्र, अनेक ठिकाणी या नियम डावलले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत.गतिरोधक करण्यासाठी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते़ आमच्या मागणीनुसार किंवा आमच्या पत्रव्यवहारानुसार गतिरोधक केला जातो़ मात्र, अलीकडे फायद्यासाठी अनेक जण बेकायदा गतिरोधक उभारतात, असे बेकायदेशीर गतिरोधक आम्ही स्वखर्चाने हटवितो़- दत्तात्रेय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग

टॅग्स :Accidentअपघात