शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

थेरगाव शहरात रुग्णांचे वाढले प्रमाण, वातावरणामध्ये दिवसागणिक होणा-या बदलाचे परिणाम; जलजन्य आजारांत झाली वाढ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 02:43 IST

वातावरणात दिवसागणिक होणारे बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहेत. पावसाळ्याचे दिवस असतानाही मध्येच पडणारे ऊन आणि सकाळ व सायंकाळी खेळणारी थंड हवा, अवकाळी चालू असलेला पाऊस अशा टोकाच्या वातावरणाचा अनुभव येत असल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले असून, सरकारी रुग्णालयासह लहान-मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या विषाणूजन्य आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या चौपट झाली आहे.

थेरगाव : वातावरणात दिवसागणिक होणारे बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहेत. पावसाळ्याचे दिवस असतानाही मध्येच पडणारे ऊन आणि सकाळ व सायंकाळी खेळणारी थंड हवा, अवकाळी चालू असलेला पाऊस अशा टोकाच्या वातावरणाचा अनुभव येत असल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले असून, सरकारी रुग्णालयासह लहान-मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या विषाणूजन्य आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या चौपट झाली आहे.गत आठवड्यापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे; पण त्यात मध्येच पावसाची उघडझाप सुरू असल्याने वातावरण झपाट्याने बदल होत आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शहरातील बहुतांश भागात डबके साचले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर थेट जाणवू लागला आहे. हात-पाय दुखणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, ताप येणे, सर्दी, खोकला या प्रकारची लक्षणे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. सर्वाेपचार रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.ही लक्षणे सामान्य वाटत असली, तरी डेंगी, डायरियासह स्वाइन फ्लूचीदेखील प्राथमिक लक्षणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात जलस्रोत दूषित होणे ही एक सामान्य बाब आहे. हे दूषित जल पिण्यामुळे जलजन्य आजार बळावले आहेत. सर्वोपचार रुग्णालयात अतिसाराचे अनेक रुग्ण दाखल आहेत. पावसाळ्यात उकळलेले पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.निगडी प्राधिकरण : डेंगीच्या रुग्णांत वाढपावसाळ्यात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. अशा वातावरणात उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. उघड्यावरील पदार्थांवर वातावरणातील रोगजंतू, धूळ बसते. त्यामुळे असे पदार्थ टाळायला हवेत, असा सल्ला सर्व रुग्णालयांमध्ये डॉक्टर देत आहेत. सध्या परिसरात जिकडेतिकडे ‘खो खो’ असा एकच आवाज कानी पडत आहे.निगडी प्राधिकरण परिसरात डेंगी आणि चिकनगुनीयाच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दवाखान्यात दाखल झाले आहेत. या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही मोहीम राबविण्यात अडथळे येत आहेत. तसेच येथील कचराही वेळच्या वेळी उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरत आहे. प्रसंगी डासांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. तसेच अनेक ठिकाणी बांधकामाचा राडारोडा रस्त्यावर टाकण्यात आला आहे. त्यामुळे रोगराई वाढण्यास मदत होत आहे.

टॅग्स :Puneपुणे