शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

थेरगाव शहरात रुग्णांचे वाढले प्रमाण, वातावरणामध्ये दिवसागणिक होणा-या बदलाचे परिणाम; जलजन्य आजारांत झाली वाढ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 02:43 IST

वातावरणात दिवसागणिक होणारे बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहेत. पावसाळ्याचे दिवस असतानाही मध्येच पडणारे ऊन आणि सकाळ व सायंकाळी खेळणारी थंड हवा, अवकाळी चालू असलेला पाऊस अशा टोकाच्या वातावरणाचा अनुभव येत असल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले असून, सरकारी रुग्णालयासह लहान-मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या विषाणूजन्य आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या चौपट झाली आहे.

थेरगाव : वातावरणात दिवसागणिक होणारे बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहेत. पावसाळ्याचे दिवस असतानाही मध्येच पडणारे ऊन आणि सकाळ व सायंकाळी खेळणारी थंड हवा, अवकाळी चालू असलेला पाऊस अशा टोकाच्या वातावरणाचा अनुभव येत असल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले असून, सरकारी रुग्णालयासह लहान-मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या विषाणूजन्य आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या चौपट झाली आहे.गत आठवड्यापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे; पण त्यात मध्येच पावसाची उघडझाप सुरू असल्याने वातावरण झपाट्याने बदल होत आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शहरातील बहुतांश भागात डबके साचले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर थेट जाणवू लागला आहे. हात-पाय दुखणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, ताप येणे, सर्दी, खोकला या प्रकारची लक्षणे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. सर्वाेपचार रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.ही लक्षणे सामान्य वाटत असली, तरी डेंगी, डायरियासह स्वाइन फ्लूचीदेखील प्राथमिक लक्षणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात जलस्रोत दूषित होणे ही एक सामान्य बाब आहे. हे दूषित जल पिण्यामुळे जलजन्य आजार बळावले आहेत. सर्वोपचार रुग्णालयात अतिसाराचे अनेक रुग्ण दाखल आहेत. पावसाळ्यात उकळलेले पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.निगडी प्राधिकरण : डेंगीच्या रुग्णांत वाढपावसाळ्यात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. अशा वातावरणात उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. उघड्यावरील पदार्थांवर वातावरणातील रोगजंतू, धूळ बसते. त्यामुळे असे पदार्थ टाळायला हवेत, असा सल्ला सर्व रुग्णालयांमध्ये डॉक्टर देत आहेत. सध्या परिसरात जिकडेतिकडे ‘खो खो’ असा एकच आवाज कानी पडत आहे.निगडी प्राधिकरण परिसरात डेंगी आणि चिकनगुनीयाच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दवाखान्यात दाखल झाले आहेत. या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही मोहीम राबविण्यात अडथळे येत आहेत. तसेच येथील कचराही वेळच्या वेळी उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरत आहे. प्रसंगी डासांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. तसेच अनेक ठिकाणी बांधकामाचा राडारोडा रस्त्यावर टाकण्यात आला आहे. त्यामुळे रोगराई वाढण्यास मदत होत आहे.

टॅग्स :Puneपुणे